शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणे आवश्यक- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:47 IST

गोरेगावमधील १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मदत

माणगाव : कोविड १९च्या काळात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रखडल्याचे माझ्यासह सर्वच पालकांना आणि विद्यार्थ्यांना टेन्शन आहे. परीक्षा घ्याव्या, असे युसीजी म्हणते, तर परीक्षा घेण्यास राज्य सरकार तयार नाही. याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याचा १० ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे, पण आता हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्राध्यापकांना त्यांची मते पाठविण्याचे आवाहन केले.निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १०० संगणक आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी गोरेगाव येथील दोशी वकील महाविद्यालयात करण्यात आले. त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, विद्यापीठाचे जॉइंट डायरेक्टर संजय सावंत, सरपंच जुबेर अब्बासी आदी मान्यवर उपस्थित होते.केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरण आखत आहे, याबाबत शिक्षक व प्राध्यापक वर्गाच्या सूचना मला मिळाल्या, तर त्याबाबत आम्हाला आमचे मत मांडता येईल, असे सुळे यांनी सांगून तशा सूचना करण्याचे आवाहन शिक्षकांना केले.खा. सुनील तटकरे यांनी गेल्या ८ ते १० वर्षांतील दहावी व बारावीचे निकाल पाहिले, तर त्यात कोकण नेहमी अव्वल असतो. चक्रीवादळानंतर शरद पवार यांनी कोकण दौरा केला त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्यानंतरच आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याची सूचना राज्य सरकारला केली. इतकेच नव्हे, तर पक्षाच्या माध्यमातून कोकणातील नुकसानग्रस्त महाविद्यालयांना पत्रे, संगणकांची मदत केल्याचे सांगितले.अदिती तटकरे यांनी पक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयांना केलेल्या मदतीची माहिती दिली.यावेळी सर्व लाभार्थी महाविद्यालयांना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीची पत्रे देण्यात आली, तसेच गोरेगांव येथील दहावी व बारावीतील पहिल्या तीन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.माणसे पाहिली की बरं वाटतंकोरोनोच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आॅनलाइन होणाऱ्या बैठकांबाबत विचारले असता, झूम कॉल्स बरेच झाले, व्हीसी झाली. आता कंटाळा आला. आता माणसं पहिली की बरं वाटतं. कारण माणुसकीचा वा नात्याचा ओलावा तो फोनमधून येत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे