शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:25 IST

रायगड जिल्हा परिषदेचा कार्यक्रम : खालापूर येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांचा सन्मान

अलिबाग/ मोहोपाडा : रायगड जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सक्षमीकरणाचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ११६ ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून गरोदर महिला आणि नवजात बालकांना सकस आहार देण्यात येत असल्याने कुपोषण आटोक्यात येण्यास मदत झाली आहे असा दावा रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उमा मुंढे यांनी केला.

बुधवारी सकाळी खालापूर पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनीस तसेच जिल्ह्यात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सक्षम करण्याचे पाऊल जिल्हा परिषदेने उचलले आहे. किशोरवयीन मुली यांच्यासह गरीब गरजू आणि होतकरू महिलांना, बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण कामे हाती घेऊन त्यांची अंमलबजावणी देखील सुरू केल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जि. परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण, आरोग्य सभापती नरेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपस्थित होते.रेणुका पाटील आदर्श पर्यवेक्षिका पुरस्काराने सन्मानितम्हसळा : सावित्रीबाई फुले जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्याने रायगड जिल्हा परिषदेचे वतीने दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रायगड जिल्हा परिषदेचा या वर्षीचा आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार सेवेत उत्कृष्ट काम करणाºया म्हसळा खरगावखुर्द सकलप येथील रेणुका पाटील यांना प्रदान करण्यात आला.मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रायगड जिल्हा परिषदेत संपन्न झालेल्या कार्यक्र मात रेणुका पाटील यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कार्यक्र माला राजिप उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण सभापती नारायण डामसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर,अधिकारी व पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. १९९४ मध्ये अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत झालेल्या रेणुका पाटील यांनी तालुक्यात तीव्र (सॅम) आणि अतितीव्र (मॅम)कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. रेणुका पाटील यांनी त्यांचे सेवेत उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याने त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या वर्षीचा आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगड