शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरुणांनी विझवला सरसगडावरील वणवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:06 IST

ज्ञानेश्वर जगताप आणि अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत तत्परतेने हा वणवा विझवून मोठी हानी टाळली. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विनोद भोईर पाली : येथील सरसगड किल्ल्यावर शुक्रवारी २४ एप्रिल रोजी रात्री वणवा लागला होता. काही वेळातच हा वणवा मानवी वस्तीजवळ पोहोचला असता. याबरोबरच वृक्षराजी आणि पशुपक्ष्यांचीदेखील हानी झाली असती. मात्र येथील ज्ञानेश्वर जगताप आणि अमित निंबाळकर या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावत तत्परतेने हा वणवा विझवून मोठी हानी टाळली. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सायंकाळी किल्ल्याला लागलेली आग भास्कर दुर्गे व राजेश इंदुलकर यांनी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर ही आग पुन्हा भडकली व उग्र होत गेली. याबाबत अमित निंबाळकर यांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर जगतापचा फोन आला. त्याने किल्ल्याावरील वणवा विझवायला ये म्हणून सांगितले, मग बॅटरी घेऊन तडक किल्ल्याच्या दिशेने निघालो. वरच्या माळावर पोहोचलो तर ज्ञाना एकटाच दिसला. म्हटले अजून कोण आहे का? दोघा-तिघांची नावे घेतली त्याने, म्हटले येतील ते येतील, आग वाढली तर जास्त वर जाता येणार नाही. मग दोघांनीही कोयता घेऊन सरळ आगीच्या दिशेने कूच केली. ज्ञाना बूट घालून तयारीत आला होता. मी मात्र साधी स्लीपर घालून आलो होतो. नावाप्रमाणे ती स्लिप करत होती. पहिला टप्पा विझवला, थोडी आग राहिली होती. ज्ञानाच्या म्हणण्याप्रमाणे येताना कुठून आलो ते कळायला राहू दे. समोर फक्त आग दिसत होती आणि जाऊन विझवायची आहे एवढेच डोक्यात होते. मग बघता बघता दोघांनी काम फत्ते केले. पायाला खाज, घामाच्या धारा, मध्येच निखारे, सहज प्रश्न आला मनात, मागे वळून बघू, बापरे वणव्याच्या नादात खूपच वर आलो होतो. उतरताना कळलं की अगदी सरळ चढाई केली होती आणि मग बसत-बसत उतरलो. सुरुवातीला राहिलेली आग विझवली आणि पुन्हा पालीत आलो, असे अमित निंबाळकर या तरुणाने सांगितले.अशा प्रकारे या दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता सरसगडावरील आग विझवली आणि मोठे नुकसान टाळले. त्याबरोबरच येथील वनसंपदा, प्राणी व पशू यांनादेखील जीवदान दिले. या वेळी पाली वनविभागाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी तरुणांचे अभिनंदन केले. तसेच सुधागड वनक्षेत्रात वणवा नियंत्रणासाठी वन विभागाकडे फायर ब्लोअर्स उपलब्ध आहेत. जिथे वणवा असेल त्या विभागातील आमच्या वनरक्षक, वनपाल किंवा वनक्षेत्र कार्यालयात संपर्क करावा. जेणेकरून आग लगेच आटोक्यात आणता येईल, असे शिंदे यांनी सांगितले.बहुतांश वणवे मानवनिर्मित : वणव्यांमुळे सापांची संख्या व प्रजाती नष्ट होत आहेत. भारतीय वन सर्वेक्षणाच्या (एफएसआय) अहवालानुसार देशात सर्वाधिक वणवे लागणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या दहात आहे. बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे पेटविल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्लेही जळून जातात. त्यामुळे त्यांची संख्याही रोडावत चालली आहे. हा वणवा एकदा पेटला की परिसरातील जंगल अगदी महिनाभरसुद्धा जळत राहू शकते. या वणव्यामुळे होणाºया उजाड डोंगरांमुळे सर्वत्र निसर्गसौंदर्याला, हिरवळीला हानी पोहोचून जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी अनेकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत. वणवा लागल्यानंतरच्या उपाययोजना हा कितीही प्रयत्न केला तरी अवघड विषय आहे. तेव्हा शक्य असेल तर निसर्ग वाचवायला या, कारण तोच आपला तारणहार आहे, असे अमित निंबाळकर याचे मत आहे.