शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Uran: हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चेनंतरही ठोस तोडगा नाही, जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 21:41 IST

Raigad : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.  

- मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.  सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची  विचारविनिमय करण्यासाठी तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली आहे.त्यामुळे जेएनपीए विरोधात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम आहे. 

जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन मिळावी या मागणीसाठी मागील ३५ संघर्ष सुरू आहे.या ३५ वर्षांच्या संघर्षानंतर जेएनपीटी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा येथील २५६ कुटुंबीयांचे जुन्या फुंडे- जसखार गाव दरम्यान जेएनपीटीच्या मालकीच्या १०.०६ हेक्टर भुखंड देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

या विकसित करण्यात येणाऱ्या जागेमध्ये ६,९,१२ मीटर रुंदीचे रस्ते तयार करण्यालाही जेएनपीएने मान्यता दिली आहे.भुखंड विकसित करण्याच्या कामासाठी आवश्यक खर्चाची ५ कोटी ५९ लाखांची रक्कमही जेएनपीए प्रशासनाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहे. मात्र या जागेची मालकी जेएनपीएकडे असली तरी प्लानिंग ॲथोरिटी सिडको आहे.त्यामुळे जेएनपीए टाऊन प्लॅनिंग विभागाच्या मंजुरीनंतरही आराखड्याला सिडकोची मंजुरी आवश्यक असल्याने मंजुरीसाठी सिडकोकडे पाठविण्यात आला आहे.जेएनपीए रचनाकार विभागाने तयार केलेल्या आराखड्यात अनेक त्रुटी आहेत.हा त्रुटी असलेला आराखडा  मंजुरीसाठी वारंवार जिल्हा टाऊन प्लॅनिंग, सिडको आणि बोर्ड ऑफ ट्र्स्टीच्या बैठकीत ठेवून जेएनपीएने वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचा आरोप हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी केला आहे. त्रुटी दूर करुन मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आराखडाच मागील काही महिन्यांपासून शासनाच्या लालफितीत अडकलेला असल्याने मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमधील असंतोषाची भावना अनावर झाली आहे.त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी १५ एप्रिल रोजी   जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा इशाऱ्यानंतर मंगळवारी (११) रोजी जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांची बैठक झाली.प्रशासन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे, मनिषा जाधव, जेएनपीए कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, रविंद्र पाटील, न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर,वपोनि संजीव धुमाळ, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद कोळी,हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाबाबत असलेल्या विविध त्रुटींबाबत चर्चा झाली. आराखड्यातील आवश्यक  त्रूटी दूर करण्याची तयारीही जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सकारात्मक झालेल्या बैठकीतुन दर्शवली आहे.मात्र सकारात्मक झालेल्या चर्चेवर गावकऱ्यांची  विचारविनिमय करण्यासाठी आजच तातडीने बैठक बोलावून चर्चा केल्यानंतरच १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी रोखठोक भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली असल्याची माहिती  हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड