शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 05:03 IST

भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ खान (२३) आणि ऋषभ सिव्हा (२४) हे दोघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले.

रायगड : भरती सुरू झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किना-याकडे परत येताना, भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ खान (२३) आणि ऋषभ सिव्हा (२४) हे दोघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी तत्काळ समुद्रकिनारी पोहोचून, बुडालेल्या पयर्टकांच्या शोधाकरिता अलिबाग कोळी बांधवांच्या सहकार्याने बोटी उपलब्ध करून दिल्या; परंतु या शोधकार्यास यश आले नाही. भरतीच्या प्रवाहाबरोबर हे दोघेही रेवदंडा समुद्रकिनाºयाकडे वाहत गेले असावेत, असा अंदाज जाणकार कोळीबांधवांनी व्यक्त केला आहे. अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निघोट, अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी समुद्रकिनारी पोहोचून शोधकार्याकरिता नियोजन केले.रसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेले एकूण पाच मित्र अलिबाग समुद्रकिनारी मंगळवारी पर्यटनार्थ आले होते. त्यापैकी तिघांनी अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहण्यास जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी समुद्रास पूर्णपणे ओहोटी होती. परत येताना भरतीचे पाणी भरू लागले. त्यांनी त्याच भरतीच्या पाण्यातून किनाºयाकडे येण्यास प्रारंभ केला.मात्र भरतीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने सौरभ खान आणि ऋ षभ सिव्हा हे दोघे प्रवाहात वाहत जाऊन समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा तिसरा सहकारी मित्र सुरेश स्वामी (सध्या रा. रसायनी, मूळ-अक्कलकोट) हा सुदैवाने पोहत समुद्रकिनारी पोहोचला. त्याने आपल्या अन्य दोघा मित्रांचा किनाºयावर प्रथम शोध घेतला. त्यानंतर त्यांनी अलिबाग पोलिसांशी संपर्क साधल्यावर, तत्काळ ही शोधमोहीम सुरू करण्यात आली.>स्थानिकांच्या सूचनेकडे पर्यटकांचे दुर्लक्षअलिबागच्या समुद्रात दोघे पर्यटक बुडाले असताना, त्यांना शोधण्याकरिता शोधमोहीम सुरू असताना, याच किनाºयावरील भरतीच्या पाण्यात किमान २०० पर्यटक पाण्यात पोहत आणि डुंबत होते. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्यात जाऊ नका, असे स्थानिक नागरिकांनी यापैकी काही जणांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक समुद्रात डुंबतच होते.