शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दोनशे इमारती धोकादायक माणगावच्या पाच गावातील दहा बांधकामे अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 23:53 IST

नगरपंचायतीच्या मालकांना नोटिसा

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील पाच मुख्य गावांतील सुमारे २०० इमारती व घरे धोकादायक झाली आहेत. त्यातील १० इमारती अतिधोकादायक असल्याने, त्या मालकांना व भाडेकरूंना इमारती खाली करण्यासाठी लेखी नोटिसा नगरपंचायतीने बजावल्या आहेत.

नगरपंचायतीच्या कार्यालयात नगररचनाकार हे पद गेल्या ५ वर्षांपासून रिक्त असल्याने, या २०० जणांना स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. महाड येथे २४ आॅगस्ट रोजी झालेल्या इमारत दुर्घटनेच्या अनुषंगाने माणगांव नगरपंचायतीमार्फत शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये जीर्ण व मोडकळीस आलेल्या २०० इमारती व घरे आढळून आली.

नगरपंचायत अधिनियम १९६५च्या कलमानुसार, ८ दिवसांच्या आत स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून प्रमाणपत्र सादर करण्यात यावे, अन्यथा या इमारती मानवी वस्तीसाठी अयोग्य आहेत, असे मानून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर, या इमारतींमधील व घरे यातील वास्तव्य व वापर त्वरित बंद करण्यात यावा, तसेच कोणत्याही कारणासाठी इमारत वापरण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे, संभाव्य अपघातापासून होणारी हानी टाळण्यासाठी इमारतीभोवती सुरक्षित जाळी आणि पत्र्याचे कुंपण घालण्यात यावे, असे नगरपंचायतीने धोकादायक इमारतीच्या मालकांना कळविले आहे.

विशेष म्हणजे, माणगांव नगरपंचायतीची इमारतच अति धोकादायक बनलेली आहे. या इमारतीला ५० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या इमारतीचा मागील भाग व स्लॅब ठिकठिकाणी कोसळला आहे. त्यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. नगरपंचायतीने नगररचनाकारांकडे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास दिले आहे. मात्र, त्याचा अहवाल अद्यापही आलेला नाही. ही इमारत ५ वर्षांपासून धोकादायक बनली असल्याने, येथे नवीन इमारत होणे सर्वांच्या दृष्टीने गरजेचे आहे, परंतु सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे ही नवीन इमारत होऊ शकलेली नाही.

खास बाब म्हणजे माणगांव नगरपंचायत अस्तित्वात येऊन ५ वर्षे झाली, तरी नगररचनाकार अभियंता हे पद रिक्त आहे. त्यामुळे खासगी अभियंत्याकडून इमारत मालकांसोबत नगरपंचायतीलाही आॅडिट करून घ्यावे लागत आहे.या इमारतींमध्ये अजूनही लोक राहत आहेत. त्यांच्या जिवाला धोका संभवत आहे. त्यांच्यावर कारवाई न केल्यास, माणगांव शहरातही महाडसारखी दुर्घटना होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

माणगांव शहरात कचेरी मार्गावरील गणेश कॉम्प्लेक्स, मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, बाजारपेठेतील दत्त मंदिरसमोरील रोहेकर बिल्डिंग, समृद्धी हॉटेलजवळील वांगरे बिल्डिंग, विद्यानगर येथील मापकर चाळ, निजामपूर मार्गावरील जगदाळे बिल्डिंग, मोर्बा रोड येथील धनसे, सहारा, सकिना बिल्डिंग या इमारती अतिधोकादायक झाल्या असून, या इमारतीचे मालक व भाडेकरू यांना तातडीने इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Raigadरायगड