शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कौशल्यावर आधारित अभ्यासक्र म सुरू करणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:01 IST

विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

कर्जत - विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेत आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. कर्जत येथील अभिनव प्रशालेतील क्र ीडा सभागृह आणि ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास स्थानिक आमदार सुरेश लाड, कर्जतच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड, एचपीसीएलचे सी. एन. कृष्णमूर्ती, सी. एस. किरण, विनंती केसरकर, सेवा सहयोगचे संचालक किशोर मोघे, संजय हेगडे, बजाज समूहाचे किरण मुकादम आदी उपस्थित होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. मुंबई यांच्याकडून अभिनव ज्ञान मंदिर संस्थेस वस्तूरूपाने मिळणाऱ्या देणगीचा स्वीकार व बजाज समूहाच्या आर्थिक मदतीतून व सेवा सहयोग मुंबई यांच्या सहकार्याने साकारलेल्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या नवीन इमारतीच्या दुसºया मजल्यावरील क्र ीडा सभागृह व ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे खजिनदार विनायक चितळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष गणेश वैद्य यांनी प्रास्ताविकात ८३ वर्षात संस्थेने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. विनाअनुदानित शाळा चालवणे कठीण झाले आहे. शाळेचे सुमारे एक कोटीचे अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे याकडे शिक्षण मंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी कर्जतमधील दानशूर संतोष भोईर आणि संस्थेच्या शिक्षिका डॉ. रंजना देशमुख, डॉ. स्नेहा उपाध्ये यांनी पीएचडी केल्याबद्दल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक मोडक यांनी भाषणात विविध विषय मांडले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रीतम लाड-नानचे व रश्मी देशपांडे यांनी केले तर सचिव जनार्दन मोघे यांनी आभार मानले. याप्रसंगी भगवान भोईर, विक्रम वैद्य, वि. रा. देशमुख, माधवराव गायकवाड, मीना प्रभावळकर, वालचंद ओसवाल आदी उपस्थित होते.नापास शिक्का पुसण्यासाठी शासन प्रयत्नशीलशासनाने शिक्षण व्यवस्थेत पूरक असे आमूलाग्र बदल केले आहेत. शालेय अभ्यासक्र माबरोबर क्र ीडा नैपुण्याला गुणांमध्ये स्थान दिले आहे. तर क्र ीडा क्षेत्रात राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. अनेकदा नापास विद्यार्थी वाया जाणाºया वर्षामुळे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी आपण नापास विद्यार्थ्यांची लगेच महिनाभरामध्ये परीक्षा घेऊन त्यांचा त्वरित निकाल लावल्याने हजारो विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष वाचले आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यामुळे दिशा मिळाली आहे- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेnewsबातम्या