शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

उद्घाटनापूर्वीच जिल्हा नियोजनच्या इमारतीचा वापर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 05:06 IST

रायगड जिल्हा नियोजन भवनच्या इमारतीच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नसतानाच या इमारतीच्या वापराला सुरुवात करण्यात आली आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्हा नियोजन भवनच्या इमारतीच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त सापडलेला नसतानाच या इमारतीच्या वापराला सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी लागणारी मतदान यंत्रे ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी यांचे कार्यालयच निवडणूक विभागाने घेतल्याने उद्घाटनापूर्वीच नियोजन भवनच्या नव्या इमारतीचे दरवाजे उघडावे लागल्याचे बोलले जाते.रायगड जिल्ह्यातील नियोजन विभागासाठी स्वतंत्र इमारत असावी, अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नियोजन भवनची सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह, एक मिनी सभागृह, नियोजन भवनचे विस्तृत कार्यालय, यासह लिफ्टची सुविधा, वातानुकूलित यंत्रणा अशा पद्धतीने इमारत बांधून तयार झाली आहे.जिल्हा नियोजन भवनच्या देखण्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ अद्यापही न मिळाल्यामुळे इमारतीचे अधिकृतरीत्या उद्घाटन होऊ शकलेले नाही. इमारतीचे उद्घाटन झाले नसल्याने गेले काही महिने ती वापराविनाच पडून आहे. इमारतीचे लवकरात लवकर उद्घाटन करून जिल्ह्यातील जनतेसाठी ती सुुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, निवडणूक विभागाला जागेची कमतरता भासत होती, त्यामुळे त्यांना जुन्या कार्यालयाचा ताबा दिला आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले.नव्या नियोजन भवनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री यांची वेळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागितली आहे. त्यांची वेळ मिळाल्यावर इमारतीचे उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मतदार यंत्रासह अन्य सामग्रीसाठी वापर२०१९ मध्ये होणाºया लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेली आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने मतदान यंत्रे आणण्यात आली आहेत. त्याची हाताळणी करणे, देखभाल करणे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील जागा कमी पडत आहे.मतदान यंत्राची सुरक्षा ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे असल्याने निवडणूक विभाग जागेच्या शोधात होता. याच तळमजल्यावर जिल्हा नियोजन विभागाचे कार्यालय आहे. निवडणूक विभागाला ते सोयीस्कर असल्याने त्यांनी त्याची मागणी करून नियोजन विभागाचे कार्यालय रीतसर आपल्या ताब्यात घेतले आहे. आता त्या ठिकाणी मतदान यंत्रांसह अन्य सामग्री ठेवण्यात आली आहे.निवडणूक विभागाने जिल्हा नियोजन विभागामध्ये आपला कारभार सुरू केल्याने नियोजन विभाग हा २६ नोव्हेंबर रोजीच उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नियोजन विभागाच्या नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाला आहे. त्या ठिकाणाहून आता जिल्ह्याच्या विकासाचा कारभार हाकण्यात सुरुवात करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगड