शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाली शहरात कचऱ्यामुळे पसरले घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:16 IST

सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत.

- विनोद भोईरपाली : सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत. अशातच पालीत कचरा व्यवस्थापन सातत्याने कुचकामी ठरत असून पालीत नेहमीच घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तुटलेल्या कचराकुंड्या व त्यातून केरकचरा ओढणारे पाळीव प्राणी हे दृश्य पाहून कचरा व्यवस्थापन किती कुचकामी आहे, याची प्रचिती येते. रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या घाण केरकचºयाने तुडुंब भरलेल्या आहेत, त्यातून दुर्गंधी बाहेर पडून नागरिकांना येता-जाता याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो. अशातच पालीत दाखल होणाºया भाविक भक्तांनादेखील नाक धरुन जाण्याची नामुष्की ओढवते.उघड्यावरील घाणीमुळे अस्वच्छता व रोगराईची भीती वाढली आहे. पालीत स्वच्छता अभियानाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. गुरेढोरे अन्नाच्या शोधात कचराकुंड्यांना चारी बाजूने घेरतात. कचराकुंड्यात तोंड खुपसतात व कुंड्यातील प्लॅस्टिक व इतर पदार्थ गिळंकृत करतात. परिणामी अनेकदा गुरेदेखील दगावत असल्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात तर कचºयाची समस्या अधिक उग्र रुप धारण करण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.गटारे, नाले कचºयामुळे तुंबले असून, त्यातील घाण व सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे.पालीतील कचराकुंड्या ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून उपसल्या जातात. परंतु पालीच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत व पालीतील कचºयाच्या ढिगासमोर मोजके सफाई कर्मचारी किती कष्ट उपसणार हेदेखील पाहणे गरजेचे आहे.अनेकदा पालीला स्वच्छ करण्यासाठी श्री सदस्यांचे हात अधिक मोलाची कामगिरी बजावताना दिसत आहेत. ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पालीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पालीत स्वच्छता राखण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच तहसील कार्यालय व बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट आदींनी पाली गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कचराकुं ड्यांची गरजसामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था व सक्षम नागरिकांनी ग्रामपंचायतीला कचराकुंड्या भेट स्वरुपात देणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून एक पाऊल स्वच्छतेकडे टाकल्यास स्वच्छ पाली, सुंदर पालीचा नारा प्रत्यक्षात कृतीत उतरलेला पहावयास मिळेल. अन्यथा पालीला बकाल स्वरुप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.पाली शहराचा विस्तार झपाट्याने होत असून त्या प्रमाणात ग्रामपंचायतीला शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने जेवढा निधी येतो त्यामध्ये आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच कचरा कुंड्यांची व्यवस्था करणार आहोत.- गणेश बालके, सरपंच पाली ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड