शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दोन हजारांच्या नोटा ठरताहेत त्रासदायक

By admin | Updated: November 14, 2016 04:29 IST

मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करत दोन हजारांची आणि नवीन ५०० रुपयांची नोट बाजारामध्ये आणली.

दासगाव : मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करत दोन हजारांची आणि नवीन ५०० रुपयांची नोट बाजारामध्ये आणली. गुरुवारपासून प्रत्येक बँक तसेच पोस्टामार्फत नागरिकांना चार हजार रुपयांप्रमाणे १०० रुपयांच्या नोटा देण्यास सुरुवात केली. तसेच नवीन आलेली दोन हजारांची नोट बाजारामध्ये पोहोचून गोरगरीब जनतेच्या हाती लागली; परंतु आजही बाजारामध्ये सुट्या पैशांची कमतरता आहे. नवीन आलेल्या ५०० रुपयांच्या नोटा अद्याप बाजारात आलेल्या नाहीत. यामुळे दोन हजारांची नवीन नोट जरी आली असली तरी एवढ्या मोठ्या नोटीला सुटे पैसे येणार कोठून हा प्रश्न समस्या बनल्याने सध्यातरी दोन हजारंची नोट त्रासदायक बनली आहे. एक हजारांची नोट बंद करून त्या ठिकाणी दोन हजारांची नोट आणण्यात आली. शुक्रवारपर्यंत एक हजार आणि ५०० च्या नोटा बाजारामध्ये सुरू होत्या. मात्र, शासनाच्या निर्णयाप्रमाणे शनिवारपासून या नोटा चालणार नसून ज्यांच्याकडे आहेत त्यांनी बँकेत आपल्या खात्यांमध्ये भरायच्या आहेत. नोटांच्या बंदीनंतर एक दिवस सर्व बँका बंद ठेवून दुसऱ्या दिवशी उघडत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या बँकामध्ये प्रति नागरिक चार हजार रुपये १०० रु.च्या स्वरूपात वाटप सुरू झाले. कोट्यवधी रुपयांच्या १०० च्या नोटा बाजारामध्ये आल्या; परंतु आजच्या बाजाराच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नक्कीच कमी आहेत. आजच्या दिवसापर्यंत बाजारामध्ये ५०० ची नवीन नोट आलेली नाही. मात्र, दोन हजारांची नोट बाजारामध्ये येऊन गोरगरिबांच्या हातीही लागली. ही दोन हजारांची नोट नवीन चलनातील असली तरी आज खरेदीसाठी ही नोट बाजारामध्ये गेल्यानंतर दुकानदारांकडे या नोटीसाठी नागरिकांना परत देण्यासाठी १०० च्या नोटा तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. कारण सरकारने १०० च्या नोटावाटपाचीही मर्यादा ठेवली आहे. तर बँकेत पैसे भरल्यानंतरदेखील आठवड्याला २० हजारांची मर्यादा ठेवली आहे. यामुळे आजतरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर सुटा पैसा उपलब्ध नाही.बंदीनंतर तीन दिवस बाजारामध्ये ५०० आणि हजारांच्या नोटा सुरू होत्या. मात्र, शनिवारपासून या नोटा बाजारात कमी झाल्या असून सर्वसामान्य नागरिक, तसेच धंदेवाईकांनी पेट्रोलपंप, मेडिकल, डॉक्टर या सर्वांनी आता जुन्या नोटा घेण्यास बंद केल्या आणि सध्या बाजारामध्ये सुटे पैसेही कमी असल्याने सामान्य नागरिक चक्रावून गेला आहे. दोन हजारांचे सुटे पैसे दुकानदारांकडे नसल्याने पैसा असून ही नागरिकांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)