शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

करंजा धक्क्या‌‌वर पार्क केलेल्या दुचाकी फेकल्या समुद्रात; समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:05 IST

Uran : रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करून उरण येथे येणारे प्रवासी, कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

उरण : करंजा येथील बंदरात कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवासी, कामगारांच्या पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या दुचाकी काही समाजकंटकांकडून थेट समुद्रात टाकून देण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी उरण पोलिसांकडे करण्यात आली आहे.रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करून उरण येथे येणारे प्रवासी, कामगारांची संख्या मोठी आहे. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उरण येथून अलिबाग येथे जाणारे आणि अलिबाग परिसरातून उरण येथे कामानिमित्ताने येणारे प्रवासी, कामगार वेळ, पैसे वाचविण्यासाठी दुचाकी घेऊन येत असतात. याआधी बंदरावर पार्क करून ठेवण्यात येणाऱ्या दुचाकींतून पेट्रोलची चोरी करणे, नासधूस करणे आदी प्रकार सातत्याने घडत होते. परंतु आता येथे पार्क करून ठेवलेल्या दुचाकी काही समाजकंटकांकडून थेट बंदरातील समुद्रात टाकून देण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तीन दिवसांपूर्वी उरण पंचायत समितीचे कर्मचारी तेजस म्हात्रे यांची गाडी समुद्रात टाकण्यात आली होती. समुद्राच्या ओहोटीमुळे दुचाकी प्रवाशांच्या नजरेस पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अशा कृत्यांमुळे प्रवासी, कामगारांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड