शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

माणगावमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: March 19, 2016 00:48 IST

तालुक्यातील २९ गावे व ४३ वाड्यांना या वर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल असा शासकीय यंत्रणेचा अंदाज आहे. ४९ विंधन विहिरी व टँकरला मंजुरी मिळाली आहे.

- नितीन देशमुख,  माणगावतालुक्यातील २९ गावे व ४३ वाड्यांना या वर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल असा शासकीय यंत्रणेचा अंदाज आहे. ४९ विंधन विहिरी व टँकरला मंजुरी मिळाली आहे. दोन वर्षात ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च करूनही अनेक वाड्या शासनाच्या निकषामुळे कायम तहानलेल्याच राहणार आहेत.माणगाव तालुक्यातून काळ व गोद या नद्या वाहतात. रावळजे, भिरा, पन्हळघर, कुंभे, नांदवी ही धरणे व साई येथे पाझर तलाव आहे. या तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६७०३९ हे.आर.आहे. १८७ महसुली गावे असलेल्या या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नदी, विहिरी व कालवा यावर अवलंबून राहावे लागते. काळ प्रकल्पामुळे सुरु वातीला ४४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत होते मात्र आता केवळ २५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. कालव्याच्या ओलिताखाली असलेल्या भागातील विहिरींना मे महिन्यापर्यंत पाणी राहते तसेच काळ नदीत पाणी असते. कालवा बंद झाल्यावर माणगावच्या पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम होतो. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कालवा अनेक ठिकाणी लिकेज आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुकट जाते. तालुक्यातील मशिदवडी, शिलीम, करंबेली व हरवंडी ही गावे व वडाचीवाडी, डोंगरोळ बुद्धवाडी, कावीळवल धनगरवाडी व खैरची वाडी यासारख्या १२ वाड्या शासनाच्या निकषामुळे कायम टंचाईग्रस्तच राहतात. माणसी ३०२८ रु पये शासन पाणीपुरवठा योजनेसाठी देते. लोकसंख्येच्या तिप्पट रक्कम मिळते. या वाड्यांची लोकसंख्या ५०० सुध्दा नाही.पाण्याचा स्रोत जवळ नाही त्यामुळे योजना देता येत नाही. यासाठी निकष बदलणे गरजेचे आहे. अनेक गावात योजना पूर्ण झाल्या आहेत मात्र अगोदरची थकबाकी असल्याने वीज पुरवठा होत नाही. यामुळे योजना बंद राहते. यासाठी अक्षय जीवन योजना सुरू करून ५० टक्के वीज बिल भरा ५० टक्के थकीत बिल माफ केल्यास प्रश्न सुटू शकतो.जीवन प्राधिकरणाने दोन वर्षात २० ग्रामीण योजनांवर ९३९.६७ लाख रुपये तर ७ प्रादेशिक योजनांवर १८५०.३३ लाख रु पये खर्च करून पूर्ण केल्या. राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत ५ कोटीच्या योजना पूर्ण केल्या आहेत. या योजना ग्रामीण पाणीपुरवठा समितीमार्फत केल्या जातात. या समितीचे कामावर नियंत्रण असते. सभापती अलका केकाणे म्हणाल्या की, गावकऱ्यांची मागणी येताच तातडीने कारवाई करतो. धनगरवाडीच्या प्रस्तावावर पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. माणगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे यांनी माणगावात रोज ३६ लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो असे सांगून जुने माणगाव भागात फिल्टर पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार सुनील तटकरे यांच्यामार्फत प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यात येत आहे. लवकरच ती मिळेल असे सांगितले. टँकरला मंजुरी : १० गावे व ३९ वाड्यांना विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत. २९ गावे व ४३ वाड्यांसाठी टँकरला मंजुरी मिळाली आहे. पं.स. गटविकास अधिकारी पुरी यांनी देगाव आदिवासीवाडीचा प्रस्ताव आला असल्याचे सांगितले. नियम चुकीचाउपसभापती गजानन अधिकारी यांनी शासनाने बोअरिंग करताना २०० मीटरऐवजी ३०० मीटरची परवानगी देणे गरजेचे असल्याचे संगितले. ग्रामीण भागात माणसी ४० लिटर पाणी हा नियम चुकीचा आहे .