शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वाहन कायद्याचे होतेय महामार्गावर उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:56 IST

गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे.

सिकंदर अनवारेदासगाव : महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसुली केला आहे. बुधवारी महामार्गावर मोठ्या संख्येने अनेक वाहनचालक मोटार वाहन कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत आहेत. सध्या केंद्र सरकारने जुन्या कायद्यामध्ये बदल करत दंडाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असली तरी सध्या तरी हा कायदा महाराष्टÑामध्ये अंमलबजावणीत आलेला नाही. असता तर हीच दंडाची रक्कम कोट्यवधीच्या घरात गेली असती.गेल्या वर्षभरापासून संपूर्ण राज्यात वरिष्ठ पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम लावण्याचे काम ठिकठिकाणच्या खालच्या पातळीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. मोटार वाहन कायद्याची मोठ्या प्रमाणात पायमल्ली केली जात असून कमी दंड असल्याने याकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नियम मोडणाºयांना लगाम घालण्यासाठी कडक कायदा करत, काही नियम तोडलात तर शिक्षा आणि काही नियम मोडणाºयांना मोठ्या रकमेचा दंडाचा बडगा उगारला आहे. कायदा संपूर्ण देशात लागू झाला असला तरी काही राज्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीस नकार दिला आहे. त्यामध्ये महाराष्टÑ देखील आहे.मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावरून दर दिवशी शेकडो वाहनांची वर्दळ आहे. वाहतुकीस अडथळे दूर करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम मोडत कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई -गोवा राष्टÑीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक शाखा पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. सध्या या पोलीस शाखांवर दर दिवशी शेकडो वाहनांना थांबवले जात असून वाहनांची तपासणी करत कागदपत्रांची देखील तपासणी केली जात आहे, तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात आहे.या कारवाईमध्ये सध्या तरी कोकणातील महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी गेल्या आठ महिन्यांत मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडाची कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केलाआहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड या ठिकाणी काही दिवसापूर्वीच नवीन पोलीस उपनिरीक्षक वाय. एम. गायकवाड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या शाखेमध्ये हजर झाल्यानंतर यांनी महामार्गावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर लगाम घालण्यास सुरुवात केली. यामुळे नियम धाब्यावर बसवणाºया वाहनचालकांमध्ये या अधिकाºयांबद्दल एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.>जुन्या कायद्याप्रमाणेच वसुलीसध्या संपूर्ण भारतात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला असला तरी महाराष्टÑ सरकारने याची अद्याप अंमलबजावणी केलेली नसल्याने सध्या वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम ही जुन्या कायद्याप्रमाणेच केली गेली आहे. जुन्या नियमानुसार हेल्मेट न घालणे ५०० रुपये, वाहनाचा इन्शुरन्स नसणे २५०० आणि रिफ्लेक्टर पट्टी न लावणे १००० रुपये या व्यतिरिक्त इतर नियमांचे उल्लंघन झाल्यास सर्वांना २०० रुपये दंड आकारला जातो. नवीन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात आली तर या दंडाच्या रकमेचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला असता.>या नियमांचे उल्लंघनजानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, गाडीचा इन्शुरन्स नसणे, पीयूसी, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, काचांवर काळी फिल्म बसवणे, रहदारीत अडथळा निर्माण करणे, बॅच जवळ न बाळगणे, विना लायसन वाहन चालवणे आणि मोठ्या वाहनांवर रिफ्लेक्टर पट्टी न लावणे अशा नियमांचे उल्लंघन करणाºया ५,८५७ वाहनांवर कारवाई करत १२ लाख ३२ हजार ४०० रु.दंड वसूल केला.>वाहनचालकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे. जेणेकरून आपला परिवार, आपण सुरक्षित राहू.- वाय. एम. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा महाड