शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मजुरी तर परवडेनाच; खते, बियाणेही खिसा करताहेत रिकामा

By निखिल म्हात्रे | Updated: June 7, 2024 10:34 IST

रायगडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या रागडमध्ये भात शेतीचे क्षेत्र घटले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. गेल्यावर्षी चांगला उतारा मिळाल्याने थोडी खुशी या शेतकऱ्यांमध्ये आहे; मात्र वाढलेल्या मजुरीमुळे भात शेती करायची की नाही, या विवंचनेत ते आहेत.

खरीप हंगामासाठी आता भातशेतीची तयारी शेतकरी करीत आहेत. बी-बियाणांची जमवाजमव सुरू आहे; मात्र खतांसह बी-बियाणांच्या दरातही दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मेहनत करून पदरात काय पडेल, अशा भावना ते व्यक्त करीत आहेत.

दरवर्षी ओला-सुका दुष्काळ, वणवा आणि वादळ-वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करीत भात उत्पादक शेतकरी शेती करीत आहेत. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी मजुरीचे खर्चही वाढलेले आहे. आता नांगरणीही बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने करतात; मात्र डिझेलचे दर वाढल्याने नागंरणीचे दरही वाढले आहेत. खते, बियाणे, औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.

नवनवीन प्रयोगांचा अवलंब

येथील भात उत्पादक शेतकरी नवनवीन प्रयोग करून भाताचे अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने शेती करणे, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणे, पारंपरिक भातशेतीतील काही बाबींकडे दुर्लक्ष करून नवीन अवजारांचा उपयोग करताना दिसून येत आहेत.स्वस्त खते उपलब्ध होत नसल्याने संशोधित व संकरित भात बियाणांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांना महाग खतांची खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा वापर कमी करून मिश्र खत व संयुक्त खताचा वापर करावा. जेणेकरून उत्पन्न जास्त येईल. - सुभाष पाटील, कृषितज्ज्ञ.अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नसल्याने ही महागडी खते घ्यावीच लागतात. शेती करायची इच्छा राहिली नसून, वडिलोपार्जित परंपरा पुढे चालत राहावी, यासाठी शेती करीत आहे. - संदीप कदम, प्रगतिशील शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र