शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

उरण : चिरनेर परिसरात दलालांचा सुळसुळाट, सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:53 IST

वाढत्या भरावामुळे चिरनेर गावाला पुराचा वाढता धोका, पुढील पिढ्यांचे आयुष्य अंधारात 

मधुकर ठाकूर उरण परिसरातील खाडीकिनारी तसेच खाडीच्या बाजूस असलेल्या सोन्यासारख्या पिकत्या जमिनी दलालामर्फत कवडीमोल भावात विक्री केल्या जात आहेत.याच शेतजमिनींवर विकासक, भांडवलदार  मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिरनेर आणि चिरनेर परिसराला दलालांचा वेढा पडला आहे.विकासाच्या नावाखाली  बाहेरील  खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजकांनी वाडवडिलांनी राखुन ठेवलेल्या पिढीजात जमिनी  शेतकऱ्यांना भुरळ घालून त्यांच्या घशात घालण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी गावागावात दलाल नेमले आहेत. या दलालांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.हे दलाल शेतकऱ्यांना भुलथापा मारीत आणि भविष्याची गोड स्वप्ने दाखवून अगदी कवडीमोल भावाने येथील जमिनींची खरेदी करीत आहेत.

जमीनी खरेदी केलेले खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजक दलाल विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाडी, खाडी किनारी,नाले, सीआरझेड परिसरात बहुतांशी जमिनीवर मातीचा भराव केला जात आहे.मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडी, खाडी किनारे, नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. परिणामी पाण्याचा निचरा होत नाही.

यामुळे परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. यामुळे गावातील सखल भागात पाणी साचून या भागातील घरे पुराच्या पाण्याखाली  जातात. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय येथील नागरीकांच्या जीविताला मोठा धोका संभवतो. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून  जीवन जगावे लागत आहे. 

पुढील पिढ्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे यासाठी खाजगी खाजगी भांडवलदार,विकासक,  उद्योगजकांना आपल्या सोन्यासारख्या जमिनी शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने विकू नका असे आवाहन मातृछाया जनसेवा फाउंडेशनच्या उरण तालुका महिला अध्यक्षा सविता खारपाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

चिरनेर परिसरात खाजगी उद्योजकांनी जमिनी खरेदी करण्यासाठी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. भाताचे पीक, वाल, चवळी, कडधान्य पीक देणाऱ्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्यामुळे येथील पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. चिरनेर परिसरात गोदामे वाहतूक कोंडी प्रदूषण यामुळे येथील नागरिक बेजार झाले असून, विविध प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान सोन्यासारख्या जमिनी खाजगी उद्योजकांना कवडीमोल भावात विकल्या जात असल्यामुळे उद्योजकांचे उखळ पांढरे झाले आहे.असे खासगी विकासक कसेही आणि कुठेही भराव करित आहेत.यामुळे परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होते असल्याची संतप्त प्रतिक्रिया विजय भगत या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :uran-acउरण