शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खालापुरात आदिवासींचा तहसीलवर मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 23:08 IST

वावोशी : खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गरीब कष्टकरी आदिवासी समाज वास्तव्य करीत असून, पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम ...

वावोशी : खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गरीब कष्टकरी आदिवासी समाज वास्तव्य करीत असून, पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मात्र, शासनाकडून विविध योजना व रेशनिंगवरील मिळणाऱ्या धान्यात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे जागृत कष्टकरी संघटनेच्या लक्षात आले. याबाबत खालापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून जवळपास ५०० हून अधिक आदिवासी बांधवांनी आपला रोष व्यक्त केला. या वेळीतहसीलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देऊन तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनात आपल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना यापूर्वी दिलेले धान्य कमी होते ते धान्य द्यावे, अशी मागणी या वेळी जोरदार घोषणाबाजी करीत केली.

भारत देशाला ७० वर्षे स्वातंत्र्य मिळून पूर्ण झाली आहेत. तरीही आदिवासी बांधवाची फरफट थांबली नाही. सरकारी उद्योगधंदे कारखाने, बँका तोट्यात झाल्याचे सांगून कामगारांना देशोधडीला लावले आहे, त्यामुळे आदिवासी बांधवांना वाड्या-वस्त्या सोडून वेठबिगारी म्हणून वणवण भटकून रोजगार मिळवावा लागत आहे. शासनाने रोजगार हमी योजना या माध्यमातून किमान १०० दिवस मिळणाºया हक्काच्या रोजगारावर गदा आणून बासनात बांधून ठेवले आहे. रेशनवर मिळणारे धान्य कमी करीत सरकार थेट रक्कम खात्यावर जमा करण्याची भूमिका चुकीचे असून या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आदिवासी कातकरी, वयोवृद्ध, अपंग, निराधार, विधवा, एकल महिला, दुर्धर आजारी, गरोदर व स्तनदा माता आदी जमातींना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करण्याचे आदेश महाराष्ट्र रायगड, नाशिक, नंदुरबार व अमरावती जिल्ह्यांना दिले असताना खालापुरात मात्र माणसी पाच किलो धान्य देऊन बेकायदेशीर निर्णय घेऊन तोंडातील घास काढून घेण्याच्या निर्णयाचा आदिवासी बांधवांनी निषेध के ला.

या वेळी संघटनेच्या कार्यध्यक्षा नॅन्सी गायकवाड, अध्यक्ष केशव वाघमारे, सचिव अनिल सोनावणे, लक्ष्मण पवार मंगल पवार, राम जाधव, हरिचंद्र जाधव, शांताबाई वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, लहू होल्ला, अनंता चौधरी आदी उपस्थित होते.प्रमुख मागण्या

तालुक्यात पुरवठा शाखेमार्फ त आदिवासी कुटुंबातील एक किंवा दोन असलेल्या व्यक्तींना पाच किलो धान्य सुरू केले आहे, ते त्वरित बंद करा व त्यांचे उर्वरित धान्य त्वरित द्या, रेशनिंगवरील रॉकेल पुन्हा चालू करा, कुटुंबाचे रेशनवरील खात्यावर जमा करणारी रक्कम रद्द करा, अंत्योदय लाभार्थी कुटुंबात कितीही माणसे असली, तरी ३५ किलो धान्य मिळालेच पाहिजे, नावडेवाडीत स्मशानभूमीसाठी जागा द्या, तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू करा, यासह अन्य मागण्या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढून केल्या.

टॅग्स :Raigadरायगड