शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

उरण : चिरनेर परिसरात दलालांचा सुळसुळाट, सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:53 IST

वाढत्या भरावामुळे चिरनेर गावाला पुराचा वाढता धोका, पुढील पिढ्यांचे आयुष्य अंधारात 

मधुकर ठाकूर उरण परिसरातील खाडीकिनारी तसेच खाडीच्या बाजूस असलेल्या सोन्यासारख्या पिकत्या जमिनी दलालामर्फत कवडीमोल भावात विक्री केल्या जात आहेत.याच शेतजमिनींवर विकासक, भांडवलदार  मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव टाकत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  चिरनेर गावाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिरनेर आणि चिरनेर परिसराला दलालांचा वेढा पडला आहे.विकासाच्या नावाखाली  बाहेरील  खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजकांनी वाडवडिलांनी राखुन ठेवलेल्या पिढीजात जमिनी  शेतकऱ्यांना भुरळ घालून त्यांच्या घशात घालण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी गावागावात दलाल नेमले आहेत. या दलालांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.हे दलाल शेतकऱ्यांना भुलथापा मारीत आणि भविष्याची गोड स्वप्ने दाखवून अगदी कवडीमोल भावाने येथील जमिनींची खरेदी करीत आहेत.

जमीनी खरेदी केलेले खाजगी भांडवलदार,विकासक, उद्योजक दलाल विविध राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाडी, खाडी किनारी,नाले, सीआरझेड परिसरात बहुतांशी जमिनीवर मातीचा भराव केला जात आहे.मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मातीच्या भरावामुळे खाडी, खाडी किनारे, नैसर्गिक नाले बुजविले जात आहेत. परिणामी पाण्याचा निचरा होत नाही.

यामुळे परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. यामुळे गावातील सखल भागात पाणी साचून या भागातील घरे पुराच्या पाण्याखाली  जातात. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय येथील नागरीकांच्या जीविताला मोठा धोका संभवतो. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून  जीवन जगावे लागत आहे. 

पुढील पिढ्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे यासाठी खाजगी खाजगी भांडवलदार,विकासक,  उद्योगजकांना आपल्या सोन्यासारख्या जमिनी शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने विकू नका असे आवाहन मातृछाया जनसेवा फाउंडेशनच्या उरण तालुका महिला अध्यक्षा सविता खारपाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

चिरनेर परिसरात खाजगी उद्योजकांनी जमिनी खरेदी करण्यासाठी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य अंधारात आले आहे. भाताचे पीक, वाल, चवळी, कडधान्य पीक देणाऱ्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या जात असल्यामुळे येथील पुढील पिढ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. चिरनेर परिसरात गोदामे वाहतूक कोंडी प्रदूषण यामुळे येथील नागरिक बेजार झाले असून, विविध प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान सोन्यासारख्या जमिनी खाजगी उद्योजकांना कवडीमोल भावात विकल्या जात असल्यामुळे उद्योजकांचे उखळ पांढरे झाले आहे.असे खासगी विकासक कसेही आणि कुठेही भराव करित आहेत.यामुळे परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण होते असल्याची संतप्त प्रतिक्रिया विजय भगत या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :uran-acउरण