शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

खालापुरात आदिवासींचा तहसीलवर मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 23:08 IST

वावोशी : खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गरीब कष्टकरी आदिवासी समाज वास्तव्य करीत असून, पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम ...

वावोशी : खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गरीब कष्टकरी आदिवासी समाज वास्तव्य करीत असून, पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मात्र, शासनाकडून विविध योजना व रेशनिंगवरील मिळणाऱ्या धान्यात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे जागृत कष्टकरी संघटनेच्या लक्षात आले. याबाबत खालापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून जवळपास ५०० हून अधिक आदिवासी बांधवांनी आपला रोष व्यक्त केला. या वेळीतहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देऊन तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनात आपल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना यापूर्वी दिलेले धान्य कमी होते ते धान्य द्यावे, अशी मागणी या वेळी जोरदार घोषणाबाजी करीत केली.

भारत देशाला ७० वर्षे स्वातंत्र्य मिळून पूर्ण झाली आहेत. तरीही आदिवासी बांधवाची फरफट थांबली नाही. सरकारी उद्योगधंदे कारखाने, बँका तोट्यात झाल्याचे सांगून कामगारांना देशोधडीला लावले आहे, त्यामुळे आदिवासी बांधवांना वाड्या-वस्त्या सोडून वेठबिगारी म्हणून वणवण भटकून रोजगार मिळवावा लागत आहे. शासनाने रोजगार हमी योजना या माध्यमातून किमान १०० दिवस मिळणाºया हक्काच्या रोजगारावर गदा आणून बासनात बांधून ठेवले आहे. रेशनवर मिळणारे धान्य कमी करीत सरकार थेट रक्कम खात्यावर जमा करण्याची भूमिका चुकीचे असून या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आदिवासी कातकरी, वयोवृद्ध, अपंग, निराधार, विधवा, एकल महिला, दुर्धर आजारी, गरोदर व स्तनदा माता आदी जमातींना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करण्याचे आदेश महाराष्ट्र रायगड, नाशिक, नंदुरबार व अमरावती जिल्ह्यांना दिले असताना खालापुरात मात्र माणसी पाच किलो धान्य देऊन बेकायदेशीर निर्णय घेऊन तोंडातील घास काढून घेण्याच्या निर्णयाचा आदिवासी बांधवांनी निषेध के ला.

या वेळी संघटनेच्या कार्यध्यक्षा नॅन्सी गायकवाड, अध्यक्ष केशव वाघमारे, सचिव अनिल सोनावणे, लक्ष्मण पवार मंगल पवार, राम जाधव, हरिचंद्र जाधव, शांताबाई वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, लहू होल्ला, अनंता चौधरी आदी उपस्थित होते.प्रमुख मागण्या

तालुक्यात पुरवठा शाखेमार्फ त आदिवासी कुटुंबातील एक किंवा दोन असलेल्या व्यक्तींना पाच किलो धान्य सुरू केले आहे, ते त्वरित बंद करा व त्यांचे उर्वरित धान्य त्वरित द्या, रेशनिंगवरील रॉकेल पुन्हा चालू करा, कुटुंबाचे रेशनवरील खात्यावर जमा करणारी रक्कम रद्द करा, अंत्योदय लाभार्थी कुटुंबात कितीही माणसे असली, तरी ३५ किलो धान्य मिळालेच पाहिजे, नावडेवाडीत स्मशानभूमीसाठी जागा द्या, तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू करा, यासह अन्य मागण्या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढून केल्या.

टॅग्स :Raigadरायगड