शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महामार्गाच्या भूमिगत कामामुळे विनाअडथळा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:28 IST

पोलादपूरजवळील मुंबई-गोवा महामार्ग एनएच- ६६ :   तळ कोकणात जाणारी वाहने थेट खालून जाणार 

लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : अनेक वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग एनएच- ६६ जुना- १७ या मार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. २०२२ पर्यंत संपूर्ण मार्गाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार पोलादपूर शहरालगत भूमिगत कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याने तीन जिल्ह्यांच्या टोकावर वसलेल्या पोलादपूरचे स्वरूप बदलत आहे. शहरातील भूमिगत मार्गिकांमुळे भविष्यात विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. या महामार्गाचे काम सध्या कशेडी ते इंदापूरपर्यंत वेगाने सुरू आहे. या मार्गामुळे तळ कोकणात जाणारी वाहने थेट खालून जाणार असल्यामुळे शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.

चौपदरीकरणामुळे कोकणात जाण्यासाठी बॉक्स कंटिंग, तर महाबळेश्वरकडे जाण्यासाठी उड्डाणपूल होणार आहे, याचे काम जलद गतीने सुरू आहे. सद्य:स्थितीत पोलादपूर स्थानक परिसर हा तीन जिल्ह्यांना जोडणारा असल्याने अनेक बस, खाजगी गाड्या, लहान- मोठी वाहने याठिकाणी थांबतात. मात्र, भविष्यात महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर हे चित्र दिसणार नाही.

महामार्गाच्या भूमिगत कामासाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महाड-  पोलादपूरमार्ग पोलादपूर हद्दीतील पार्ले गावापासून सुरू होतो. याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुढे शेलार ढाबा ते  बालाजी हॉटेल येथे उड्डाणपूल करण्यात येत आहे, तसेच काळभैरव देवस्थानपासून सडवली पुलापर्यंत भूमिगत मार्गिका करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत सडवली पुलाकडून भूमिगत मार्गिकेचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. अंदाजे ३० फूट खाली व चार पदरी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी व पोलादपूर बसस्थानकापर्यंत येण्यासाठी या ठिकाणी एक उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पोलादपूर बसस्थानकालगत आत व बाहेरील प्रवेश द्वाराजवळ दोन पूल बांधण्यात येणार आहेत. याठिकाणी शिरवळचा पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचे चित्र दिसते.

स्थानिक व्यावसायिकांवर होणार परिणामपोलादपूर बसस्थानक परिसरात मुंबई, कोकण, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात दुतर्फा छोटे-मोठे व्यावसायिक उदरनिर्वाह करत होते. मात्र, चौपदरीकरणाच्या कामामुळे हा परिसर पूर्ण उजाड झाल्याने, शेकडो व्यावसायिकांना त्याचा व्यवसाय गुंडाळावा लागला होता. सध्या काही व्यावसायिकांनी महामार्गावर नव्याने बांधलेल्या भूमिगत गटारीवर आपले बस्तान मांडले असले तरी भविष्यात स्थानिक व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम होणार आहे.