शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मजुरी तर परवडेनाच; खते, बियाणेही खिसा करताहेत रिकामा

By निखिल म्हात्रे | Updated: June 7, 2024 10:34 IST

रायगडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या रागडमध्ये भात शेतीचे क्षेत्र घटले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. गेल्यावर्षी चांगला उतारा मिळाल्याने थोडी खुशी या शेतकऱ्यांमध्ये आहे; मात्र वाढलेल्या मजुरीमुळे भात शेती करायची की नाही, या विवंचनेत ते आहेत.

खरीप हंगामासाठी आता भातशेतीची तयारी शेतकरी करीत आहेत. बी-बियाणांची जमवाजमव सुरू आहे; मात्र खतांसह बी-बियाणांच्या दरातही दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मेहनत करून पदरात काय पडेल, अशा भावना ते व्यक्त करीत आहेत.

दरवर्षी ओला-सुका दुष्काळ, वणवा आणि वादळ-वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करीत भात उत्पादक शेतकरी शेती करीत आहेत. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी मजुरीचे खर्चही वाढलेले आहे. आता नांगरणीही बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने करतात; मात्र डिझेलचे दर वाढल्याने नागंरणीचे दरही वाढले आहेत. खते, बियाणे, औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.

नवनवीन प्रयोगांचा अवलंब

येथील भात उत्पादक शेतकरी नवनवीन प्रयोग करून भाताचे अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने शेती करणे, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणे, पारंपरिक भातशेतीतील काही बाबींकडे दुर्लक्ष करून नवीन अवजारांचा उपयोग करताना दिसून येत आहेत.स्वस्त खते उपलब्ध होत नसल्याने संशोधित व संकरित भात बियाणांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांना महाग खतांची खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा वापर कमी करून मिश्र खत व संयुक्त खताचा वापर करावा. जेणेकरून उत्पन्न जास्त येईल. - सुभाष पाटील, कृषितज्ज्ञ.अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नसल्याने ही महागडी खते घ्यावीच लागतात. शेती करायची इच्छा राहिली नसून, वडिलोपार्जित परंपरा पुढे चालत राहावी, यासाठी शेती करीत आहे. - संदीप कदम, प्रगतिशील शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र