शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महाड एमआयडीसीत जलवाहिनीला गळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 23:14 IST

प्रतिदिन हजारो लिटर पाणी वाया : दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या वाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दुरुस्ती न झाल्याने खोदकाम केलेल्या खड्ड्यांत हे पाणी साचल्याने ई-झोनमधील गटाराला तलावाचे स्वरूप आले आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचे या परिसरातील कंपन्यांच्या कामगारांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून ही गळती सुरू असूनदेखील महाड औद्योगिक महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाड औद्योगिक परिसराला पोलादपूरमधील रानबाजिरे धरणातून पिण्याच्या पाण्याचा आणि औद्योगिक वापरासाठी पुरवठा केला जातो. ज्या वाहिनीमधून हे पाणी पुरवले जाते ती जुनी झाली आहे. काही ठिकाणी ती बदलण्यात आली असली तरी काही ठिकाणी जीर्ण वाहिनीतूनच पाणी पुरवठा होत असल्याने गळती सुरू होते.

महाड एमआयडीसीमधील ई-झोनमध्ये एम. एस. केमिकल, अमृत केमिकल, कन्सेप्ट, जॉयसन अमोनिझ, मॅक आॅर्गनिक्स, जेट इन्सुलेशन, ओमकार केमिकल, फ्लुबॉर, खंडोबा इंडस्ट्रीज अशा विविध छोट्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना पुरवठा होत असलेली वाहिनीला ओमकार केमिकल जवळ गळती लागली आहे. २०१८ च्या मे महिन्याच्या आधीपासून ही गळती सुरू आहे. या बाबत परिसरातील कंपन्यांनी पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे पत्र महाड औद्योगिक महामंडळाच्या महाड कार्यालयाला दिले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये हे पत्र देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

दुरु स्तीकरिता या ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात उन्हाळ्यातही पाणी साचून राहत होते. शेजारील कंपन्यातील रासायनिक पदार्थ पावसाच्या पाण्याने याच खड्ड्यात येऊन साचले आहेत, यामुळे खड्ड्यातील पाणी रंगीत बनले आहे. ज्या ठिकाणी पाइपलाइन आहे त्या ठिकाणी महाड औद्योगिक परिसरातील गटारदेखील आहेत. यामुळे या लिकेजमधून बाहेरील पाणीही पाइपलाइनमध्ये शिरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असण्याची शक्यता आहे, यामुळे या परिसरातील कारखान्यांच्या कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र, कंपन्यांमध्ये पाणी शुद्धिकरण यंत्रणा असली तरी महाड परिसरातील कंपन्यांना एमआयडीसीच दूषित पाणी देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

जलवाहिनी जुनी असल्याने दुरु स्तीसाठी निविदा काढली होती, निविदा प्रक्रिया पूर्ण नसल्याने कामासाठी विलंब झाला होता. आता कार्यादेश प्राप्त होताच काम सुरू के ले जाईल.- एस.एस.गीते, उपअभियंता, एमआयडीसी, महाड 

तांत्रिक त्रुटींमुळे पाणी वायाच्ई-झोनमधील कंपन्यांनी ही बाब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली होती. मात्र, पाइपलाइनच्या पाण्याचा फ्लो मोठा असल्याने बाहेरील पाणी आत जाणे शक्य नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून वेळ मारून नेली आहे.च्एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू असून महाड औद्योगिक क्षेत्रात मात्र रानबाजिरे धरणातील पाणी एमआयडीसीच्या तांत्रिक चुकांमुळे वाया जात आहे. यामुळे पाणीगळती रोखली जावी, अशी मागणी वारंवार करूनही दुर्लक्ष होत आहे. पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया घालवले जात असल्याने संबंधित अधिकाºयांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी