शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

VIDEO: पाणी कंपनीसाठी नागरिकांना नाही, अधिकाऱ्याच्या उत्तराने शेकाप कार्यकर्त्यांचा संताप

By राजेश भोस्तेकर | Updated: September 1, 2022 15:05 IST

एमआयडीसी पाणी हे उसर येथील गेलं कंपनीसाठी आहे नागरिकांसाठी नाही. असे उत्तर शेकापच्या शिष्टमंडळाला अधिकारी यांनी दिले.

अलिबाग : 

एमआयडीसी पाणी हे उसर येथील गेलं कंपनीसाठी आहे नागरिकांसाठी नाही. असे उत्तर शेकापच्या शिष्टमंडळाला अधिकारी यांनी दिले. अधिकाऱ्याच्या या उर्मट उत्तराने शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी झेडपी सदस्य संजय पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते यांचा पारा चढला आणि अधिकारी याना चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला. यावेळी वातावरण तंग झाले. जोपर्यंत अधिकारी माफी मागत नाही आणि २६ गावांचा पाणी प्रश्न सुटला जात नाही तोपर्यंत जाणार नाही असा पवित्रा शेकाप मोर्चेकरी यांनी घेतली. अखेर जमावाच्या रोषासमोर अधिकारी यांनी नमते घेत माफी मागितली. पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करतो असे सांगितल्यावर वातावरण शांत झाले. ऐन गणपती काळात २६ गावामध्ये पाणी समस्या निर्माण झाली होती.

अलिबाग तालुक्यातील २६ गावांना ऐन गणेशोत्सव काळात पाणी समस्येला सामोरे जावे लागले आहे. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते हे गुरुवारी १ सप्टेंबर रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयात अधिकारी याची भेट घेण्यास आणि पाणी समस्याबाबत चर्चा करण्यास गेले होते. यावेळी अधिकारी याच्या उर्मट उत्तराने मोर्चेकरी हे संतप्त होऊन वातावरण चिघळले होते.

अलिबाग तालुक्यातील गेल कंपनीला एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. एमआयडीसीच्या लाईंनवरून त्या हद्दीतील २६ गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या गावांना एमआयडीसीचे पाणी मिळते. गेल कंपनीत बांधकामसाठी पाणी आवश्यक असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कंपनीने एमआयडीसीला सांगितले. त्यानुसार एम आय डी सी कडून लाईन चे काम सुरू करण्यात आले. मात्र त्यामुळे गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाला. आणि नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले. गणपती सण असताना पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

एम आय डी सी मार्फत होणारा पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत शेकाप शिष्टमंडळ आणि कार्यकर्ते हे एम आय डी सी कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्या कक्षात दाखल झाले. यावेळी पाणी पुरवठा होत नसल्याचे शिष्टमंडळाने म्हटले असता, पाणी हे गेल कंपनी साठी आहे नागरिकांसाठी नाही असे उत्तर ननवरे यांनी दिले. त्यामुळे वातावरण तंग होऊन सर्वांनी अधिकारी यांना धारेवर धरले. यावेळी अधिकारी यांचे मोबाईल, डायरी, पाणी बॉटल, ग्लास हे संतप्त जमावाने फेकून दिले. जमावाचा रोष आणि आरडा ओरड ऐकून कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी धावत आले. त्यानंतर त्यांनी जमावाला शांत करण्यास सुरुवात केली. पोलिसांना बोलावण्याची भाषा अधिकारी यांनी केल्यानंतर बोलवा पोलिसांना असा पावित्रा जमाव कर्त्यानी घेतला.

ननवरे हे बोललेल्या वाक्यावर माफी मागत नाहीत आणि पाणी कधी देणार याचे उत्तर दिल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा शेकापने उचलला. कार्यकारी अभियंता यांनी माफी मागितल्यानंतर वातावरण शांत झाले. त्वरित पाणी सुरू करतो असे आश्वासनही देण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी