शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मजुरी तर परवडेनाच; खते, बियाणेही खिसा करताहेत रिकामा

By निखिल म्हात्रे | Updated: June 7, 2024 10:34 IST

रायगडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या रागडमध्ये भात शेतीचे क्षेत्र घटले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. गेल्यावर्षी चांगला उतारा मिळाल्याने थोडी खुशी या शेतकऱ्यांमध्ये आहे; मात्र वाढलेल्या मजुरीमुळे भात शेती करायची की नाही, या विवंचनेत ते आहेत.

खरीप हंगामासाठी आता भातशेतीची तयारी शेतकरी करीत आहेत. बी-बियाणांची जमवाजमव सुरू आहे; मात्र खतांसह बी-बियाणांच्या दरातही दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मेहनत करून पदरात काय पडेल, अशा भावना ते व्यक्त करीत आहेत.

दरवर्षी ओला-सुका दुष्काळ, वणवा आणि वादळ-वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करीत भात उत्पादक शेतकरी शेती करीत आहेत. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी मजुरीचे खर्चही वाढलेले आहे. आता नांगरणीही बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने करतात; मात्र डिझेलचे दर वाढल्याने नागंरणीचे दरही वाढले आहेत. खते, बियाणे, औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.

नवनवीन प्रयोगांचा अवलंब

येथील भात उत्पादक शेतकरी नवनवीन प्रयोग करून भाताचे अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने शेती करणे, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणे, पारंपरिक भातशेतीतील काही बाबींकडे दुर्लक्ष करून नवीन अवजारांचा उपयोग करताना दिसून येत आहेत.स्वस्त खते उपलब्ध होत नसल्याने संशोधित व संकरित भात बियाणांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांना महाग खतांची खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा वापर कमी करून मिश्र खत व संयुक्त खताचा वापर करावा. जेणेकरून उत्पन्न जास्त येईल. - सुभाष पाटील, कृषितज्ज्ञ.अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नसल्याने ही महागडी खते घ्यावीच लागतात. शेती करायची इच्छा राहिली नसून, वडिलोपार्जित परंपरा पुढे चालत राहावी, यासाठी शेती करीत आहे. - संदीप कदम, प्रगतिशील शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र