शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 16:08 IST

विशेष म्हणजे २०१८ साली त्यांच्याच गावी भेंडखळ येथे झालेल्या अखिल भारतीय आगरी साहित्य आणि विकास मंडळाच्या १८ व्या आगरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

मधुकर ठाकूर 

उरणउरण येथील ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक आगरी साहित्य भूषण हरिभाऊ शंकर घरत यांचे शुक्रवारी (१५)  अल्पशा आजाराने त्यांच्या भेंडखळ येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. विशेष म्हणजे या वयातही ते साहित्यिक चळवळीत सक्रिय होते व त्याच बरोबर त्यांचे लेखनही सुरू होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली होती.निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला साहित्य निर्मितीत वाहून घेतले होते.कथा,कादंबरी,कविता अशा वाड़मयाच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीचा ठसा उमटविला होता. अनेक मात्तबर दिवाळी अंकांतून त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.हळद रुसली,पुरस्कार, हे कथासंग्रह,राजयोगी भर्तरीनाथ, धाकले खोत, राजयोगी मच्छिंद्रनाथ या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून नवी दिशा हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गी आहे.या शिवाय राजकुंवर ही कादंबरी, महाराष्ट्राचा धैर्यमेरू हे नाटक ,वेचलेले क्षण हा काव्यसंग्रह आदी अप्रकाशित साहित्य त्यांच्या नावावर आहे.

विशेष म्हणजे २०१८ साली त्यांच्याच गावी भेंडखळ येथे झालेल्या अखिल भारतीय आगरी साहित्य आणि विकास मंडळाच्या १८ व्या आगरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी रायगड जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक साहित्यिकांबरोबरच सर्वच क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण मराठी साहित्य परिषद, आ.सा. वि.मं.,काव्य दरबार,आचार्य अत्रे कट्टा या साहित्यिक संस्थांबरोबरच समाजातील सर्व थरांतून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :uran-acउरण