शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

महाड तालुक्यातील दासगावमध्ये पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:20 IST

दासगावमध्ये दासगाव मोहल्ला, बौद्धवाडी, बामणेकोंड. न्हावीकोंड, भोई आवाड, आदिवासीवाडी अशा जवळपास सात वाड्या आहेत. या वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे असलेले स्रोत आता आटू लागले आहेत.

सिकंदर अनवारे 

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावात ऐन कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट जाणवू लागले आहे. पुढील एक-दोन दिवसांतच कोथुर्डे धरणातील पाणीपुरवठा बंद होण्याची चिन्हे आहेत. गांधारी नदीमधील बंधाऱ्याच्या कामासाठी हे पाणी बंद केले जाणार असल्याने ही टंचाई जाणवणार असल्याचे सरपंच दिलीप उकिर्डे यांनी सांगितले.

दासगावमध्ये दासगाव मोहल्ला, बौद्धवाडी, बामणेकोंड. न्हावीकोंड, भोई आवाड, आदिवासीवाडी अशा जवळपास सात वाड्या आहेत. या वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे असलेले स्रोत आता आटू लागले आहेत. गावाला रायगड विभागातील कोथुर्डे गावातील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा मोहोप्रे गावापासून थेट पाइपलाइनद्वारे होत असला तरी कोथुर्डे ते मोहोप्रे या दरम्यान गांधारी नदीत पाणी सोडून केला जातो. मोहोप्रे येथे जॅकवेलमध्ये नदीतील पाणी उचलून त्याद्वारे पुढील गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गांधारी नदी पुनरुजीवन प्रकल्पातून या नदीत ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे हे पाणी बंधाऱ्याच्या ठिकाणी अडवले जाते. शिवाय बंधाºयाच्या कामास सुरुवात करताना पाणी सोडणे बंद केले जाते. यामुळे हे पाणी दोन दिवसांत बंद केले जाणार असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लघु पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.बंधाºयाच्या कामास सुरुवात होताच पाणी बंद करण्यात येणार आहे. यामुळे दासगावसह गांधारपाले, केंबुर्ली, वहूर या गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. उन्हाचे चटके जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दासगाव गावाशेजारी खाडीचे पाणी वाहत आहे. मात्र, हे पाणी दूषित असल्याने वापरात येत नाही. कोथुर्डे धरणातील पाणीच पिण्यासाठी वापरले जाते. गांधारीमध्ये पाणी सोडल्यानंतरच या गावांची तहान भागते. वारंवार तांत्रिक बिघाड आणि गांधारी बंधारे कामामुळे पाणीपुरवठा ठप्प होत आहे, यामुळे दासगावमध्ये पाणीटंचाई निर्माण होते.च्दासगाव गावाच्या वरील बाजूस असलेल्या कोंडीत पाण्याचा साठा आहे. मात्र, याठिकाणी बांधलेल्या बंधाºयातील पाणी खाली आणण्यास अद्याप कोणतीच योजना राबवली नाही. शिवाय औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीने लाखो रु पये खर्ची घालून पाणी योजना राबवली. मात्र, त्यामधून देखील पाणीपुरवठा होत नाही. यामुळे हे पैसे वाया गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावाला होणारा पाणी पुरवठा हा कोथुर्डे धरणातून होतो. मात्र, गांधारी नदीत होत असलेल्या बंधाऱ्यांच्या कामासाठी हे पाणी सोडणे बंद केले जाते. यातून ठेकेदाराचा फायदा होतो. मात्र, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे.- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगाव

टॅग्स :Raigadरायगडdroughtदुष्काळ