शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

उमटे धरणातील भिंतीची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:18 IST

ग्रामस्थांमध्ये घबराट । वर्षभरापूर्वीच केली डागडुजी; मात्र परिस्थिती जैसे थे

- आविष्कार देसाई

अलिबाग : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाची योग्य डागडुजी न केल्यामुळे ते फुटून २३ नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. तशीच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची होण्याची शक्यता स्थानिकांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.

सध्या धरणाच्या कमकुवत झालेल्या भिंतीतून पाणी वेगाने झिरपत आहे. त्याचप्रमाणे धरणाच्या तळाकडील बाजूनेही पाणी बाहेर फेकले जात आहे. त्यामुळे भिंत फुटण्याचा धोका अधिक वाढला आहे. सुमारे ४१ वर्षे वयोमान असणाऱ्या धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या वर्षी वरच्यावर मलमपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या पावसात धरणाची काय स्थिती राहील याबाबत ग्रामस्थांमध्ये घबराट आहे.

तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाºया उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाच्या कालावधीमध्ये पाण्याचा दाब प्रचंड वाढून धरणाच्या भिंतीला भगदाड पडून फार मोठ्या आपत्तीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिकांनी याबाबत सातत्याने प्रशासनाला निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेत धरणाची थातूरमातूर डागडुजी केल्याचा आरोप ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी केला.

धरणाच्या भिंतीतील दगडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने भले मोठे भगदाड पडले होते. जिल्हा परिषदेने यातील काही भिंतीची दुरुस्ती केली,परंतु केलेले कामच निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमटे धरणाची क्षमता ८७ दलघमी पाणी साठ्याची आहे. त्यातच पावसाचा जोर अधूनमधून वाढत असल्याने पूर्ण क्षमतेने धरण भरण्यास काहीच कालावधी लागणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यास धरणाच्या पोटातील पाण्याचा ताण हा धरणाच्या भिंतीवर येण्याची शक्यता आहे. भिंती आधीच कमकुवत झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने केलेले काम हे कुचकामी ठरून मोठी आपत्ती ओढवू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या तीव्र भावनांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते. उमटे धरणाचा प्रश्नाबाबत वेळीच योग्य दखल घेतली गेली नाही तर, काही तरी विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवन-मरणाच्या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. याच प्रकरणात सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जनता दल सेक्युलरचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

२००९ साली अलिबागमध्ये राज्यस्तरीय पाणी परिषद पार पडली होती. त्यामध्ये राज्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली होती. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मात्र जिल्ह्यात कमी संख्येने धरणे आहेत, तसेच जी आहेत त्याची पाणी साठवण क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे पावसाचे अब्जो लीटर पाणी समुद्राला जाऊन मिळते. जुन्या धरणांची डागडुजी आणि नव्याने काही धरणांची निर्मिती करण्याकडे सरकार आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा संघटक राजेंद्र वाघ यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील छोटी-मोठी धरणे, मातीचे बंधारे यांची आता काय स्थिती आहे याची माहिती घेण्याच्या सूचना जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच सतर्क राहून तत्काळ माहिती देण्यासही संबंधिताना आदेश दिले आहेत.- विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड