शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अलिबाग समुद्र पाहून 'त्या' वीस जणी झाल्या अचंबित; बेकरी व्यवसायातून जम्मू काश्मीर खोऱ्यातील महिला सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 14:14 IST

महाराष्ट्रातील बेकरी पदार्थाची माहिती मिळावी आणि त्यातून आपल्या बेकरी व्यवसायात नवे पदार्थ निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील असीम फाऊंडेशन जम्मू काश्मीर मधील २० जणींना पुणे, अलिबाग दोऱ्यावर आणले होते.

अलिबाग : हाताला काम नाही, घरातील कुटुंबाच्या खण्या पिण्याची व्यवस्था करण्यात दिवस मावळला जात होता. अशी परिस्थिती जम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा, पुंज, लाम, बग्गा, कुपवारा या गावातील महिलांची होती. पुणे येथील असीम फाऊंडेशनने भारतीय सैन्याच्या साथीने जम्मू काश्मीर खोऱ्यामधील या गावातील महिलांच्या हाताला बेकरी उत्पादन निर्मितीचा रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे आज शेकडो महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. पहिल्यांदाच २० जणींचा समूह अलिबाग येथे असीम फाऊंडेशनच्या मदतीने आला होता. समुद्राच्या पहिल्यांदाच घेतलेल्या दर्शनाने या महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. रायगडातील वातावरण, समुद्र, निसर्गआणि भोजन आवडल्याचे या महिलांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील बेकरी पदार्थाची माहिती मिळावी आणि त्यातून आपल्या बेकरी व्यवसायात नवे पदार्थ निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील असीम फाऊंडेशन जम्मू काश्मीर मधील २० जणींना पुणे, अलिबाग दोऱ्यावर आणले होते. जम्मू काश्मीर हा बर्फाळ प्रदेश असल्याने या महिलाना समुद्राचे मोठे आकर्षण होते. अलिबागचा समुद्र पाहून सर्वच महिलाना आनंद झाला होता. अलिबाग विश्रामगृह येथे माहिती देण्याबाबत असीम फाऊंडेशन तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जम्मू काश्मीर मधील महिलांशी संवाद साधण्यात आला. असीम फाऊंडेशन चे प्रशांत घारे, हेमांगी भाटे यांनी त्याच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर या महिलांनी अलिबाग मधील प्रसिद्ध मयूर बेकरीला भेट दिली.

असीम फाऊंडेशन तर्फे सिमाभागातील महिलाना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काम करीत आहेत. जम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा, पुंज, लाम, बग्गा, कुपवारा या भागातील महिलाना असीम फाऊंडेशनने बेकरी उत्पादन रोजगार सुरू करून दिला आहे. त्यामुळे पूर्वी हाताला काम नसल्याने त्याचा वेळ फुकट जात होता. मात्र आता आमच्या हाताला काम मिळाल्याने कमाई पण होत आहे आणि समाधान ही मिळत असल्याचे पुंज मधील रिंपी देवी हिने सांगितले. जम्मू काश्मीरमधील महिलाना बेकरी काढून देण्यात आली असून सफरचंद, अक्रोडपासून विविध पदार्थ बनविले जातात. या महिलांच्या बेकरी पदार्थांना पुणेसह राज्यात मोठी मागणी असल्याने असीम फाऊंडेशनतर्फे ते विकले जात आहेत. भारतीय सैनिकांनाही या बेकरी मधून पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळे या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. 

आठ विरनारी महिला बेकरीतून सक्षमजम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा या गावातील प्रकाशशो देवी, विणा देवी या महिलेसह सहा महिलांचे पती भारतीय सैन्य दलात देशाचे रक्षण करीत होते. आठ ही महिलांच्या पतीना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुढील आयुष्य कसे जगावे हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. अशातच असीम फाऊंडेशनच्या मदतीने आठ महिलाना एकत्रित करून वीरनारी बेकरी सुरू केली आहे. बेकरी व्यवसायातून आठही विरनारी आपल्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. सर्व महिला ह्या साठ वर्ष वयावरील आहेत.

पहिल्यांदाच घेतले समुद्राचे दर्शनजम्मू काश्मीर हे पृथ्वी वरील स्वर्ग मानले जाते. प्रत्येक जण एकदा काश्मीरमध्ये जाण्यास उत्सुक असतो. जम्मू काश्मीर मधील महिलाना समुद्राचे मोठे आकर्षण आहे. अलिबाग समुद्र पाहून वीस ही महिला आनंदित झाल्या होत्या. महाराष्ट्रीय जेवण ही खूप स्वादिष्ट असल्याचे महिलांनी सांगितले. समुद्राचे पहिल्यांदाच दर्शन घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

टॅग्स :alibaugअलिबाग