शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

'त्या' ट्रेकर्सना पाच लाखांचा विमा, सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श वस्तुपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 03:05 IST

गेल्या २८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून विद्यापीठाच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू, या भीषण घटनेनंतर प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

- जयंत धुळपअलिबाग - गेल्या २८ जुलै रोजी पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून विद्यापीठाच्या तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू, या भीषण घटनेनंतर प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्या वेळी विविध संस्था संघटनांचे ट्रेकर्स रोप, कॅराबीनर्स, हारनेस आदी गिर्यारोहणातील आपली सर्व साधनसामुग्री घेऊन सत्वर घटनासस्थळी पोहोचले आणि दोरांच्या साहाय्याने ६०० फूट खोल निसरड्या दरीत उतरून बसमधील मृतदेह दरीतून वर काढण्यास सुरुवात केली. या आंबेनळी घाट बस दुर्घटनेच्या वेळी जवळच्याच महाड शहरातील सह्याद्री मित्र संस्थेच्या १६ आणि सिस्केप संस्थेच्या २१ अशा एकूण ३७ तरुण ट्रेकर्सनी जीवाची बाजी लावून केलेल्या या अनन्यसाधारण धाडसी ‘रेस्क्यू’ आॅपरेशन द्वारे आपली सामाजिक बांधीलकी सर्वांनाच दाखवून दिली. महाडमधील दि अण्णासाहेब सावंत को. आॅप अर्बन बँक महाड या अर्बन सहकारी बँकेने ३७ ट्रेकर्सचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून उतरवून सामाजिक बांधीलकीच्या उत्तरदायित्वाचा अनोखा वस्तुपाठ राज्यातील सहकारी बँकांसमोर ठेवला.सर्वसाधारण सभेत निर्णय१शुक्रवारी झालेल्या बँकेच्या ८७ व्या सर्वसाधारण सभेत आम्ही हा निर्णय घेतला आहे. सह्याद्री मित्रचे १६ आणि सिस्केपचे २१ अशा ३७ सदस्यांचा प्रत्येकी पाच लाखांचा हा विमा बँकेने उतरवला असून, त्याचा ६१४ रुपये प्रीमियम बँकेच्या वतीने भरण्यात येणार असल्याचे बँकेच्या अध्यक्षा शोभाताई सावंत यांनी ‘सांगितले. आंबेनळी घाटात झालेल्या अपघातानंतर त्या ठिकाणी सह्याद्री मित्र आणि सिस्केप सदस्यांनी केलेले अवघड काम तेही आपला जीव धोक्यात टाकून, त्याची दखल आम्ही घेत या सर्वांचा विमा उतरविण्याचा निर्णय केवळ सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून घेतला असल्याचे सांगितले.५० ट्रेकर्सची टीम प्रत्येक जिल्ह्यात होऊ शकेल२दि अण्णासाहेब सावंत को. आॅप अर्बन बँक महाड या बँकेने आंबेनळी घाट दुर्घटनेच्या वेळी जीवाची बाजी लावून ट्रेकर्सनी केलेले आपत्ती निवारणाचे काम हे अनन्यसाधारण असेच आहे. त्याचबरोबर महाड मधील या ३७ ट्रेकर्सना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरवून त्यांना विमा संरक्षण मिळवून देण्याच्या सामाजिक बांधीलकीतून केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महाड अर्बन बँकेच्या या उपक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, अर्बन बँका वा मोठ्या पतसंस्था यांनी हा उपक्रम अमलात आणला, तर आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारणाच्या कार्यात सहयोग देणारी शास्त्रशुद्ध प्रशिक्षित अशी ५० ट्रेकर्सची टीम प्रत्येक जिल्ह्यात तयार होऊ शकेल, असा विश्वास डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.आपत्कालीन परिस्थितीत धावूनयेणारा ‘यूथ फोर्स’ निर्माण होऊ शकतोमहाड अर्बन बँकेने समाजोपयोगी काम करणाºया धाडसी ट्रेकर्सचा विमा उतरवण्याच्या सामाजिक बांधीलकीतून केलेला उपक्रम राज्यातील पहिलाच उपक्रम असून, युवकांमधील गिर्यारोहण आणि ट्रेकिंगचे कौशल्य सामाजिक समस्या आणि आपत्ती निवारणाकरिता उपयोगात आणण्याच्या मानसिकतेते युवा वर्गात यामुळे निश्चित वाढ होऊन, त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास गिर्यारोहण व निसर्ग भ्रमण उपक्रम आयोजनातील अग्रगण्य संस्था असलेल्या यूथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा नामांकित गिर्यारोहक रमेश किणी यांनी व्यक्त केला आहे.आपत्कालीन परिस्थितीत यापूर्वीही गिर्यारोहणातील कौशल्यांचा वापर करून मानवीहानी कमी करून मालमत्तांचे संरक्षण करण्यात तरुणाई अनेकदा यशस्वी झाली आहे. शासनस्तरावर गिर्यारोहण या साहसी खेळास राजमान्यता प्राप्त होऊन, या साहसी खेळास प्राधान्य दिले तर आपत्कालीन परिस्थितीत धावून येणारी ‘यूथ फोर्स’ यातून निर्माण करता येऊ शकेल. शासकीयस्तरावर पोलीस दलातील नव्याने भरती झालेल्या पोलिसांना गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस दलात आपत्ती निवारणाकरिता एक तरुण पोलिसांची तुकडी तयार करण्याचा यूथ हॉस्टेल असोसिएशनचा मनोदय असून, त्याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याचे किणी यांनी अखेरीस सांगितले.वैद्यकीय प्रशिक्षण देण्याचा मानस३सामाजिक समस्या विशेषत: आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खादा लावून काम करण्यासाठी समाजातील अनेक घटक नेहमीच स्वेच्छेने पुढे येत असतात. अशात महाडमधील या ३७ ट्रेकर्सना विमा संरक्षण देऊन महाड अर्बन बँकेने आपली सामाजिक बांधीलकी वेगळ्या प्रकारे निभावली आहे. जिल्ह्यातील ट्रेकर्स आणि युवकांमधून जिल्ह्याकरिता आपत्ती निवारणाकरिता एक नवी फौज या माध्यमातून निर्माण होऊ शकते. अशा ट्रेकर्सना आपत्ती काळात प्रथमोपचार आणि तातडीचे वैद्यकीय उपचार या बाबत आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही सामाजिक बांधीलकी म्हणून निश्चित करू, असा मानस रायगड मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या