शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:12 IST

Raigad : होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मुरुड : गुरुवारी रात्री १०. ३० नंतर मुरुड तालुक्यात जोरदार वारे सुटल्यामुळे येथील नागरिक भयग्रस्त झाले होते. तर शुक्रवारी सकाळी सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या होड्यांनी पुन्हा किनारा गाठला आहे. ढगाळ वातावरणाचा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे.होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.मुरुड तालुक्यासह रोहा, बारशीव व अन्य ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीने पाऊस पडला आहे. बहुतांशी भागातील होड्या किनाऱ्याला लागलेल्या आढळून आल्या आहेत. तर काही बोटींनी मुंबई येथे आसरा घेतला आहे. हवामान खात्याने पहिलेच अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे अवकाळी पाऊस काही भागात पडला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण पुढे आठ ते दहा दिवस राहिल्यास मच्छीमारांचे मोठे हाल होणार आहेत. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी तुटपुंजी सापडत असल्याने बोटीवर होणार खर्चसुद्धा निघत नाही. त्यातच डिझेलचे वाढते भाव व रेशनिंगचे वाढलेले भाव यामुळे मच्छीमारांची स्थिती चिंताजनक झाली आहे. मच्छीमार मासळी पकडण्या व्यतिरिक्त इतर कोणतेही काम करीत नाहीत. केवळ मासळी पकडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. अन्य मार्गाने कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने केवळ मासळीवरच त्यांचे जीवन अवलंबून आहे.शासनाकडून अद्यापर्यंत डिझेल परतावा रक्कमसुद्धा अदा करण्यात आलेली नाही. क्यार व चक्री वादळाची मदतसुद्धा काही मच्छीमार सोसयट्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सध्या मच्छीमार अनेक संकटावर मात करून जीवन कसेबसे जगत आहेत.

सनाकडून मिळणारी मदत तुटपुंजीरायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांच्याशी संपर्क साधला असता हवामान खात्याने अगोदरच सूचना केली होती. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस व ढगाळ वातावरण राहिले आहे. काही भागात जोरदार वारेसुद्धा वाहिले आहेत. त्यामुळे मच्छीमार बोटींनी जिथे मिळेल तिथे आसरा घेतला आहे. मासेमारीची आता फक्त तीन महिने बाकी राहिले आहेत. येणाऱ्या तीन महिन्यात मासळी मुबलक प्रमाणात मिळणे खूप गरजेचे आहे. जून महिन्यापासून मासेमारी बंद असते. अशावेळी आगामी तीन महिन्यावर मच्छीमारांचे जीवन निर्भर असणार आहे. शासनाकडून मिळणारी मदत ही फारच तुटपुंजी व वेळखाऊ असणारी असते. आता तरी शासनाने मच्छीमारांना विशेष पॅकेज जाहीर करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड