शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कर्जतमधील वावे बेंडसे पूल प्रगतिपथावर विजय मांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:53 IST

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता.

कर्जत  - कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे गावातील नागरिकांना जवळचे रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी नदी पार करताना तारेवरची कसरत करावी लागायची. त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नदीवर पूल बांधल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.बेंडसे गावातील लोकांना हाकेच्या अंतरावरील भिवपुरी रेल्वेस्थानक आहे. मात्र याठिकाणी पोहचण्याकरिता मोठा वळसा घालावा लागे. विशेषत: विद्यार्थी आणि नोकरदार लोकांना पावसाळ्यात वावे किंवा भिवपुरी स्थानकात जाण्याकरिता तारेवरील कसरत करावी लागायची.ग्रामस्थांनी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी उल्हास नदीमध्ये दोन्ही तीर जोडण्यासाठी लोखंडी तार बांधली होती. त्या तारेवरून ते सर्व नदी पार करायचे. पावसाळ्यात नदीच्या पात्रात दुथडी भरून वाहत असताना विद्यार्थ्यांना दप्तर, छत्री सांभाळत तारेवरून जावे लागे. अनेक तरु ण तोल जाऊन नदीत पडण्याचे प्रकारही घडले आहेत.उल्हास नदीवरील बेंडसे-वावे गाव जोडणारा पूल बांधावा म्हणून वर्षानुवर्षे ग्रामस्थांची मागणी होती. २०१६ मध्ये त्या ७० मीटर लांबीच्या पुलासाठी शासनाने तब्बल १ कोटी ८२ लाखांची तरतूद केली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये पुलाच्या कामाची सुरुवात आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते झाली होती.वर्षभरात या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वी उल्हास नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ बेंडसे आणि वावे ही गावे जोडली जाणार नसून गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा पूल मैलाचा दगड ठरणार आहे. पुलाच्या निर्मितीमुळे या भागातील लोकांची येण्या-जाण्याची सोय होणार आहेच शिवाय शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तर उंचावणार आहे.पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्धलोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : शहरातील अनेक गाव वाड्यांना जोडणारा मोहाचावाडी येथील जीर्ण पूल चार दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांची रस्त्याअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी पाहणी करून पुलाच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधलेला पूल जीर्ण झाला होता. या ठिकाणाहून खडी भरलेला ट्रक जात असताना चार दिवसांपूर्वी तो कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक अडकवून पडला होता. तेव्हापासून हा रस्ता बंद आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच आमदार सुरेश लाड यांनी या ठिकाणी पाहणी केली. रविवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पाहणी करून पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला व नेरळ ग्रामपंचायतीला साकवचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी कृषी व दुग्ध, पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर, कर्जत उपअभियंता केदार, शेकाप तालुका चिटणीस प्रवीण पाटील, राम राणे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हस्कर, नितेश शाह उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या