शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

म्हसळा तालुक्यातील ८ गावे, ४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:55 IST

शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीने म्हसळा तहसीलदार कार्यालयात दिले आहे.

म्हसळा : यंदा म्हसळा तालुक्यातही पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, त्यातच शासनाने लघू पाटबंधारे विभागामार्फत ऐन पाणीटंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत, याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे आणि चार वाड्या आता टंचाईग्रस्त झाल्या आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीने म्हसळा तहसीलदार कार्यालयात दिले आहे.पावसाच्या अवकृपेचा म्हसळा तालुक्यालाही चांगलाच तडाखा बसला आहे, त्यामुळे म्हसळा तालुक्यातही पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. म्हसळा तालुक्यातील खरसई त्याचप्रमाणे पाभरे व इतर धरणे पावसामध्ये तुडुंब भरलेली असतानाच ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीस पाणी विसर्ग केल्याने तालुक्यातील संबंधित पाभरे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे टंचाईग्रस्त झाली आहेत. तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना काम सुरू असल्यामुळे बंद आहे. त्याचा फटका आठ गावे आणि चार वाड्या आता टंचाईग्रस्त झाल्या आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन नपापु योजना समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष मनोज नाक्ती, सचिव सखाराम पवार आदी सदस्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. या समितीने शासनाला लागलीच पाणीपुरवठा करण्यासाठी दखल घ्यावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करू किंवा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशाराही दिला आहे.युती शासनाच्या कार्यकाळात तत्कालीन टंचाईग्रस्त तोंडसुरेपंचक्र ोशीमधील मूळगाव तोंडसुरे, सकलप-खारगाव खुर्द, रेवळी, बनोटी, गणेशनगर, वरवठणे, आगरवाडा, पेडांंबे ही आठ गावे आणि जंगमवाडी, तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणेकोंड, आगरवाडा येथील बौद्धवाडी या चार वाड्यांंकरिता म्हसळा पाभरे धरणामधून विंधण विहिरीमार्फत मोठ्या खर्चाची तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. शासनाची ही योजना काही तांत्रिक अडचणी वगळता गेली २० वर्षे सातत्यपूर्ण कार्यान्वित आहे. या योजना रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून, मोठ्या उत्पन्नाची व तेवढीच खर्चिकही आहे. तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत: धरणाचे उगमस्थान असलेल्या पाण्यावर अवलंबून असल्याने आणि हे धरण नादुरु स्त झाल्याने त्याच्यादुरु स्तीकरिता धरणातील बहुतांश साठवून ठेवलेले पाणी विसर्ग करण्यात आले आहे. हे दुरु स्तीचे काम शासनाचे लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेतले आहे.धरणात पाणीसाठा नसल्याने येथील पाणी योजनेच्या सर्व विहिरी आटल्या आहेत, त्यामुळे त्याचा मोठा फटका पाभरे गाव, खारगाव बुद्रुक, सुरई येथील योजनांसह मोठ्या लोकवस्तीच्या तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतील आठ गावे आणि चार वाड्यांना बसला आहे. या गावांना शासनाने तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.पाभरे धरणातील पाण्याचा विसर्गआठ गावे, चार वाड्यांची नपापु योजना पाभरे धरणाच्या पाणी स्रोतावर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी या धरणाच्या दुरु स्तीला लघू पाटबंधारे विभागाने धरणावर अवलंबून असलेल्या योजना समितीना काहीही माहिती न देता ऐन टंचाईकाळात धरणातील पाण्याचा विसर्ग केला. त्यामुळे योजनेचे विहिरीतील पाणी आटले आणि आमची योजना पाण्याअभावी बंद पडली आहे. आम्ही रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघू पाटबंधारे विभाग, गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देऊन सांगितले.त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही ही बाब गंभीर असून पूर्वी ही गावे टँकरग्रस्त होती ती नपापु योजनेने टँकरमुक्त झाली होती. आता शासनानेच ऐन उन्हाळ्यात पुन्हा आठ गावे आणि चार वाड्या टँकरग्रस्त केल्या आहेत. धरणदुरु स्तीचे हे काम मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात घ्यायला हवे होते किंवा पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, असे तोंडसुरे नपापु योजना समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी