शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

रस्ता नसल्याने आदिवासी बांधव त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 2:17 AM

आदिवासीवाडीसाठी वनविभाग आडकाठी करत असल्यामुळे अनेक वर्षे रस्ता नसून, ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली.

वावोशी : आदिवासीवाडीसाठी वनविभाग आडकाठी करत असल्यामुळे अनेक वर्षे रस्ता नसून, ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येत असल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली. त्यावर वनविभागाच्या अधिकाºयांनी अशा गोष्टीसाठी डोळे बंद करा व रस्ता होऊ द्या, अशा सूचना आमदार मनोहर भोईर यांनी दिल्या. खालापूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी दुपारी १२ वाजता आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नऊ गावांतील येऊ घातलेल्या ‘नैना’ प्रकल्पाचीही चर्चा करण्यात आली. लवकरच सिडको प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन या वेळी आमदार भोईर यांनी दिले. पाणीप्रश्नावरही आमसभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.अ‍ॅडलॅब इमॅजिका वॉटरपार्कला कलोते धरणातून पाणीपुरवठा करण्यात येऊ नये, अशी भूमिका घोडवलीचे सरपंच शिवाजी पिंगळे यांनी मांडली. या वेळी अ‍ॅडलॅबची बाजू मांडणाºया राष्ट्रवादी पदाधिकाºयाला पिंगळे यांनी त्यांची वकील करू नका, असा सल्ला देत गप्प बसविले. पाताळगंगा नदीत अल्प पाणीसाठा शिल्लक राहत असताना खासगी प्रकल्पाकडून उपसा करण्यात येत असल्यामुळे भविष्यात खालापूरला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल त्यामुळे बेकायदा उपसा थांबवा, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ यांनी केली. वाणविली विहीरचोरी प्रकरणी अद्याप काहीच कारवाई झाली नसल्यामुळे तक्रारकर्ते मनोज थोरवे यांनी संताप व्यक्त करत दोषीवर कारवाईला प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप केला. सावरोली येथील बंद कोपरा कामगारांच्या निधनामुळे संसार उघड्यावर पडलेल्या महिलांनीदेखील आमसभेत कारखान्याकडून काहीच देणी न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याची व्यथा मांडली. आमदार मनोहर भोईर व आमदार सुरेश लाड यांनी याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यावेळी आमदार मनोहर भोईर, कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे आदी उपस्थित होते.