शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

रोह्यात ३४२ एकर जमीन लाटण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:25 IST

रोहे तालुक्यातील दिव या गावात गट नं. १३३ मधील १३७ हेक्टर २५ आर म्हणजे सुमारे ३४२ एकर सरकारी खाजण जमीन आहे. गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती व्यवसाय करीत आहेत.

अलिबाग : रोहे तालुक्यातील तब्बल ३४२ एकर सरकारी जमीन प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून दलालांनी घशात घातली होती, मात्र सर्वहारा जन आंदोलनाने वेळीच दलालांचे मनसुबे उघडकीस आणले आणि कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा बाहेर काढला आहे. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेत सदर व्यवहार रद्द केला आहे, अशी माहिती सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.रोहे तालुक्यातील दिव या गावात गट नं. १३३ मधील १३७ हेक्टर २५ आर म्हणजे सुमारे ३४२ एकर सरकारी खाजण जमीन आहे. गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती व्यवसाय करीत आहेत. सदरच्या जमिनीवर शेतकºयांनी अतिक्र मण केल्याने त्यांना त्याबाबतचा दंड देखील आकारण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी दंड भरून ही जमीन शेतकºयांच्या नावावर करण्यात याव्यात. याबाबत येथील शेतकºयांनी तहसील प्रशासन रोहा यांना अर्ज केला होता.याचा फायदा याच गावातील काही दलालांनी घेतला. त्यांनी शेतकºयांना बोलवून जागा नावावर करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करीत असल्याचे खोटेच सांगितले. त्यानुसार शेतकºयांनी आपापल्या सह्या दलालांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर केल्याचे उल्का महाजन यांनी सांगितले.दलालांनी त्यानंतर सरकार दरबारी दलालांनी आपले वजन वापरून तब्बल ३४२ एकर जमिनीवर ताबे कब्जा घेण्यासाठी महसूल अधिकाºयांना हाताशी धरून या सर्व जागेवर द. क. खोत यांच्या नावाची नोंद करून घेतली. हा झालेला बदल त्यांनी २६ जानेवारी २०१९ मध्ये जाहीर केला.खोती जमीन जाहीर करण्यापूर्वी दलालांनी तब्बल १४२ कुळांची नावे या सातबारावर दाखल केली होती. प्रत्यक्षात या जमिनीमध्ये कसणाºया शेतकºयांची संख्या ६० आहे. या ६० शेतकºयांना कूळ म्हणून दाखल करून दलालांनी आपल्या ८२ नातेवाइकांची नावे कुळात घुसवली असल्याचा आरोप उल्का महाजन यांनी केला.दलालांनी सरकारी खाजण जमिनीवर कुळांच्या नोंदी १८ फेब्रुवारी २०१९ रोजी केल्या आहेत. कुळांची अखत्यार पत्र दुय्यम निबंधक कार्यालयात २ फेब्रुवारी २०१९ रोजी दाखल केली. आपण केलेली फसवणूक बाहेर पडू नये म्हणून स्थानिक शेतकºयांना कूळ बनवले. तलाठी कार्यालयात असणाºया सातबारावर मार्च आणि एप्रिलमध्ये १३ फेरफारच्या नोंदी केल्या आहेत. लावलेल्या शेतकरी कुळांना दुय्यम निबंधक कार्यालयात आणण्या आगोदर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. ही प्रक्रि या जमीन नावावर होणार असल्याचे खोटे सांगून करण्यात आली होती.- गेले चार पिढ्या या जमिनीवर सुमारे ६० कुळे पारंपरिक शेती करीत आहेत. सदरच्या जमिनीवर शेतकºयांनी अतिक्र मण केल्याने त्यांना त्याबाबतचा दंड देखील आकारण्यात आला होता. त्यानंतर शेतकºयांनी दंड भरून ही जमीन शेतकºयांच्या नावावर करण्यात याव्यात. याबाबत येथील शेतकºयांनी तहसील प्रशासन रोहा यांना अर्ज केला होता.व्यवहार झाल्यावर पैसे शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यातील २५ टक्के रक्कम शेतकºयांना दिली. उर्वरित रक्कम दलालांनी शेतकºयांना धमकावून आपल्या खिशात घातल्या आरोप उल्का महाजन यांनी केला.जिल्ह्यात विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. शेतकºयांना कवडीमोल दर देऊन त्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी दलालांची धावपळ सुरू आहे. अनेक मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये फसवणूक करणाºया दलालांची आणि गुंतवणूकदारांची साखळी कार्यरत आहे, असेही महाजन यांनी सांगितले.अतिक्रमण केलेल्या आणि दंड भरलेल्या जमिनी आमच्या नावावर करून देणार असल्याचे दलालांनी सांगितले होते. त्यानुसार आम्ही कागदपत्रांवर सह्या केल्या. त्यानंतर या दलालांनी आम्ही कसत असलेली जमीन गुंतवणूकदारांना विकली. विक्री व्यवहारानंतर आलेली रक्कमही त्यांनी हडप केली. दलाल आणि पंचांवर कारवाई करायला पाहिजे.- रंजना पाटील,महिला शेतकरी, रोहे

टॅग्स :Raigadरायगड