शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

उमटे धरणातील गाळ जेएसडब्ल्यू काढणार?; पाण्याचा १० कि.मी.च्या परिघातील गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:00 IST

उमटे धरणामध्ये मोठ्या संख्येने साचलेला गाळ उपसण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे अशी व्यवस्था नसल्याने ही जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर टाकण्यात आली आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : उमटे धरणामध्ये मोठ्या संख्येने साचलेला गाळ उपसण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे अशी व्यवस्था नसल्याने ही जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीकडून हिरवा कंदील मिळताच पुढील काही दिवसांमध्ये गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामाला उशीर झाल्यास पावसाच्या कालावधीत गाळ काढता येणार नाही. त्यामुळे धरणाच्या १० किलोमीटरच्या परिघामधील गावे, शेती हे धरणाच्या पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तातडीने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरत आहे.पावसाळ््यात येणाºया आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात आपत्तीशी दोन हात करताना निसर्गाच्या कोपापुढे गुडघे टेकावेच लागतात. नद्या, धरणांना पूर आल्याने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशीच भीती सध्या रामराज परिसरातील उमटे धरणाच्या बाबतीमध्ये ग्रामस्थांना सतावत आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाला १५ मेची डेडलाइन उलटून गेली तरी सुरुवात झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. धरणातील गाळ काढण्याच्या कामाला १५ मेनंतर सुरुवात करण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले होते. नुकतीच आपत्तीच्या झालेल्या आढावा बैठकीमध्ये उमटे धरणातील गाळ उपसण्याच्या कामाचा विषय चर्चेला आला होता. धरणातील गाळ बरीच वर्षे काढला नाही. त्यामुळे पावसाच्या कालावधीमध्ये नदीचे पात्र लवकर भरून उमटे धरणातून ओव्हर फ्लो सुरू होतो. धरणातून फेकले जाणारे अतिरिक्त पाणी सुमारे १० किलोमीटरच्या परिघात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरे, शेती, गोठ्यांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात हानी होण्याची भीती ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी व्यक्त केली. ९० च्या दशकात आलेल्या जांभूळपाडा पुराची तसेच २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीचा हवाला त्यांनी दिला. मोठ्या संख्येने मनुष्य आणि वित्त हानी झाल्याची आठवणही करुन दिली.प्रशासनाने उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी जबाबदारी जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीवर सोपवली आहे. परंतु अद्यापही गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थ चांगलेच हवालदिल झाले आहेत. २०१८ च्या पावसाळ््याच्या आधी धरणाला मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी भगदाड पडले होते. ग्रामस्थांचा आवाज लोकमतने लावून धरल्याने अखेर प्रशासनाला जाग आली. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने धरणाची डागडुजी केली होती, असे ग्रामस्थ अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर यांनी स्पष्ट केले. आताच्या पावसामध्ये धरणातील गाळ काढण्यात आला नाही तर पाण्याचा दाब वाढून धरणातील पाणी सर्वदूर पसरणार आहेच शिवाय धरणाच्या भिंतीलाही धोका पोचण्याची शक्यता असल्याचे बोरघर ग्रामपंचायतीचे सदस्य अ‍ॅड. पुनकर यांनी स्पष्ट केले.धरणातील गाळ काढण्याबाबत गेल्या तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या संपर्कामध्ये आहोत. १५ मेनंतर धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होईल असे संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले होते. प्रशासनाला ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांनी तातडीने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी काँग्रेसचे नदीम बेबन यांनी केली.३० दशलक्ष घनफूट पाणी कमीरामराज परिसरात या धरणाची निर्मिती १९७८ साली करण्यात आली होती. त्यानंतर १९९५ साली हे धरण प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आले होते. त्यामुळे धरणाची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर आहे. उमटे धरणाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. सद्यस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे ३० दशलक्ष घनफूट कमी झाली आहे.३०० ट्रक गाळाची शक्यताधरणाचे पात्र मोठे आहे, परंतु बरीच वर्षे गाळ न काढल्याने थोड्याशा पावसात देखील लगेच ओव्हर फ्लो होते. धरणातून सुमारे एक हजार ८०० ब्रास गाळ म्हणजेच सुमारे ३०० हायवा ट्रक भरून निघण्याची शक्यता आहे. यासाठी मोठ्या संख्येने जेसीबी, डम्पर आणि कामगारांची आवश्यकता लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा नसल्याने जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीला साकडे घालण्यात आले आहे. त्यांनी हिरवा कंदील दिल्यावरच प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.धरणातील गाळ काढण्याबाबत आपत्ती व उपाययोजनेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. धरणातून सुमारे ३०० ट्रक भरून गाळ निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडे तशा सुविधा नाहीत. त्यामुळे जेएसडब्ल्यू या खासगी कंपनीची मदत घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला. त्यानुसार कंपनीला कळवण्यात आले आहे. लवकरच त्यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात येईल.- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता

टॅग्स :Raigadरायगड