शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:12 IST

Raigad : होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मुरुड : गुरुवारी रात्री १०. ३० नंतर मुरुड तालुक्यात जोरदार वारे सुटल्यामुळे येथील नागरिक भयग्रस्त झाले होते. तर शुक्रवारी सकाळी सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या होड्यांनी पुन्हा किनारा गाठला आहे. ढगाळ वातावरणाचा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे.होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.मुरुड तालुक्यासह रोहा, बारशीव व अन्य ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीने पाऊस पडला आहे. बहुतांशी भागातील होड्या किनाऱ्याला लागलेल्या आढळून आल्या आहेत. तर काही बोटींनी मुंबई येथे आसरा घेतला आहे. हवामान खात्याने पहिलेच अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे अवकाळी पाऊस काही भागात पडला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण पुढे आठ ते दहा दिवस राहिल्यास मच्छीमारांचे मोठे हाल होणार आहेत. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी तुटपुंजी सापडत असल्याने बोटीवर होणार खर्चसुद्धा निघत नाही. त्यातच डिझेलचे वाढते भाव व रेशनिंगचे वाढलेले भाव यामुळे मच्छीमारांची स्थिती चिंताजनक झाली आहे. मच्छीमार मासळी पकडण्या व्यतिरिक्त इतर कोणतेही काम करीत नाहीत. केवळ मासळी पकडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. अन्य मार्गाने कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने केवळ मासळीवरच त्यांचे जीवन अवलंबून आहे.शासनाकडून अद्यापर्यंत डिझेल परतावा रक्कमसुद्धा अदा करण्यात आलेली नाही. क्यार व चक्री वादळाची मदतसुद्धा काही मच्छीमार सोसयट्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सध्या मच्छीमार अनेक संकटावर मात करून जीवन कसेबसे जगत आहेत.

सनाकडून मिळणारी मदत तुटपुंजीरायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांच्याशी संपर्क साधला असता हवामान खात्याने अगोदरच सूचना केली होती. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस व ढगाळ वातावरण राहिले आहे. काही भागात जोरदार वारेसुद्धा वाहिले आहेत. त्यामुळे मच्छीमार बोटींनी जिथे मिळेल तिथे आसरा घेतला आहे. मासेमारीची आता फक्त तीन महिने बाकी राहिले आहेत. येणाऱ्या तीन महिन्यात मासळी मुबलक प्रमाणात मिळणे खूप गरजेचे आहे. जून महिन्यापासून मासेमारी बंद असते. अशावेळी आगामी तीन महिन्यावर मच्छीमारांचे जीवन निर्भर असणार आहे. शासनाकडून मिळणारी मदत ही फारच तुटपुंजी व वेळखाऊ असणारी असते. आता तरी शासनाने मच्छीमारांना विशेष पॅकेज जाहीर करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड