शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

उमटे धरणातील भिंतीची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:18 IST

ग्रामस्थांमध्ये घबराट । वर्षभरापूर्वीच केली डागडुजी; मात्र परिस्थिती जैसे थे

- आविष्कार देसाई

अलिबाग : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाची योग्य डागडुजी न केल्यामुळे ते फुटून २३ नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. तशीच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची होण्याची शक्यता स्थानिकांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.

सध्या धरणाच्या कमकुवत झालेल्या भिंतीतून पाणी वेगाने झिरपत आहे. त्याचप्रमाणे धरणाच्या तळाकडील बाजूनेही पाणी बाहेर फेकले जात आहे. त्यामुळे भिंत फुटण्याचा धोका अधिक वाढला आहे. सुमारे ४१ वर्षे वयोमान असणाऱ्या धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या वर्षी वरच्यावर मलमपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या पावसात धरणाची काय स्थिती राहील याबाबत ग्रामस्थांमध्ये घबराट आहे.

तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाºया उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाच्या कालावधीमध्ये पाण्याचा दाब प्रचंड वाढून धरणाच्या भिंतीला भगदाड पडून फार मोठ्या आपत्तीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिकांनी याबाबत सातत्याने प्रशासनाला निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेत धरणाची थातूरमातूर डागडुजी केल्याचा आरोप ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी केला.

धरणाच्या भिंतीतील दगडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने भले मोठे भगदाड पडले होते. जिल्हा परिषदेने यातील काही भिंतीची दुरुस्ती केली,परंतु केलेले कामच निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमटे धरणाची क्षमता ८७ दलघमी पाणी साठ्याची आहे. त्यातच पावसाचा जोर अधूनमधून वाढत असल्याने पूर्ण क्षमतेने धरण भरण्यास काहीच कालावधी लागणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यास धरणाच्या पोटातील पाण्याचा ताण हा धरणाच्या भिंतीवर येण्याची शक्यता आहे. भिंती आधीच कमकुवत झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने केलेले काम हे कुचकामी ठरून मोठी आपत्ती ओढवू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या तीव्र भावनांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते. उमटे धरणाचा प्रश्नाबाबत वेळीच योग्य दखल घेतली गेली नाही तर, काही तरी विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवन-मरणाच्या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. याच प्रकरणात सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जनता दल सेक्युलरचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

२००९ साली अलिबागमध्ये राज्यस्तरीय पाणी परिषद पार पडली होती. त्यामध्ये राज्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली होती. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मात्र जिल्ह्यात कमी संख्येने धरणे आहेत, तसेच जी आहेत त्याची पाणी साठवण क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे पावसाचे अब्जो लीटर पाणी समुद्राला जाऊन मिळते. जुन्या धरणांची डागडुजी आणि नव्याने काही धरणांची निर्मिती करण्याकडे सरकार आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा संघटक राजेंद्र वाघ यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील छोटी-मोठी धरणे, मातीचे बंधारे यांची आता काय स्थिती आहे याची माहिती घेण्याच्या सूचना जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच सतर्क राहून तत्काळ माहिती देण्यासही संबंधिताना आदेश दिले आहेत.- विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड