शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महाड एमआयडीसीत जलवाहिनीला गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 23:14 IST

प्रतिदिन हजारो लिटर पाणी वाया : दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या वाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दुरुस्ती न झाल्याने खोदकाम केलेल्या खड्ड्यांत हे पाणी साचल्याने ई-झोनमधील गटाराला तलावाचे स्वरूप आले आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचे या परिसरातील कंपन्यांच्या कामगारांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून ही गळती सुरू असूनदेखील महाड औद्योगिक महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाड औद्योगिक परिसराला पोलादपूरमधील रानबाजिरे धरणातून पिण्याच्या पाण्याचा आणि औद्योगिक वापरासाठी पुरवठा केला जातो. ज्या वाहिनीमधून हे पाणी पुरवले जाते ती जुनी झाली आहे. काही ठिकाणी ती बदलण्यात आली असली तरी काही ठिकाणी जीर्ण वाहिनीतूनच पाणी पुरवठा होत असल्याने गळती सुरू होते.

महाड एमआयडीसीमधील ई-झोनमध्ये एम. एस. केमिकल, अमृत केमिकल, कन्सेप्ट, जॉयसन अमोनिझ, मॅक आॅर्गनिक्स, जेट इन्सुलेशन, ओमकार केमिकल, फ्लुबॉर, खंडोबा इंडस्ट्रीज अशा विविध छोट्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना पुरवठा होत असलेली वाहिनीला ओमकार केमिकल जवळ गळती लागली आहे. २०१८ च्या मे महिन्याच्या आधीपासून ही गळती सुरू आहे. या बाबत परिसरातील कंपन्यांनी पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे पत्र महाड औद्योगिक महामंडळाच्या महाड कार्यालयाला दिले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये हे पत्र देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

दुरु स्तीकरिता या ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात उन्हाळ्यातही पाणी साचून राहत होते. शेजारील कंपन्यातील रासायनिक पदार्थ पावसाच्या पाण्याने याच खड्ड्यात येऊन साचले आहेत, यामुळे खड्ड्यातील पाणी रंगीत बनले आहे. ज्या ठिकाणी पाइपलाइन आहे त्या ठिकाणी महाड औद्योगिक परिसरातील गटारदेखील आहेत. यामुळे या लिकेजमधून बाहेरील पाणीही पाइपलाइनमध्ये शिरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असण्याची शक्यता आहे, यामुळे या परिसरातील कारखान्यांच्या कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र, कंपन्यांमध्ये पाणी शुद्धिकरण यंत्रणा असली तरी महाड परिसरातील कंपन्यांना एमआयडीसीच दूषित पाणी देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

जलवाहिनी जुनी असल्याने दुरु स्तीसाठी निविदा काढली होती, निविदा प्रक्रिया पूर्ण नसल्याने कामासाठी विलंब झाला होता. आता कार्यादेश प्राप्त होताच काम सुरू के ले जाईल.- एस.एस.गीते, उपअभियंता, एमआयडीसी, महाड 

तांत्रिक त्रुटींमुळे पाणी वायाच्ई-झोनमधील कंपन्यांनी ही बाब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली होती. मात्र, पाइपलाइनच्या पाण्याचा फ्लो मोठा असल्याने बाहेरील पाणी आत जाणे शक्य नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून वेळ मारून नेली आहे.च्एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू असून महाड औद्योगिक क्षेत्रात मात्र रानबाजिरे धरणातील पाणी एमआयडीसीच्या तांत्रिक चुकांमुळे वाया जात आहे. यामुळे पाणीगळती रोखली जावी, अशी मागणी वारंवार करूनही दुर्लक्ष होत आहे. पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया घालवले जात असल्याने संबंधित अधिकाºयांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी