शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
4
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
5
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
6
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
7
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
8
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
9
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
10
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
11
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
13
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
14
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
15
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
16
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
17
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
18
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
19
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
20
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित

दोन तरुणांनी विझवला सरसगडावरील वणवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:06 IST

ज्ञानेश्वर जगताप आणि अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत तत्परतेने हा वणवा विझवून मोठी हानी टाळली. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विनोद भोईर पाली : येथील सरसगड किल्ल्यावर शुक्रवारी २४ एप्रिल रोजी रात्री वणवा लागला होता. काही वेळातच हा वणवा मानवी वस्तीजवळ पोहोचला असता. याबरोबरच वृक्षराजी आणि पशुपक्ष्यांचीदेखील हानी झाली असती. मात्र येथील ज्ञानेश्वर जगताप आणि अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत तत्परतेने हा वणवा विझवून मोठी हानी टाळली. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सायंकाळी किल्ल्याला लागलेली आग भास्कर दुर्गे व राजेश इंदुलकर यांनी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर ही आग पुन्हा भडकली व उग्र होत गेली. याबाबत अमित निंबाळकर यांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर जगतापचा फोन आला. त्याने किल्ल्याावरील वणवा विझवायला ये म्हणून सांगितले, मग बॅटरी घेऊन तडक किल्ल्याच्या दिशेने निघालो. वरच्या माळावर पोहोचलो तर ज्ञाना एकटाच दिसला. म्हटले अजून कोण आहे का? दोघा-तिघांची नावे घेतली त्याने, म्हटले येतील ते येतील, आग वाढली तर जास्त वर जाता येणार नाही. मग दोघांनीही कोयता घेऊन सरळ आगीच्या दिशेने कूच केली. ज्ञाना बूट घालून तयारीत आला होता. मी मात्र साधी स्लीपर घालून आलो होतो. नावाप्रमाणे ती स्लिप करत होती. पहिला टप्पा विझवला, थोडी आग राहिली होती. ज्ञानाच्या म्हणण्याप्रमाणे येताना कुठून आलो ते कळायला राहू दे. समोर फक्त आग दिसत होती आणि जाऊन विझवायची आहे एवढेच डोक्यात होते. मग बघता बघता दोघांनी काम फत्ते केले. पायाला खाज, घामाच्या धारा, मध्येच निखारे, सहज प्रश्न आला मनात, मागे वळून बघू, बापरे वणव्याच्या नादात खूपच वर आलो होतो. उतरताना कळलं की अगदी सरळ चढाई केली होती आणि मग बसत-बसत उतरलो. सुरुवातीला राहिलेली आग विझवली आणि पुन्हा पालीत आलो, असे अमित निंबाळकर या तरुणाने सांगितले.अशा प्रकारे या दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता सरसगडावरील आग विझवली आणि मोठे नुकसान टाळले. त्याबरोबरच येथील वनसंपदा, प्राणी व पशू यांनादेखील जीवदान दिले. या वेळी पाली वनविभागाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी तरुणांचे अभिनंदन केले. तसेच सुधागड वनक्षेत्रात वणवा नियंत्रणासाठी वन विभागाकडे फायर ब्लोअर्स उपलब्ध आहेत. जिथे वणवा असेल त्या विभागातील आमच्या वनरक्षक, वनपाल किंवा वनक्षेत्र कार्यालयात संपर्क करावा. जेणेकरून आग लगेच आटोक्यात आणता येईल, असे शिंदे यांनी सांगितले.बहुतांश वणवे मानवनिर्मित : वणव्यांमुळे सापांची संख्या व प्रजाती नष्ट होत आहेत. भारतीय वन सर्वेक्षणाच्या (एफएसआय) अहवालानुसार देशात सर्वाधिक वणवे लागणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या दहात आहे. बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे पेटविल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्लेही जळून जातात. त्यामुळे त्यांची संख्याही रोडावत चालली आहे. हा वणवा एकदा पेटला की परिसरातील जंगल अगदी महिनाभरसुद्धा जळत राहू शकते. या वणव्यामुळे होणाºया उजाड डोंगरांमुळे सर्वत्र निसर्गसौंदर्याला, हिरवळीला हानी पोहोचून जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी अनेकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत. वणवा लागल्यानंतरच्या उपाययोजना हा कितीही प्रयत्न केला तरी अवघड विषय आहे. तेव्हा शक्य असेल तर निसर्ग वाचवायला या, कारण तोच आपला तारणहार आहे, असे अमित निंबाळकर याचे मत आहे.