शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

उल्हास, चिल्हार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; पुलावरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 00:04 IST

सतत तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या उल्हास व चिल्हार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक पुलांवरून पाणी गेल्याने सुमारे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून माती, दगड रस्त्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले, झाडे कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शेतीमध्येही पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.सतत तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसात बेकरे येथील धनगर वाडा येथील घर कोसळून मोठे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.नेरळ ते वांगणीदरम्यान रेल्वेमार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कामावर गेलेले अनेक जण कल्याण, बदलापूरदरम्यान अडकून पडले. अनेक रस्त्यांवर झाडे पडली आहेत, तर ररस्त्यालगत दरडी कोसळल्या आहेत. धोमोते पुलावरील रेलिंग तुटल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. एकूणच पावसामुळे परिसर जलमय झाल्याचे दिसून आले.नेरळ - माथेरान घाटात सतत दोन दिवस दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कर्जत तालुक्यातील दहिवली, सवरोली, आंबिवली, मोहाची वाडी पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिंगढोल-आंबिवली रस्त्याच्या पुलावरूनदेखील पाणी गेल्याने पुलाचा काही भाग खचला. माले रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला आहे. परिसरातील धरणे, धबधबे दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.नेरळ बिरदोले गावात पाणी शिरल्याने शेतकरी आणि गुरांना वाचविण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Karjatकर्जत