शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या मदतीने ट्रेकर्सचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:02 IST

स्वातंत्र्य दिनी कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे निसर्ग भ्रमंतीस गेलेले पण सूर्यास्तानंतर कोंढाणे जंगलात मुंबईतील बोरीवली येथील चार ट्रेकर्स वाट चुकले.

जयंत धुळप ।अलिबाग : स्वातंत्र्य दिनी कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे निसर्ग भ्रमंतीस गेलेले पण सूर्यास्तानंतर कोंढाणे जंगलात मुंबईतील बोरीवली येथील चार ट्रेकर्स वाट चुकले. त्यांना रातोरात उंबरवाडीतील आदिवासी बांधवांनी चार तासांत शोधून काढून कर्जत पोलिसांना मोठे सहकार्य केले.मंगळवारी रात्री ९.४५ वाजता वाट चुकलेल्या स्वप्निल मगदूम (२४), मिश्वाल सॅलियन (२४), ज्योती पळसमकर (२०), ज्युली डिसोझा (२२) या चौघांपैकी स्वप्निल कदमने कर्जत पोलीस ठाण्यात फोन करून, मी व माझ्यासोबतचे एक मित्र व दोन मैत्रिणी कोंढाणे येथील जंगलात वाट चुकलो आहोत, अशी माहिती पोलिसांना दिली. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून, त्यांना आहात त्याच ठिकाणी एखाद्या सपाट जागेवर थांबून राहण्याचा सल्ला दिला. स्वप्निल यास आजूबाजूच्या खाणाखुणा विचारल्या. त्या वेळी त्यांनी, बाजूला उंचावरून पाणी पडत असल्याचे सांगितले. परिणामी, जवळ धबधबा असल्याचा अंदाज बांधून पोलीस निरीक्षक तानवडे यांनी त्वरित कोंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र महादेव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून काय उपाययोजना करता येईल, याबाबत चर्चा केली. कोंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र गायकवाड व आदिवासी बंधू एरू जाणू मेंगार, मधू हिरू पीटकर, वाळकू कमळू निरगुडा (सर्व रा. उंबरवाडी) यांच्या मदतीने जंगल भागात धबधबा शोधण्यास प्रारंभ केला. अत्यंत धाडसाने एक ते दीड तासाने धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने जंगल पादाक्रांत करून, या चौघांपर्यंत पोहोचण्यात या पथकास यश आले. त्यानंतर या चौघांना जंगलातून सुखरूप आणले गेले.>रात्रीच्या वेळी शोधकार्यास सुरुवातरात्रीची वेळ असल्याने या मुलांची सुटका करणे अवघड असतानाही पोलीस निरीक्षक तानवडे यांनी कोंढाणे गावातील स्थानिक आदिवासी बांधवांची मदत घेऊन कर्जत ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांना जंगलात रवाना केले.