शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

जिल्ह्यातील लसीकरण चार दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:47 IST

गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीचे अस्त्र : अलिबागमध्ये लस मिळत नसल्याने नागरिक हैराण

लाेकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने गेल्या चार दिवसांपासून ८४ केंद्रांवरील लसीकरण ठप्प झाले आहे. लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून माघारी फिरावे लागत आहे. नाेंदणी करूनदेखील लस उपलब्ध हाेत नसल्याने नागरिक मात्र कमालीचे हैराण झाले आहेत. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी केंद्राच्या २०० मीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात काेराेना महामारीचा फैलाव अद्यापही थांबलेला नाही. वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांचे मृत्यू यांना आवर कसा घालायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे.सरकारने लाॅकडाऊन केले आहे, मात्र अद्यापही त्याचा म्हणावा तसा सकारात्मक परिणाम दिसत नाही. रुग्णवाढीचा वेग मंदावण्यासाठी पुढील काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे आराेग्य विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विविध उपाययाेजना करतानाच सरकारने प्रभावीपणे लसीकरण माेहीम राबवण्याचे घाेषित केले. यासाठी फ्रंटलाइन वर्कर, आराेग्य सेवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या लसीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत हाेते. १ मेपासून १८ ते ४४ वयाेगटाला लस देण्याचे काम सुरू आहे. मात्र १८ ते ४४ वयाेगट वगळता अन्य ८४ केंद्रांवरील लसीकरण ठप्प पडले आहे. लसीकरणासाठी नाेंदणी केली आहे, मात्र केंद्रावर लसच शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आम्हाला परतावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

गेल्या आठवड्यात सुमारे १२ हजार लसींचा साठा प्राप्त झाला हाेता. चार दिवसांपूर्वीच ताे संपलेला आहे. सरकारकडे नव्याने मागणी करण्यात आलेली आहे. परंतु आठ दिवस झाले तरी लसच मिळालेली नाही. लसच नसल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतील ८४ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. लस प्राप्त हाेताच पुन्हा लसीकरण करण्यात येईल, असे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी सुमारे १० हजार डाेस आले हाेते. पाच केंद्रांवर प्रत्येकी दाेन हजार देण्यात आले हाेते. सध्या याच वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्यातील पनवेल येथे तीन, अलिबाग आणि पेण येथे प्रत्येकी एका केंद्राचा समावेश केला आहे, मात्र अलिबागमधील साठा संपलेला आहे. तसेच अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. जिल्ह्यासाठी आलेला साठा संपलेला आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. लसींचा साठा कधी मिळणार, याकडे सर्वांचेच डाेळे लागले आहेत.

२०० मीटर परिसरात मज्जावलसीकरण करण्यासाठी माेठ्या संख्येने नागरिक केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र लसींचा साठा संपला आहे. फक्त १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांना लस टाेचली जात आहे. या वयाेगटाव्यतिरिक्त अन्य काेणालाही लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरात येण्यास मज्जाव केला आहे. जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. नागरिक निष्कारण केंद्रावर गर्दी करत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराचे भान राखले जात नाही. त्यामध्ये काेराेना संसर्गाचा धाेका वाढण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने या ठिकाणी संचारबंदीचे अस्त्र वापरले असल्याचे बाेलले जाते.

nलसीकरणासाठी पनवेल येथे तीन, अलिबाग, पेण येथे प्रत्येकी एका केंद्राचा समावेश केला आहे, मात्र अलिबागमधील साठा संपलेला आहे.

जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. पुढील दाेन दिवसांत लस उपलब्ध झाल्यावर वेगाने लसीकरण सुरू हाेईल. सध्या १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.- डाॅ. सुधाकर माेरे, जिल्हा आराेग्य अधिकारी, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCorona vaccineकोरोनाची लस