शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांच्या नोटा ठरताहेत त्रासदायक

By admin | Updated: November 14, 2016 04:29 IST

मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करत दोन हजारांची आणि नवीन ५०० रुपयांची नोट बाजारामध्ये आणली.

दासगाव : मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करत दोन हजारांची आणि नवीन ५०० रुपयांची नोट बाजारामध्ये आणली. गुरुवारपासून प्रत्येक बँक तसेच पोस्टामार्फत नागरिकांना चार हजार रुपयांप्रमाणे १०० रुपयांच्या नोटा देण्यास सुरुवात केली. तसेच नवीन आलेली दोन हजारांची नोट बाजारामध्ये पोहोचून गोरगरीब जनतेच्या हाती लागली; परंतु आजही बाजारामध्ये सुट्या पैशांची कमतरता आहे. नवीन आलेल्या ५०० रुपयांच्या नोटा अद्याप बाजारात आलेल्या नाहीत. यामुळे दोन हजारांची नवीन नोट जरी आली असली तरी एवढ्या मोठ्या नोटीला सुटे पैसे येणार कोठून हा प्रश्न समस्या बनल्याने सध्यातरी दोन हजारंची नोट त्रासदायक बनली आहे. एक हजारांची नोट बंद करून त्या ठिकाणी दोन हजारांची नोट आणण्यात आली. शुक्रवारपर्यंत एक हजार आणि ५०० च्या नोटा बाजारामध्ये सुरू होत्या. मात्र, शासनाच्या निर्णयाप्रमाणे शनिवारपासून या नोटा चालणार नसून ज्यांच्याकडे आहेत त्यांनी बँकेत आपल्या खात्यांमध्ये भरायच्या आहेत. नोटांच्या बंदीनंतर एक दिवस सर्व बँका बंद ठेवून दुसऱ्या दिवशी उघडत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या बँकामध्ये प्रति नागरिक चार हजार रुपये १०० रु.च्या स्वरूपात वाटप सुरू झाले. कोट्यवधी रुपयांच्या १०० च्या नोटा बाजारामध्ये आल्या; परंतु आजच्या बाजाराच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नक्कीच कमी आहेत. आजच्या दिवसापर्यंत बाजारामध्ये ५०० ची नवीन नोट आलेली नाही. मात्र, दोन हजारांची नोट बाजारामध्ये येऊन गोरगरिबांच्या हातीही लागली. ही दोन हजारांची नोट नवीन चलनातील असली तरी आज खरेदीसाठी ही नोट बाजारामध्ये गेल्यानंतर दुकानदारांकडे या नोटीसाठी नागरिकांना परत देण्यासाठी १०० च्या नोटा तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. कारण सरकारने १०० च्या नोटावाटपाचीही मर्यादा ठेवली आहे. तर बँकेत पैसे भरल्यानंतरदेखील आठवड्याला २० हजारांची मर्यादा ठेवली आहे. यामुळे आजतरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर सुटा पैसा उपलब्ध नाही.बंदीनंतर तीन दिवस बाजारामध्ये ५०० आणि हजारांच्या नोटा सुरू होत्या. मात्र, शनिवारपासून या नोटा बाजारात कमी झाल्या असून सर्वसामान्य नागरिक, तसेच धंदेवाईकांनी पेट्रोलपंप, मेडिकल, डॉक्टर या सर्वांनी आता जुन्या नोटा घेण्यास बंद केल्या आणि सध्या बाजारामध्ये सुटे पैसेही कमी असल्याने सामान्य नागरिक चक्रावून गेला आहे. दोन हजारांचे सुटे पैसे दुकानदारांकडे नसल्याने पैसा असून ही नागरिकांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)