शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धुवा‘धार’

By admin | Updated: October 3, 2015 02:29 IST

हस्त नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा पाऊस भाताच्या लोंब्या तयार झालेल्या पिकास नुकसानकारक ठरु शकतो असा अंदाज भातशेती

अलिबाग : हस्त नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा पाऊस भाताच्या लोंब्या तयार झालेल्या पिकास नुकसानकारक ठरु शकतो असा अंदाज भातशेती आणि पर्जन्यमानाच्या नैसर्गिक गणिताचे अभ्यासक बाळकृष्ण नारायण जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.रायगड जिल्ह्यात १ जून ते २ आॅक्टोबर या काळात सरासरी २ हजार ०२३ मि.मी. पाऊस पडला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४८ मिमी असा सर्वाधिक पाऊस माणगांव येथे झाला आहे. अलिबाग ५ मि.मी., पेण ७.४० मि.मी., मुरु ड १५ मि.मी., पनवेल १ मि.मी., उरण २ मि.मी., कर्जत १६ मि.मी., खालापूर ४२ मि.मी., रोहा ३२ मि.मी., पाली-२०.५० मि.मी., तळा १६ मि.मी., महाड २८ मि.मी., पोलादपूर ३३ मि.मी., म्हसळा २५.६० मि.मी., श्रीवर्धन ३० मि.मी., माथेरान १७ मि.मी. अशी जिल्ह्यात एकूण ३३०.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.----------दासगांव : गेली महिनाभर पावसाने दडी मारल्याने उभे भातपीक करपते की काय अशी अवस्था निर्माण झाली असताना गेली दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने भातपिकाला जीवदान मिळाले आहे. यामुळे तोंडाचा घास जातो की काय या चिंतेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना सरत्या पावसाने मात्र दिलासा दिला आहे.राज्यात सर्वत्र दुष्काळी चित्र असतानाच कोकणात देखील पावसाअभावी भातपीक करपून जाते की काय अशी भीती निर्माण झाली असतानाच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने ही शेतकरी सुखावला आहे. कोकणात उशिराने सुरू झालेला पाऊस म्हणावा तसा बरसला नाही. यामुळे कोकणातील उंच सखल भौगोलिक स्थितीमुळे जिथे पाणी मिळाले त्या शेतकऱ्यांनी भात लावणी लवकर केली मात्र ज्यांना पाणीच उपलब्ध झाले नाही त्यांची भात लावणी जवळपास महिनाभर उशिराने झाली. शिवाय पाण्याअभावी अनेकांनी भातलावणीच झालीच नाही. अशास्थितीत कोकणात मुसळधार पडणारा पाऊस आॅगस्टमध्येच गायब झाला. भाताची रोपे बहरली असली तरी अद्याप भाताच्या लोंब्या बाहेर पडल्या नाहीत. पुरेसे पाणी आणि पोषक वातावरणाची गरज या लोंब्या बाहेर पडण्याकरिता असते. मात्र सकाळी वातावरणात धुके असल्याने पाऊस गेला की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. पाऊस पडला नाही तर पिकावर विविध रोगांची लागण आणि भाताच्या लोंब्या तयार होणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते.गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाचे पुनरागमन झाले. सायंकाळी नऊ वाजेपर्यंत हा पाऊस सुरु राहिल्याने शेतामध्ये बऱ्यापैकी पाणी साचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)महाडमध्ये मुसळधारमहाडमध्ये शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी २.३० वा. सुरु झालेल्या पावसाची संततधार दोन तास सुरुच होती. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. तर बाजारहाट करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची या पावसामुळे धावपळ उडाल्याचे दिसून आले.-------------हस्त नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा१अलिबाग तालुक्यात झालेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने भातपिकास तूर्तास दिलासा मिळाला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. कसाबसा आपल्या शेतीवर खर्च करून जमीन लागवडीखाली आणत भात पीकाची पेरणी केली.२निसर्गाच्या अनियमितपणाचा फटका शेतकऱ्याला बसतो. गुरूवारच्या पावसाने उथळ भागाच्या म्हणजे डोंगरालगतची शेती आहे. त्या शेतीला पावसाची आवश्यकता होती.तेथील भाताची लोंबी अडकून राहिली होती. जमिनीला भेगा पडल्या होत्या. मात्र जिथे पाण्याचा निचरा आहे. त्या जमिनीत ओलाव्यामुळे भातपीक बऱ्यापैकी आले आहे. ३शेतकऱ्यांचे असे शस्त्र आहे की, हस्त नक्षत्राचा पाऊस झाला तर कणसातील दाणा भरतो व भाताला वजन येते तसेच पडलेल्या पावसामुळे पाण्याला पुरवठा होता. तरीसुद्धा कालच्या पावसामुळे तापलेल्या शेतीला थंडावा मिळाला हे नक्की.