शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५५० गावांत पाणी योजना यशस्वी; लोकवर्गणी आणि श्रमदानामुळे अचूक नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 04:05 IST

रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून २९ हजार ९५३ घरांना व १ लाख ५० हजारपेक्षा अधिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीची वर्षानुवर्षांची पायपीट आता थांबल्यामुळे या सर्व गावांतील महिलावर्ग सुखावला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्याच्या हेतूने ‘स्वदेस फाउंडेशन’ या अशासकीय स्वयंसेवी संस्थेमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक घरामध्ये वर्षभर स्वच्छ व पुरेसे पिण्यायोग्य पाणी नळाद्वारे पुरविणे,गाव पातळीवरील पाण्याचे नियोजन व बळकटीकरण करण्यासाठी पाणी समितीची स्थापना करणे व सक्षमीकरण करणे आणि शासकीय व उपलब्ध साधनसामग्री आणि स्रोताचा योग्यरीत्या वापर करणे अशी तीन उद्दिष्टे प्रकल्पाची आहेत.पाणी प्रकल्पासाठी ग्रामस्थांचा विनंती अर्ज प्राप्त होताच, स्वदेस टीम संपूर्ण गावाची सभा घेवून पाणी प्रकल्पाच्या रचनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाते. प्रत्येक घराला किमान २०० लिटर स्वच्छ पाणी दर दिवशी नळाद्वारे पुरविणे हा मुख्य उद्देश ठेवून प्रकल्पाची रचना करण्यात येते. तज्ज्ञ अभियंत्यांकडून गावातील अस्तित्वात असणाऱ्या व परिसरातील पाणी स्रोताचे सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर पाणी प्रकल्प आराखडा तयार करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी विहीर, बोअरवेल, झºयाचे बांधकाम, साठवण टाकी, प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन, गरजेनुसार पाणी उपसण्यासाठी सौर पंप अशा प्रकारची कामे सुचविण्यात येतात. आराखड्यामध्ये सुचविलेल्या उपायाची माहिती ग्रामस्थांना देण्यात येते. ग्रामस्थांच्या संमतीने कोणत्या प्रकारची कामे करायची हे ठरवून आणि जागा मालकाची ना हरकत घेऊन काम केले जाते. नवीन पाणी योजनेसाठी प्रत्येक कुटुंबाकडून ४ हजार रुपये तर आदिवासी व धनगर कुटुंबाकडून ५०० रु पये लोकवर्गणी घेण्यात येते. फक्त नळ कनेक्शन करायचे असल्यास २ हजार रुपये वर्गणी घेण्यात येते. प्रकल्प अंमलबजावणीसाठी महिलांच्या सहभागासह पाणी समिती स्थापना करण्यात येते. प्रकल्प पूर्व आणि प्रकल्प पश्चात प्रशिक्षण देण्यात येते. सर्व ना हरकत दाखले व लोकवर्गणी स्वदेसकडे आल्यानंतर ठेकेदार नियुक्तीनंतर काम सुरु होते. समिती सदस्य देखरेख करतात. मुख्य पाइपलाइनपासून घरापर्यंतच्या पाइपलाइनसाठी ग्रामस्थ श्रमदान करतात. ग्रामस्थ श्रमदान करून साहित्याची वाहतूक करतात. पाणी प्रकल्प झाल्यावर तीन महिने देखभाल दुरुस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पाणी समिती आणि ग्रामस्थांची असते. पाणी साठवण टाकीजवळच पाणी शुद्धीकरण सयंत्र बसविण्यात येते. स्वदेसने राबवण्यात आलेल्या योजनामध्ये ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो व यामुळेच पाणी प्रकल्प यशस्वी होत आहेत. काही प्रकल्पामध्ये पाणी स्रोताची कमतरता असल्यामुळे इतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुनर्सर्वेक्षण करून पाणी समस्या सोडवण्यात येत आहे.१९ गावांत सौरऊर्जेवर चालणारे पंपविजेच्या जोडणीच्या समस्येवर मात करण्यासाठी १९ गावांत स्वदेसने अतिरिक्त खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबवली आहे. स्वदेसचे विश्वस्त रॉनी स्क्रूवाला व झारिना स्कू्रवाला यांनी प्रकल्प यशस्वी झालेल्या गावांत जावून ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. स्वदेसने राबवण्यात आलेल्या योजनामध्ये ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो व यामुळेच पाणी योजना यशस्वी होत आहेत. दक्षिण रायगडमध्ये पाणीटंचाई असणाºया गावांनी स्वदेसजवळ संपर्क साधून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन स्वदेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी केले आहे.

टॅग्स :Waterपाणी