शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जिल्ह्यात दोन हजार नागरिकांना विंचूचा चावा

By निखिल म्हात्रे | Updated: February 4, 2024 18:02 IST

रायगड जिल्ह्यात सर्प दंश तसेच विंचूदंशाचे प्रमाण वाढले आहे.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात सर्प दंश तसेच विंचूदंशाचे प्रमाण वाढले आहे. मागील 14 महिन्यात जिल्ह्यात 393 जणांना सर्प तर सुमारे दोन हजार जणांना विंचूदंश झाला असून, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करुन सर्प व विंचू दंश झालेल्या अनेक रुग्णांचे प्राण वाचविले असल्याचे आकडेवारीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते. सध्याच्या मौसमात साप व विंचू बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या काळावधीत सर्प व विंचू दंशाचे प्रमाण वाढते. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 महिन्यात जिल्ह्यात 393 जणांना सर्प तर सुमारे दोन हजार जणांना विंचूदंश झाला आहे. यामध्ये सर्पदंशाने पाच जणांना तर विंचू एकाला प्राण गमवावे लागले आहेत. सर्प व विंचूदंशाचे सर्वाधिक प्रमाण अलिबाग तालुक्यात आहे. पनवेल, खालापूर, महाड, माणगाव या तालुक्यांमध्येही सर्प व विंचूदंशाचे प्रमाण जास्त आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील अ‍ॅन्टी स्नेक व्हॅक्सीन, तर अ‍ॅन्टी स्कोर्पियन व्हॅक्सीन मुबलक प्रमाणात ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात या औषधांचा साठा अधिक आहे. रुग्णालयांना औषधांची अतिरिक्त गरज भासली तर तत्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अंबादास देवमाने यांनी दिली.

सर्प वा विंचू दंश झाल्यावर तत्काळ सरकारी रुग्णालयात रुग्णास आणल्यास त्यावर त्वरीत योग्य ते उपचार होत असल्याने या दोन्हीतील मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प असल्याचे मागील 14 महिन्यातील आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परंतु आजही ग्रामीण भागात सर्प वा विंचू दंश झाल्यावर त्याचे विष उतरवण्याकरीता मांत्रिक वा भगताकडे रुग्णास नेले जाते. व नंतर रुग्णालयात आणले जाते. यामुळे काही वेळेस रुग्णाचा मृत्यू होतो. सर्प दंश वा विंचू दंश झाल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात रुग्णास दाखल करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.

सर्पदंश आणि विंचूदंशचे प्रमाण मोठे असले तरी त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालय, माणगांव, पेण, कजर्त, रोहा व श्रीवर्धन अशी पाच उप जिल्हा रुग्णालये तर उरण, महाड, जसवली, मुरुड, पोलादपूर, पनवेल, चौक आणि कशेळे ही आठ ग्रामीण रुग्णालये अशा जिल्ह्यातील 14 ठिकाणी सर्पदंश आणि विंचूदंशावर तत्काळ उपचार उपलब्ध होत असल्याने सर्पदंश आणि विंचूदंशाच्या मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली आहे. सापांचा वावर रात्री जास्त असतो, त्यामुळे अंधारात चालताना बॅटरी सोबत असावी, साप आपल्या समोर आल्यास न घाबरता स्तब्ध उभे राहावे, सापाचे लक्ष विचलित करण्यासाठी जवळची एखादी वस्तू बाजूला फेकल्यास त्या वस्तूकडे सापाचे लक्ष जाताच तुम्ही बाजूला व्हावे. तसेच साप चावल्यास मांत्रिक व भगताकडे न जाता रुग्णालयात जाऊन उपचार करावेत. - संदिप ठाकूर, प्राणीमित्र.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग