शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

वारे गावात पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:11 IST

मार्च महिन्यातच कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाडे-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. वारे ग्रामपंचायतीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.

- कांता हाबळेनेरळ : मार्च महिन्यातच कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाडे-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. वारे ग्रामपंचायतीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे.कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम डोंगराळ भागात नवसुचीवाडी, हऱ्याचीवाडी, जांभूळवाडी या आदिवासी वाड्या आहेत. या वस्त्यांवर सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, महिलांना डोंगराळ रस्ता पार करून पाणी आणावे लागत आहे. या वाड्या-वस्त्यांवर मागील काही वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्चून पाणी योजना राबविल्याही आहेत; परंतु नियोजनांचा अभाव व ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामांमुळे त्या योजना नादुरु स्त झाल्या आहेत. परिणामी, या भागातील लोकांना नळपाणी योजनांचा लाभ आजतागायत घेता आला नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.ग्रामस्थांना डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या विहिरी, नाल्यातून पाणी आणावे लागते. काही ठिकाणी नदीपात्रात खड्डे खोदून गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यासाठी रोजच दोन-तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. या भागातील आदिवासी बांधव मोलमजुरी, भाजीपाला लागवड व अन्य कष्टाची कामे करून उपजीविका करतात. महिलांचा बहुतांश वेळ पाणी भरण्यात जात असल्याने रोजगारावरही परिणाम होत आहे, त्यामुळे टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.पाणीटंचाईमुळे पहाटे उठून पाणी भरावे लागत आहे. त्यासाठी वाडीपासून दूर पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. त्यात रस्ता खराब व चढाचा असल्याने दमछाक होत आहे. मोलमजुरीही करता येत नाही.- भागीबाई पारधी,ग्रामस्थ, जांभूळवाडीआमच्या वाडीतील पाणी योजना बंद आहे. फक्त शोसाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत; परंतु आजपर्यंत नळांना पाणी काही आले नाही. यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.- नरेंद्र दुदा,ग्रामस्थ, जांभूळवाडीवारे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाड्या-वस्तीवरील पाणीटंचाईचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ग्रामपंचायतीकडून केली जाईल.- योगेश राणे, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत वारे

टॅग्स :Waterपाणी