शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Uran: हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चेनंतरही ठोस तोडगा नाही, जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 21:41 IST

Raigad : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.  

- मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.  सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची  विचारविनिमय करण्यासाठी तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली आहे.त्यामुळे जेएनपीए विरोधात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम आहे. 

जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे. मात्र या जागेची मालकी जेएनपीएकडे असली तरी प्लानिंग ॲथोरिटी सिडको आहे.त्यामुळे जेएनपीए टाऊन प्लॅनिंग विभागाच्या मंजुरीनंतरही आराखड्याला सिडकोची मंजुरी आवश्यक असल्याने मंजुरीसाठी सिडकोकडे पाठविण्यात आला आहे.जेएनपीए रचनाकार विभागाने तयार केलेल्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत.हा त्रुटी असलेला आराखडा  मंजुरीसाठी वारंवार जिल्हा टाऊन प्लॅनिंग, सिडको आणि बोर्ड ऑफ ट्र्स्टीच्या बैठकीत ठेवून जेएनपीएने वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचा आरोप हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी केला आहे. त्रुटी दूर करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आराखडाच मागील काही महिन्यांपासून शासनाच्या लालफितीत अडकलेला असल्याने मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमधील असंतोषाची भावना अनावर झाली आहे.त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी   जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे, मनिषा जाधव, जेएनपीए कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, रविंद्र पाटील, न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,वपोनि संजीव धुमाळ, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद कोळी,हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाबाबत असलेल्या विविध त्रुटींबाबत चर्चा झाली. आराखड्यातील आवश्यक  त्रूटी दूर करण्याची तयारीही जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन दर्शवली आहे.मात्र सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची  विचारविनिमय करण्यासाठी आजच तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती  हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड