शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

ठाकूरवाडी स्टेशन परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:54 IST

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या दुर्गम भागातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. तेथील महिलांना पाणी नेण्यासाठी कर्जत किंवा खंडाळा रेल्वेस्थानकात ट्रेन पकडून जावे लागते.

- संजय गायकवाडकर्जत  - मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या दुर्गम भागातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. तेथील महिलांना पाणी नेण्यासाठी कर्जत किंवा खंडाळा रेल्वेस्थानकात ट्रेन पकडून जावे लागते. तर काही लोकांना डोंगर उतरून कोंढाणे धरणात साचलेले पाणी आणण्यासाठी डोंगर उतरण्याची कसरत करावी लागते.कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीमध्ये असलेले स्टेशन ठाकूरवाडी हे गाव १५० घरांची लोकवस्ती असलेले गाव. तेथील लोकांसाठी शासनाने दोन विहिरी पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून खोदल्या आहेत, त्या विहिरी जानेवारी महिन्यात आटल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची पाण्यासाठी गेले तीन महिन्यांपासून दमछाक सुरू आहे. त्यातही एका विहिरीत नैसर्गिक झऱ्यातून काही हंडे पाणी साचत असल्याने ते पाणी घरटी मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी नंबर लावून ठेवले आहेत. १५० घरांची वस्ती असल्याने आठवड्यातून दोनदा दोन हंडे पाणी एका कुटुंबाला त्या विहिरीवर मिळते.वाडीत जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे मुंबई-पुणे रेल्वे. त्यातही काही ठरावीक गाड्यांना स्टेशन ठाकूरवाडी येथे टेक्निकल थांबा दिला आहे. मुंबई पुण्याला जाताना सकाळी दोन आणि सायंकाळी एक गाडी तेथे एक मिनिटे थांबतात. तर पुण्याकडून मुंबई जाणाºया दोन गाड्यांना तेथे टेक्निकल थांबा दिला आहे. अन्य पर्याय म्हणजे पायांना वाहन करत डोंगर उतरून परतावे लागते. याशिवाय स्टेशन ठाकूरवाडी येथील महिला पाण्यासाठी डोंगर उतरून कोंढाणे धरण गाठतात. साधारण एक तासभर चोची, मुंढेवाडी डोंगर उतरून पाणी शोधण्याचा असतो. कारण उल्हास नदीचे उगम असलेल्या त्या पात्रात फार तुरळक पाणी असते. अशा वेळी तेथे नदीपात्रात डवरे खोदून पाणी हंड्यात ओतावे लागते.पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आमच्यावर गावात सासरी म्हणून आल्यानंतर दुसºयाच दिवशी सुरू होते. आम्ही वयाचा विचार न करता पाण्याचे प्लास्टिक पिंप घेऊन घरातून बाहेर पडतो आणि पाणी घेऊन घरी पोहोचतो. ही आमचा दररोज दिनक्र म झाला आहे.- आवडाबाई हिंदोळा, ग्रामस्थ

टॅग्स :Raigadरायगडwater scarcityपाणी टंचाई