शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

कर्जतमधील वावे बेंडसे पूल प्रगतिपथावर विजय मांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:53 IST

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता.

कर्जत  - कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नदीवर पूल बांधल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.बेंडसे गावातील लोकांना हाकेच्या अंतरावरील भिवपुरी रेल्वेस्थानक आहे. मात्र याठिकाणी पोहचण्याकरिता मोठा वळसा घालावा लागे. विशेषत: विद्यार्थी आणि नोकरदार लोकांना पावसाळ्यात वावे किंवा भिवपुरी स्थानकात जाण्याकरिता तारेवरील कसरत करावी लागायची.ग्रामस्थांनी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी उल्हास नदीमध्ये दोन्ही तीर जोडण्यासाठी लोखंडी तार बांधली होती. त्या तारेवरून ते सर्व नदी पार करायचे. पावसाळ्यात नदीच्या पात्रात दुथडी भरून वाहत असताना विद्यार्थ्यांना दप्तर, छत्री सांभाळत तारेवरून जावे लागे. अनेक तरु ण तोल जाऊन नदीत पडण्याचे प्रकारही घडले आहेत.उल्हास नदीवरील बेंडसे-वावे गाव जोडणारा पूल बांधावा म्हणून वर्षानुवर्षे ग्रामस्थांची मागणी होती. २०१६ मध्ये त्या ७० मीटर लांबीच्या पुलासाठी शासनाने तब्बल १ कोटी ८२ लाखांची तरतूद केली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये पुलाच्या कामाची सुरुवात आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते झाली होती.वर्षभरात या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वी उल्हास नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ बेंडसे आणि वावे ही गावे जोडली जाणार नसून गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा पूल मैलाचा दगड ठरणार आहे. पुलाच्या निर्मितीमुळे या भागातील लोकांची येण्या-जाण्याची सोय होणार आहेच शिवाय शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तर उंचावणार आहे.पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्धलोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : शहरातील अनेक गाव वाड्यांना जोडणारा मोहाचावाडी येथील जीर्ण पूल चार दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांची रस्त्याअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी पाहणी करून पुलाच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधलेला पूल जीर्ण झाला होता. या ठिकाणाहून खडी भरलेला ट्रक जात असताना चार दिवसांपूर्वी तो कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक अडकवून पडला होता. तेव्हापासून हा रस्ता बंद आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच आमदार सुरेश लाड यांनी या ठिकाणी पाहणी केली. रविवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पाहणी करून पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला व नेरळ ग्रामपंचायतीला साकवचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी कृषी व दुग्ध, पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर, कर्जत उपअभियंता केदार, शेकाप तालुका चिटणीस प्रवीण पाटील, राम राणे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हस्कर, नितेश शाह उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या