शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

पाली शहरात कचऱ्यामुळे पसरले घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:16 IST

सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत.

- विनोद भोईरपाली : सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत. अशातच पालीत कचरा व्यवस्थापन सातत्याने कुचकामी ठरत असून पालीत नेहमीच घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तुटलेल्या कचराकुंड्या व त्यातून केरकचरा ओढणारे पाळीव प्राणी हे दृश्य पाहून कचरा व्यवस्थापन किती कुचकामी आहे, याची प्रचिती येते. रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या घाण केरकचºयाने तुडुंब भरलेल्या आहेत, त्यातून दुर्गंधी बाहेर पडून नागरिकांना येता-जाता याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो. अशातच पालीत दाखल होणाºया भाविक भक्तांनादेखील नाक धरुन जाण्याची नामुष्की ओढवते.उघड्यावरील घाणीमुळे अस्वच्छता व रोगराईची भीती वाढली आहे. पालीत स्वच्छता अभियानाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. गुरेढोरे अन्नाच्या शोधात कचराकुंड्यांना चारी बाजूने घेरतात. कचराकुंड्यात तोंड खुपसतात व कुंड्यातील प्लॅस्टिक व इतर पदार्थ गिळंकृत करतात. परिणामी अनेकदा गुरेदेखील दगावत असल्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात तर कचºयाची समस्या अधिक उग्र रुप धारण करण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.गटारे, नाले कचºयामुळे तुंबले असून, त्यातील घाण व सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे.पालीतील कचराकुंड्या ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून उपसल्या जातात. परंतु पालीच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत व पालीतील कचºयाच्या ढिगासमोर मोजके सफाई कर्मचारी किती कष्ट उपसणार हेदेखील पाहणे गरजेचे आहे.अनेकदा पालीला स्वच्छ करण्यासाठी श्री सदस्यांचे हात अधिक मोलाची कामगिरी बजावताना दिसत आहेत. ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पालीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पालीत स्वच्छता राखण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच तहसील कार्यालय व बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट आदींनी पाली गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कचराकुं ड्यांची गरजसामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था व सक्षम नागरिकांनी ग्रामपंचायतीला कचराकुंड्या भेट स्वरुपात देणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून एक पाऊल स्वच्छतेकडे टाकल्यास स्वच्छ पाली, सुंदर पालीचा नारा प्रत्यक्षात कृतीत उतरलेला पहावयास मिळेल. अन्यथा पालीला बकाल स्वरुप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.पाली शहराचा विस्तार झपाट्याने होत असून त्या प्रमाणात ग्रामपंचायतीला शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने जेवढा निधी येतो त्यामध्ये आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच कचरा कुंड्यांची व्यवस्था करणार आहोत.- गणेश बालके, सरपंच पाली ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड