शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीवाड्या विकासाच्या प्रतीक्षेत, 98 आदिवासी वाड्यांच्या वाट्याला मरणयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 03:42 IST

ग्रामीण भागात आदिवासी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजना कार्यान्वित आहेत. त्याशिवाय आदिवासी कातकरी उत्थानसारख्या विशेष योजना

गिरिष गोरेगावकरमाणगांव : ग्रामीण भागात आदिवासी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजना कार्यान्वित आहेत. त्याशिवाय आदिवासी कातकरी उत्थानसारख्या विशेष योजना कोकण विभागीय महसूल आयुक्तांच्या माध्यमातून कोकणात राबविण्यात येत आहेत. परंतु आदिवासींसाठी असलेल्या विकास योजना माणगाव तालुक्यातील ९८ आदिवासीवाड्यांपर्यंत पोहोचल्याच नसल्याचे ‘लोकमत-रियालिटी चेक’च्या निमित्ताने दिसून आले आहे.

जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी असलेल्या योजना प्रत्यक्षात त्यांच्यासाठी राबविल्या जात आहेत का, यासाठी माणगाव तालुक्यातील काही आदिवासीवाड्यांना भेट दिली. याठिकाणी ९८ आदिवासी वाड्यांमध्ये ३७०० कुटुंबांचे वास्तव्य आहे. साधारण १५ हजार लोकवस्ती असलेल्या वाड्या विकासापासून कोसो दूर असून येथील ग्रामस्थ अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.मुख्यमंत्री दत्तक ग्रुप ग्रामपंचायत योजनेंतर्गत वडगाव ग्रामपंचायत दत्तक घेण्यात आली आहे. साधारण २५ कुटुंबाचे वास्तव्य असलेले गाव गावठी दारू निर्मितीचे मोठे केंद्र असल्याने कुख्यात आहे. जिल्ह्यात सर्वत्र गावठी दारूविरोधी मोहीम सुरू असताना येथील गावठी दारू निर्मिती मात्र बंद होऊ शकलेली नाही. रस्त्यांची दुरवस्था आणि प्रलंबित घरकूल योजना याबाबत अनेक वर्षांत विचार झालेला नाही. शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शाळेसाठी मुलांना दीड किमी चालावे लागत असल्याने अनेकांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे.कुशेडे वाडीत व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठेच्४५ कुटुंबांच्या कुशेडे आदिवासी वाडीत व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठे आहे. येथे जनजागृतीची मोठी गरज आहे, परंतु यासंदर्भात कोणताही सरकारी उपक्रम वा योजना येथे पोहोचलेली नाही. घरकुलाची जशी या आदिवासी बांधवांना प्रतीक्षा आहे, तसेच अंगणवाडी नसल्याने लहान मुलांच्या आरोग्य-शिक्षणाच्या समस्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. रोजगार नसल्याने पत्ते खेळत बसलेले आदिवासी बांधव येथे दिसून येतात.शिरवलीच्या मुलांना शाळेसाठी ८ किमी पायपीट; ओहोळातून प्रवासच्तारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ३० कुटुंबांच्या शिरवली आदिवासी वाडीत पूल नसल्याने मोठ्या ओहळातून ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. पाचवीच्या पुढील शिक्षणासाठी मुलांना दररोज आठ किमी पायपीट करावी लागते. परिणामी शाळेत जाण्याची मानसिकता मुलांमध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे.तांबडी वाडीत पाणी, रस्ता नाहीच्शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे माणगाव तालुक्यातील नांदवी हे गाव उभ्या महाराष्ट्राला माहिती झाले. खरेतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नांदवीमध्ये सरकारी रेस्टहाउस आणि आरसीएफच्या सौजन्याने तलाव बांधण्यात आला, परंतु बाकी विकासाच्या नावाने काहीही झाले नाही. नांदवी गावाशेजारी असणाऱ्या तांबडी वाडीत ४० कुटुंबे वास्तव्यास असून भर पावसातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. अंतर्गत रस्ते तर नाहीच आणि दीड किलोमीटरच्या मुख्य रस्त्याचीही दुरवस्था आहे. आरोग्य सुविधेची देखील आबाळच आहे. आदिवासी विकास विभागाचा कुणी अधिकारी वा कर्मचारी या वाडीवर आल्याचे या आदिवासी बांधवांना आठवत नाही. 

टॅग्स :RaigadरायगडTrible Development Schemeआदिवासी विकास योजना