शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यातील दासगावमध्ये पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:20 IST

दासगावमध्ये दासगाव मोहल्ला, बौद्धवाडी, बामणेकोंड. न्हावीकोंड, भोई आवाड, आदिवासीवाडी अशा जवळपास सात वाड्या आहेत. या वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे असलेले स्रोत आता आटू लागले आहेत.

सिकंदर अनवारे 

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावात ऐन कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट जाणवू लागले आहे. पुढील एक-दोन दिवसांतच कोथुर्डे धरणातील पाणीपुरवठा बंद होण्याची चिन्हे आहेत. गांधारी नदीमधील बंधाऱ्याच्या कामासाठी हे पाणी बंद केले जाणार असल्याने ही टंचाई जाणवणार असल्याचे सरपंच दिलीप उकिर्डे यांनी सांगितले.

दासगावमध्ये दासगाव मोहल्ला, बौद्धवाडी, बामणेकोंड. न्हावीकोंड, भोई आवाड, आदिवासीवाडी अशा जवळपास सात वाड्या आहेत. या वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे असलेले स्रोत आता आटू लागले आहेत. गावाला रायगड विभागातील कोथुर्डे गावातील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा मोहोप्रे गावापासून थेट पाइपलाइनद्वारे होत असला तरी कोथुर्डे ते मोहोप्रे या दरम्यान गांधारी नदीत पाणी सोडून केला जातो. मोहोप्रे येथे जॅकवेलमध्ये नदीतील पाणी उचलून त्याद्वारे पुढील गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गांधारी नदी पुनरुजीवन प्रकल्पातून या नदीत ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे हे पाणी बंधाऱ्याच्या ठिकाणी अडवले जाते. शिवाय बंधाºयाच्या कामास सुरुवात करताना पाणी सोडणे बंद केले जाते. यामुळे हे पाणी दोन दिवसांत बंद केले जाणार असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लघु पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.बंधाºयाच्या कामास सुरुवात होताच पाणी बंद करण्यात येणार आहे. यामुळे दासगावसह गांधारपाले, केंबुर्ली, वहूर या गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. उन्हाचे चटके जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दासगाव गावाशेजारी खाडीचे पाणी वाहत आहे. मात्र, हे पाणी दूषित असल्याने वापरात येत नाही. कोथुर्डे धरणातील पाणीच पिण्यासाठी वापरले जाते. गांधारीमध्ये पाणी सोडल्यानंतरच या गावांची तहान भागते. वारंवार तांत्रिक बिघाड आणि गांधारी बंधारे कामामुळे पाणीपुरवठा ठप्प होत आहे, यामुळे दासगावमध्ये पाणीटंचाई निर्माण होते.च्दासगाव गावाच्या वरील बाजूस असलेल्या कोंडीत पाण्याचा साठा आहे. मात्र, याठिकाणी बांधलेल्या बंधाºयातील पाणी खाली आणण्यास अद्याप कोणतीच योजना राबवली नाही. शिवाय औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीने लाखो रु पये खर्ची घालून पाणी योजना राबवली. मात्र, त्यामधून देखील पाणीपुरवठा होत नाही. यामुळे हे पैसे वाया गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावाला होणारा पाणी पुरवठा हा कोथुर्डे धरणातून होतो. मात्र, गांधारी नदीत होत असलेल्या बंधाऱ्यांच्या कामासाठी हे पाणी सोडणे बंद केले जाते. यातून ठेकेदाराचा फायदा होतो. मात्र, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला आहे.- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगाव

टॅग्स :Raigadरायगडdroughtदुष्काळ