शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

वाहन कायद्याचे होतेय महामार्गावर उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:56 IST

गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे.

सिकंदर अनवारेदासगाव : महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे. बुधवारी महामार्गावर मोठ्या संख्येने अनेक वाहनचालक मोटार वाहन कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत आहेत. सध्या केंद्र सरकारने जुन्या कायद्यामध्ये बदल करत दंडाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असली तरी सध्या तरी हा कायदा महाराष्टÑामध्ये अंमलबजावणीत आलेला नाही. असता तर हीच दंडाची रक्कम कोट्यवधीच्या घरात गेली असती.गेल्या वर्षभरापासून संपूर्ण राज्यात वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम लावण्याचे काम ठिकठिकाणच्या खालच्या पातळीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. मोटार वाहन कायद्याची मोठ्या प्रमाणात पायमल्ली केली जात असून कमी दंड असल्याने याकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नियम मोडणाºयांना लगाम घालण्यासाठी कडक कायदा करत, काही नियम तोडलात तर शिक्षा आणि काही नियम मोडणाºयांना मोठ्या रकमेचा दंडाचा बडगा उगारला आहे. कायदा संपूर्ण देशात लागू झाला असला तरी काही राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीस नकार दिला आहे. त्यामध्ये महाराष्टÑ देखील आहे.मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावरून दर दिवशी शेकडो वाहनांची वर्दळ आहे. वाहतुकीस अडथळे दूर करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम मोडत कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक शाखा पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. सध्या या पोलीस शाखांवर दर दिवशी शेकडो वाहनांना थांबवले जात असून वाहनांची तपासणी करत कागदपत्रांची देखील तपासणी केली जात आहे, तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात आहे.या कारवाईमध्ये सध्या तरी कोकणातील महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडाची कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केलाआहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड या ठिकाणी काही दिवसापूर्वीच नवीन पोलीस उपनिरीक्षक वाय. एम. गायकवाड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या शाखेमध्ये हजर झाल्यानंतर यांनी महामार्गावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम घालण्यास सुरुवात केली. यामुळे नियम धाब्यावर बसवणाºया वाहनचालकांमध्ये या अधिकाºयांबद्दल एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.>जुन्या कायद्याप्रमाणेच वसुलीसध्या संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला असला तरी महाराष्टÑ सरकारने याची अद्याप अंमलबजावणी केलेली नसल्याने सध्या वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम ही जुन्या कायद्याप्रमाणेच केली गेली आहे. जुन्या नियमानुसार हेल्मेट न घालणे ५०० रुपये, वाहनाचा इन्शुरन्स नसणे २५०० आणि रिफ्लेक्टर पट्टी न लावणे १००० रुपये या व्यतिरिक्त इतर नियमांचे उल्लंघन झाल्यास सर्वांना २०० रुपये दंड आकारला जातो. नवीन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात आली तर या दंडाच्या रकमेचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला असता.>या नियमांचे उल्लंघनजानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, गाडीचा इन्शुरन्स नसणे, पीयूसी, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, काचांवर काळी फिल्म बसवणे, रहदारीत अडथळा निर्माण करणे, बॅच जवळ न बाळगणे, विना लायसन वाहन चालवणे आणि मोठ्या वाहनांवर रिफ्लेक्टर पट्टी न लावणे अशा नियमांचे उल्लंघन करणाºया ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रु.दंड वसूल केला.>वाहनचालकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे. जेणेकरून आपला परिवार, आपण सुरक्षित राहू.- वाय. एम. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा महाड