शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'मुख्यमंत्री पद जाऊनही काही जण त्याच भ्रमात, खिलाडूवृत्ती न स्विकारता...' , उदय सामंत यांची उध्दव ठाकरेंवर टीका

By राजेश भोस्तेकर | Updated: March 6, 2024 09:26 IST

शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी याच्या एम डी ग्रुप आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी ५ मार्च रोजी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती.

अलिबाग : क्रिकेट खेळ मी ही खेळलो असून सचिन तेंडुलकर झालो नाही. पण राजकारणात कोणाच्या गुगली वर सिक्स मारायचा कसा आऊट, लेग स्विंग टाकायचा आणि गुगली टाकायचा, कधी त्रिफळा चीत करायचे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले माहीत आहे. काहीजण मुख्यमंत्री पद गेले असूनही मुख्यमंत्री असल्यासारखे टीका करत फिरत आहेत. ही खिलाडूवृत्ती नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. खिलाडी वृत्ती जर शिकायची असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आदर्श घ्यावा लागेल अशी बोचरी टीकाही सामंत यांनी केली आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी याच्या एम डी ग्रुप आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी ५ मार्च रोजी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी आपल्या भाषणात सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. माजी आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र दळवी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रिकेट स्पर्धेचे केलेल्या नियोजनबध्द आयोजनाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यासह आयोजकांचे अभिनंदन केले. 

एकाद्याचे मंत्री पद गेले तर खिलाडू वृत्तीने स्वीकारले पाहिजे आणि मंत्रिपद गेले याची जाणीव व्हावी लागते. एखाद्या संघटनेचे पद गेले तर माझे पद गेले हे स्वीकारावे लागते. माझं मुख्यमंत्री पद गेले हे सुध्दा स्वीकारावे लागते. मुख्यमंत्री असल्यासारखे कायमस्वरूपी टीका करीत फिरणे ही खिलाडी वृत्ती होऊ शकत नाही. खिलाडी वृत्ती जर शिकायची असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा आदर्श घ्यावा लागेल अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणातून केली आहे. 

टेनिस स्पर्धेला सहा महिन्यापूर्वी राजाश्रय मिळाला. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद मला देण्यात आले आहे. लेदर स्पर्धा खेळून आपले करियर बनवले जाते. तसेच भविष्यात टेनिस स्पर्धेतील खेळाडूना ही सुध्दा करियर करण्यासाठी असोसिएशन काम करेल असा विश्वासही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवला. 

शेकापचे प्रशांत नाईक आणि आमदार महेंद्र दळवी हे व्याही आहेत. स्पर्धेमुळे एकत्र आले आहेत. भविष्यात राजकारणात ही एकत्र या असे मत उदय सामंत यांनी बोलून दाखवले. क्रिकेट स्पर्धेमुळे दोन राजकीय नेते खेळासाठी  आणि विकासासाठी एकत्र येतात. ही खिलाडू वृत्ती आहे. तसेच राजकारणाला स्पर्श न करता एकत्र येतात. भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. असेही सामंत यांनी म्हटले आहे. तर अलिबागचा पुढील आमदार महेंद्र दळवी हेच होतील असा विश्वासही बोलून दाखवला आहे.