शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अंबा खोऱ्यातील पाणी जेएसडब्ल्यूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:05 IST

शेतकऱ्यांची मागणी डावलली : कंपनी-जलसंपदा विभागाचा करार रद्द करण्याची श्रमिक मुक्ती दलाची मागणी

आविष्कार देसाई 

अलिबाग : पाण्याचे नियोजन करताना आधी पिण्यासाठी, नंतर शेतीसाठी आणि शेवटी उद्योगांसाठी वितरित करण्याचा नियम आहे. मात्र अंबा खोºयाचे पाणी स्थानिक शेतकºयांच्या तोंडातून काढून थेट जेएसडब्ल्यू कंपनीच्या घशात घालण्यासाठी आरक्षित केल्याची बाबमाहिती अधिकारातून उघड झाली आहे. शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, नियमांना हरताळ फासून जेएसडब्ल्यू कंपनीसोबत जलसंपदा विभागाने केलेला करार तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास अंबा खोºयाचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

अलिबाग तालुक्यातील अंबा खोºयाच्या पाण्यावर प्रथम स्थानिकांचा अधिकार आहे. यासाठी शहापूर-धेरंडसह परिसरातील अन्य गावांतील शेतकºयांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करून सरकारकडे अंबा खोºयाच्या पाण्यासाठी मागणी केली आहे. मात्र सरकारने स्थानिकांना अंधारात ठेवून जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासाठी अंबा खोरे प्रकल्पातून तब्बल ४६.६६ दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन वितरित करण्याचा करार जलसंपदा विभागाने केला आहे.२०१६ ते २०२२ या कालावधीत कंपनीला पाणीपुरवठा करण्याचा करारामध्ये उल्लेख करण्यात आल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.कंपनीचा सरकारी जमिनीवर जसा डोळा आहे, तसाच अंबा खोºयाच्या पाण्यावरही डोळा आहे. त्यामुळेच विस्तारित प्रकल्पासाठी पर्यावरणीय सुनावणी झाली तेव्हा फक्त या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांनाच सुनावणीला बोलावले होते.विस्तारित प्रकल्पात आमच्या जमिनी जाणार नसल्या तरी आमच्या हक्काचे पाणी कंपनी घेणार असल्याने आम्हालाही सुनावणीला बोलावणे गरजेचे होते, असे श्रमिक मुक्तीदलाचे नेते राजन भगत यांनी स्पष्ट केले.जेएसडब्ल्यू कंपनीने केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे जो प्रस्ताव सादर केला आहे, त्यामध्ये अंबा खोºयातील ४६.६६ दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन कंपनीला मिळणार आहे.यासाठी कंपनीने जलसंपदा विभागाबरोबर करार केला आहे. त्यामधील कागपत्रांच्या आधारे सदर बाब उघड झाली आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी सांगितले.रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी, जेएसडब्ल्यूला ८ फेब्रुवारी २०१६ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार ही बाब उघड झाली आहे. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग कोकण प्रदेश नवी मुंबई यांच्या२००२ मधील पत्रानुसार ३४ दशलक्ष पाणी इस्पातला मिळत होते.करारनाम्यानुसार २२ पर्यंत आरक्षण१जेएसडब्ल्यू स्टील लि. यांना ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन तर अंबा रिव्हर कोक लि. यांना ७.०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाण्याचे आरक्षण मिळावे, अशी विनंती करण्यात आली.२त्यानुसार रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कंपनीसोबत अंबा प्रकल्पांतर्गत नागोठणेतील बंधाºयातून ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतक्या बिगर सिंचन पाणी वापराबाबतचा करारनामा केला आहे.३करारनाम्यासोबत ३ कोटी २७ लाख ८९ हजार इतकी बँक हमी दिली आहे. या करारनाम्याचा कालावधी ४ फेब्रुवारी २०१६ ते ३ फेब्रुवारी २०२२ असा ६ वर्षांचा राहणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.करारनाम्यानुसार २२ पर्यंत आरक्षण१जेएसडब्ल्यू स्टील लि. यांना ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन तर अंबा रिव्हर कोक लि. यांना ७.०० दशलक्ष लीटर प्रतिदिन पाण्याचे आरक्षण मिळावे, अशी विनंती करण्यात आली.२त्यानुसार रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कंपनीसोबत अंबा प्रकल्पांतर्गत नागोठणेतील बंधाºयातून ४६.६६ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतक्या बिगर सिंचन पाणी वापराबाबतचा करारनामा केला आहे.३करारनाम्यासोबत ३ कोटी २७ लाख ८९ हजार इतकी बँक हमी दिली आहे. या करारनाम्याचा कालावधी ४ फेब्रुवारी २०१६ ते ३ फेब्रुवारी २०२२ असा ६ वर्षांचा राहणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.पुनर्सर्वेक्षण रखडलेच्अंबा खोरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला असता तर अलिबाग, पेण आणि रोहा तालुक्यातील ४३ गावांतील ६६९९ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असती.च्त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील ४८२७ हेक्टरचा समावेश होता. परंतु जलसंपदा विभागाच्या उदासीनतेमुळे कालव्याचे काम झालेच नाही. ही बाब लक्षात घेऊन श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी २००७ मध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन केले होते.च्अंबा खोºयाचे पाणी शेतीला मिळाले पाहिजे, यासाठी शेतकºयांनी गेली अनेक वर्षे संघर्ष केला आहे. २००७ मध्ये तब्बल २० दिवसांचे ठिय्या आंदोलन केले होते. २००८ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेऊन कालव्याचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.च्२००९ मध्ये अधीक्षक अभियंता ठाणे पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाला अहवाल सादर केला. परंतु पुढे काहीच झाले नाही.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग