शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

उल्हास, चिल्हार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; पुलावरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 00:04 IST

सतत तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या उल्हास व चिल्हार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक पुलांवरून पाणी गेल्याने सुमारे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून माती, दगड रस्त्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले, झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शेतीमध्येही पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.सतत तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसात बेकरे येथील धनगर वाडा येथील घर कोसळून मोठे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.नेरळ ते वांगणीदरम्यान रेल्वेमार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कामावर गेलेले अनेक जण कल्याण, बदलापूरदरम्यान अडकून पडले. अनेक रस्त्यांवर झाडे पडली आहेत, तर ररस्त्यालगत दरडी कोसळल्या आहेत. धोमोते पुलावरील रेलिंग तुटल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. एकूणच पावसामुळे परिसर जलमय झाल्याचे दिसून आले.नेरळ - माथेरान घाटात सतत दोन दिवस दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कर्जत तालुक्यातील दहिवली, सवरोली, आंबिवली, मोहाची वाडी पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिंगढोल-आंबिवली रस्त्याच्या पुलावरूनदेखील पाणी गेल्याने पुलाचा काही भाग खचला. माले रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे. परिसरातील धरणे, धबधबे दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.नेरळ बिरदोले गावात पाणी शिरल्याने शेतकरी आणि गुरांना वाचविण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Karjatकर्जत