शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीवाड्या विकासाच्या प्रतीक्षेत, 98 आदिवासी वाड्यांच्या वाट्याला मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 03:42 IST

ग्रामीण भागात आदिवासी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजना कार्यान्वित आहेत. त्याशिवाय आदिवासी कातकरी उत्थानसारख्या विशेष योजना

गिरिष गोरेगावकरमाणगांव : ग्रामीण भागात आदिवासी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजना कार्यान्वित आहेत. त्याशिवाय आदिवासी कातकरी उत्थानसारख्या विशेष योजना कोकण विभागीय महसूल आयुक्तांच्या माध्यमातून कोकणात राबविण्यात येत आहेत. परंतु आदिवासींसाठी असलेल्या विकास योजना माणगाव तालुक्यातील ९८ आदिवासीवाड्यांपर्यंत पोहोचल्याच नसल्याचे ‘लोकमत-रियालिटी चेक’च्या निमित्ताने दिसून आले आहे.

जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी असलेल्या योजना प्रत्यक्षात त्यांच्यासाठी राबविल्या जात आहेत का, यासाठी माणगाव तालुक्यातील काही आदिवासीवाड्यांना भेट दिली. याठिकाणी ९८ आदिवासी वाड्यांमध्ये ३७०० कुटुंबांचे वास्तव्य आहे. साधारण १५ हजार लोकवस्ती असलेल्या वाड्या विकासापासून कोसो दूर असून येथील ग्रामस्थ अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.मुख्यमंत्री दत्तक ग्रुप ग्रामपंचायत योजनेंतर्गत वडगाव ग्रामपंचायत दत्तक घेण्यात आली आहे. साधारण २५ कुटुंबाचे वास्तव्य असलेले गाव गावठी दारू निर्मितीचे मोठे केंद्र असल्याने कुख्यात आहे. जिल्ह्यात सर्वत्र गावठी दारूविरोधी मोहीम सुरू असताना येथील गावठी दारू निर्मिती मात्र बंद होऊ शकलेली नाही. रस्त्यांची दुरवस्था आणि प्रलंबित घरकूल योजना याबाबत अनेक वर्षांत विचार झालेला नाही. शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शाळेसाठी मुलांना दीड किमी चालावे लागत असल्याने अनेकांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे.कुशेडे वाडीत व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठेच्४५ कुटुंबांच्या कुशेडे आदिवासी वाडीत व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठे आहे. येथे जनजागृतीची मोठी गरज आहे, परंतु यासंदर्भात कोणताही सरकारी उपक्रम वा योजना येथे पोहोचलेली नाही. घरकुलाची जशी या आदिवासी बांधवांना प्रतीक्षा आहे, तसेच अंगणवाडी नसल्याने लहान मुलांच्या आरोग्य-शिक्षणाच्या समस्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. रोजगार नसल्याने पत्ते खेळत बसलेले आदिवासी बांधव येथे दिसून येतात.शिरवलीच्या मुलांना शाळेसाठी ८ किमी पायपीट; ओहोळातून प्रवासच्तारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ३० कुटुंबांच्या शिरवली आदिवासी वाडीत पूल नसल्याने मोठ्या ओहळातून ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. पाचवीच्या पुढील शिक्षणासाठी मुलांना दररोज आठ किमी पायपीट करावी लागते. परिणामी शाळेत जाण्याची मानसिकता मुलांमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे.तांबडी वाडीत पाणी, रस्ता नाहीच्शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे माणगाव तालुक्यातील नांदवी हे गाव उभ्या महाराष्ट्राला माहिती झाले. खरेतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नांदवीमध्ये सरकारी रेस्टहाउस आणि आरसीएफच्या सौजन्याने तलाव बांधण्यात आला, परंतु बाकी विकासाच्या नावाने काहीही झाले नाही. नांदवी गावाशेजारी असणाऱ्या तांबडी वाडीत ४० कुटुंबे वास्तव्यास असून भर पावसातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. अंतर्गत रस्ते तर नाहीच आणि दीड किलोमीटरच्या मुख्य रस्त्याचीही दुरवस्था आहे. आरोग्य सुविधेची देखील आबाळच आहे. आदिवासी विकास विभागाचा कुणी अधिकारी वा कर्मचारी या वाडीवर आल्याचे या आदिवासी बांधवांना आठवत नाही. 

टॅग्स :RaigadरायगडTrible Development Schemeआदिवासी विकास योजना