शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

एमएमआरडीएविरोधात उरणकरांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:46 IST

एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबागपर्यंत नवे संकट शासनाने आणल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरु वारी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

उरण : एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबागपर्यंत नवे संकट शासनाने आणल्याने त्याचा निषेध करण्यासाठी गुरु वारी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. संध्याकाळी नगरविकास खात्याचे सचिव नितीन करीर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाने आपणे म्हणणे जोरदारपणे मांडत बिल्डरधार्जिण्या आराखड्याचा निषेध केला.शिष्टमंडळ मंचाचे मार्गदर्शक चंद्रशेखर प्रभू, आ. मनोहर भोईर, उल्का महाजन, सुरेखा दळवी, मनवेल तुस्कानो, सुधाकर पाटील, संजय ठाकूर आदिंचा सहभाग होता. यावेळी आ. भोईर यांनी येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातून उरणच्या पूर्व भागातील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. तत्पूर्वी आझाद मैदान सरकारविरोधी घोषणांनी दुमदुमले.मंचावर उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, सुरेखा दळवी, मनवेल तुस्कानो, शैलेंद्र कांबळे, सुधाकर पाटील, भूषण पाटील, रुपेश पाटील, जॉन परेरा, भावना म्हात्रे आदिंनी सरकारच्या धोरणाचा निषेध करत बिल्डरधार्जिणा आराखडा रद्द करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेवून सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला आराखडा बनवावा, अशी मागणी केली. या आंदोलनात आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशील पाटील, आ. गावीत यांनी पाठिंबा दिला. तर माजी आ. विवेक पाटील उपस्थित न राहू शकल्याने पाठिंब्याचे पत्र दिले.विधिमंडळात आ. धैर्यशील पाटील यांनी लक्षवेधी दाखल केली असून ती लवकरच पटलावर येईल. काल एका अन्य प्रकरणात सभागृहाचे कामकाज तहकूब झाले होते. उरण तालुक्यातून कामगार नेते श्याम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष ठाकूर, जीवन गावंड, विनोद म्हात्रे, पं. स. सदस्या शुभांगी पाटील, सुरेश पाटील, संतोष पवार, विलास गावंड, शेखर ठाकूर, विनायक मोकल, मेघनाथ मोकाशी, गुरुनाथ गावंड, संदीप पाटील, सुभाष कडू यांच्यासह गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व जनता आंदोलनात सहभागी झाली होती.