शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

वाहन कायद्याचे होतेय महामार्गावर उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:56 IST

गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे.

सिकंदर अनवारेदासगाव : महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे. बुधवारी महामार्गावर मोठ्या संख्येने अनेक वाहनचालक मोटार वाहन कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत आहेत. सध्या केंद्र सरकारने जुन्या कायद्यामध्ये बदल करत दंडाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असली तरी सध्या तरी हा कायदा महाराष्टÑामध्ये अंमलबजावणीत आलेला नाही. असता तर हीच दंडाची रक्कम कोट्यवधीच्या घरात गेली असती.गेल्या वर्षभरापासून संपूर्ण राज्यात वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम लावण्याचे काम ठिकठिकाणच्या खालच्या पातळीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. मोटार वाहन कायद्याची मोठ्या प्रमाणात पायमल्ली केली जात असून कमी दंड असल्याने याकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नियम मोडणाºयांना लगाम घालण्यासाठी कडक कायदा करत, काही नियम तोडलात तर शिक्षा आणि काही नियम मोडणाºयांना मोठ्या रकमेचा दंडाचा बडगा उगारला आहे. कायदा संपूर्ण देशात लागू झाला असला तरी काही राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीस नकार दिला आहे. त्यामध्ये महाराष्टÑ देखील आहे.मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावरून दर दिवशी शेकडो वाहनांची वर्दळ आहे. वाहतुकीस अडथळे दूर करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम मोडत कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक शाखा पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. सध्या या पोलीस शाखांवर दर दिवशी शेकडो वाहनांना थांबवले जात असून वाहनांची तपासणी करत कागदपत्रांची देखील तपासणी केली जात आहे, तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात आहे.या कारवाईमध्ये सध्या तरी कोकणातील महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडाची कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केलाआहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड या ठिकाणी काही दिवसापूर्वीच नवीन पोलीस उपनिरीक्षक वाय. एम. गायकवाड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या शाखेमध्ये हजर झाल्यानंतर यांनी महामार्गावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम घालण्यास सुरुवात केली. यामुळे नियम धाब्यावर बसवणाºया वाहनचालकांमध्ये या अधिकाºयांबद्दल एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.>जुन्या कायद्याप्रमाणेच वसुलीसध्या संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला असला तरी महाराष्टÑ सरकारने याची अद्याप अंमलबजावणी केलेली नसल्याने सध्या वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम ही जुन्या कायद्याप्रमाणेच केली गेली आहे. जुन्या नियमानुसार हेल्मेट न घालणे ५०० रुपये, वाहनाचा इन्शुरन्स नसणे २५०० आणि रिफ्लेक्टर पट्टी न लावणे १००० रुपये या व्यतिरिक्त इतर नियमांचे उल्लंघन झाल्यास सर्वांना २०० रुपये दंड आकारला जातो. नवीन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात आली तर या दंडाच्या रकमेचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला असता.>या नियमांचे उल्लंघनजानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, गाडीचा इन्शुरन्स नसणे, पीयूसी, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, काचांवर काळी फिल्म बसवणे, रहदारीत अडथळा निर्माण करणे, बॅच जवळ न बाळगणे, विना लायसन वाहन चालवणे आणि मोठ्या वाहनांवर रिफ्लेक्टर पट्टी न लावणे अशा नियमांचे उल्लंघन करणाºया ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रु.दंड वसूल केला.>वाहनचालकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे. जेणेकरून आपला परिवार, आपण सुरक्षित राहू.- वाय. एम. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा महाड