शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणे आवश्यक- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:47 IST

गोरेगावमधील १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मदत

माणगाव : कोविड १९च्या काळात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रखडल्याचे माझ्यासह सर्वच पालकांना आणि विद्यार्थ्यांना टेन्शन आहे. परीक्षा घ्याव्या, असे युसीजी म्हणते, तर परीक्षा घेण्यास राज्य सरकार तयार नाही. याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याचा १० ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे, पण आता हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्राध्यापकांना त्यांची मते पाठविण्याचे आवाहन केले.निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या १६ महाविद्यालयांना राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १०० संगणक आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी गोरेगाव येथील दोशी वकील महाविद्यालयात करण्यात आले. त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, विद्यापीठाचे जॉइंट डायरेक्टर संजय सावंत, सरपंच जुबेर अब्बासी आदी मान्यवर उपस्थित होते.केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरण आखत आहे, याबाबत शिक्षक व प्राध्यापक वर्गाच्या सूचना मला मिळाल्या, तर त्याबाबत आम्हाला आमचे मत मांडता येईल, असे सुळे यांनी सांगून तशा सूचना करण्याचे आवाहन शिक्षकांना केले.खा. सुनील तटकरे यांनी गेल्या ८ ते १० वर्षांतील दहावी व बारावीचे निकाल पाहिले, तर त्यात कोकण नेहमी अव्वल असतो. चक्रीवादळानंतर शरद पवार यांनी कोकण दौरा केला त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्यानंतरच आतापर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई देण्याची सूचना राज्य सरकारला केली. इतकेच नव्हे, तर पक्षाच्या माध्यमातून कोकणातील नुकसानग्रस्त महाविद्यालयांना पत्रे, संगणकांची मदत केल्याचे सांगितले.अदिती तटकरे यांनी पक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयांना केलेल्या मदतीची माहिती दिली.यावेळी सर्व लाभार्थी महाविद्यालयांना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीची पत्रे देण्यात आली, तसेच गोरेगांव येथील दहावी व बारावीतील पहिल्या तीन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.माणसे पाहिली की बरं वाटतंकोरोनोच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आॅनलाइन होणाऱ्या बैठकांबाबत विचारले असता, झूम कॉल्स बरेच झाले, व्हीसी झाली. आता कंटाळा आला. आता माणसं पहिली की बरं वाटतं. कारण माणुसकीचा वा नात्याचा ओलावा तो फोनमधून येत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे