शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आगरदांडा बंदरात तटरक्षक दलातर्फे दोन महाकाय बोटी दाखल, अतिजलद पेट्रोलिंग होणार शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:36 IST

रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत.

आगरदांडा : रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत. ५० मीटर बाय ७ मीटर लांबीच्या या अत्याधुनिक जहाजांमुळे अतिजलद पेट्रोलिंग शक्य होणार असून रायगडच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ वा तुफानी वाऱ्यापासून खोल समुद्रात मच्छीमारांना उद्भवणाऱ्या संकटाचा मुकाबला करणे व मदतीचा हात देणे शक्य होणार आहे.मुंबई येथे १९९३ साली बॉम्बस्फोट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सागरी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले. तद्नंतर तटरक्षक दलाची ठिकठिकाणी टेहळणी केंद्र निर्माण होऊन अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सागरी सुरक्षा दल सोबत भारतीय तटरक्षक दलाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आगरदांडा येथे भारतीय तटरक्षक दलाचे टेहळणी केंद्र तयार करण्यात आले आहे. सुरुवातीला टेहळणी करण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्यांचे साह्य घेऊन टेहळणी करण्यात येत होती. परंतु आता स्वतंत्र मोठ्या बोटी आल्याने आगरदांडा टेहळणी केंद्राला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अतिरेकी कारवायांवर नजर ठेवता ठेवता स्थानिक मच्छीमार हे समुद्रात संकटात सापडल्यावर या महाकाय बोटींचे मोठे सहाय्य्य प्राप्त होणार आहे.अमली पदार्थांची तस्करी रोखणे, अतिरेक्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे तसेच समुद्रात उदभवणाऱ्या अस्मानी, सुलतानी संकटाप्रसंगी बचाव कार्यात नेहमीच तटरक्षक दल कार्यरत असते. दोन बोटींमुळे पेट्रोलिंग खूप लांबवर होऊन खोल समुद्रात होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर पायबंद ठेवता येणार आहे. 

टॅग्स :Raigadरायगड