शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अलिबाग समुद्र पाहून 'त्या' वीस जणी झाल्या अचंबित; बेकरी व्यवसायातून जम्मू काश्मीर खोऱ्यातील महिला सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 14:14 IST

महाराष्ट्रातील बेकरी पदार्थाची माहिती मिळावी आणि त्यातून आपल्या बेकरी व्यवसायात नवे पदार्थ निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील असीम फाऊंडेशन जम्मू काश्मीर मधील २० जणींना पुणे, अलिबाग दोऱ्यावर आणले होते.

अलिबाग : हाताला काम नाही, घरातील कुटुंबाच्या खण्या पिण्याची व्यवस्था करण्यात दिवस मावळला जात होता. अशी परिस्थिती जम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा, पुंज, लाम, बग्गा, कुपवारा या गावातील महिलांची होती. पुणे येथील असीम फाऊंडेशनने भारतीय सैन्याच्या साथीने जम्मू काश्मीर खोऱ्यामधील या गावातील महिलांच्या हाताला बेकरी उत्पादन निर्मितीचा रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे आज शेकडो महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. पहिल्यांदाच २० जणींचा समूह अलिबाग येथे असीम फाऊंडेशनच्या मदतीने आला होता. समुद्राच्या पहिल्यांदाच घेतलेल्या दर्शनाने या महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. रायगडातील वातावरण, समुद्र, निसर्गआणि भोजन आवडल्याचे या महिलांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील बेकरी पदार्थाची माहिती मिळावी आणि त्यातून आपल्या बेकरी व्यवसायात नवे पदार्थ निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुण्यातील असीम फाऊंडेशन जम्मू काश्मीर मधील २० जणींना पुणे, अलिबाग दोऱ्यावर आणले होते. जम्मू काश्मीर हा बर्फाळ प्रदेश असल्याने या महिलाना समुद्राचे मोठे आकर्षण होते. अलिबागचा समुद्र पाहून सर्वच महिलाना आनंद झाला होता. अलिबाग विश्रामगृह येथे माहिती देण्याबाबत असीम फाऊंडेशन तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जम्मू काश्मीर मधील महिलांशी संवाद साधण्यात आला. असीम फाऊंडेशन चे प्रशांत घारे, हेमांगी भाटे यांनी त्याच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर या महिलांनी अलिबाग मधील प्रसिद्ध मयूर बेकरीला भेट दिली.

असीम फाऊंडेशन तर्फे सिमाभागातील महिलाना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काम करीत आहेत. जम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा, पुंज, लाम, बग्गा, कुपवारा या भागातील महिलाना असीम फाऊंडेशनने बेकरी उत्पादन रोजगार सुरू करून दिला आहे. त्यामुळे पूर्वी हाताला काम नसल्याने त्याचा वेळ फुकट जात होता. मात्र आता आमच्या हाताला काम मिळाल्याने कमाई पण होत आहे आणि समाधान ही मिळत असल्याचे पुंज मधील रिंपी देवी हिने सांगितले. जम्मू काश्मीरमधील महिलाना बेकरी काढून देण्यात आली असून सफरचंद, अक्रोडपासून विविध पदार्थ बनविले जातात. या महिलांच्या बेकरी पदार्थांना पुणेसह राज्यात मोठी मागणी असल्याने असीम फाऊंडेशनतर्फे ते विकले जात आहेत. भारतीय सैनिकांनाही या बेकरी मधून पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळे या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. 

आठ विरनारी महिला बेकरीतून सक्षमजम्मू काश्मीर खोऱ्यातील सांबा नौशेरा या गावातील प्रकाशशो देवी, विणा देवी या महिलेसह सहा महिलांचे पती भारतीय सैन्य दलात देशाचे रक्षण करीत होते. आठ ही महिलांच्या पतीना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुढील आयुष्य कसे जगावे हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. अशातच असीम फाऊंडेशनच्या मदतीने आठ महिलाना एकत्रित करून वीरनारी बेकरी सुरू केली आहे. बेकरी व्यवसायातून आठही विरनारी आपल्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. सर्व महिला ह्या साठ वर्ष वयावरील आहेत.

पहिल्यांदाच घेतले समुद्राचे दर्शनजम्मू काश्मीर हे पृथ्वी वरील स्वर्ग मानले जाते. प्रत्येक जण एकदा काश्मीरमध्ये जाण्यास उत्सुक असतो. जम्मू काश्मीर मधील महिलाना समुद्राचे मोठे आकर्षण आहे. अलिबाग समुद्र पाहून वीस ही महिला आनंदित झाल्या होत्या. महाराष्ट्रीय जेवण ही खूप स्वादिष्ट असल्याचे महिलांनी सांगितले. समुद्राचे पहिल्यांदाच दर्शन घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

टॅग्स :alibaugअलिबाग