शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आदिवासींच्या मदतीने ट्रेकर्सचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:02 IST

स्वातंत्र्य दिनी कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे निसर्ग भ्रमंतीस गेलेले पण सूर्यास्तानंतर कोंढाणे जंगलात मुंबईतील बोरीवली येथील चार ट्रेकर्स वाट चुकले.

जयंत धुळप ।अलिबाग : स्वातंत्र्य दिनी कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे निसर्ग भ्रमंतीस गेलेले पण सूर्यास्तानंतर कोंढाणे जंगलात मुंबईतील बोरीवली येथील चार ट्रेकर्स वाट चुकले. त्यांना रातोरात उंबरवाडीतील आदिवासी बांधवांनी चार तासांत शोधून काढून कर्जत पोलिसांना मोठे सहकार्य केले.मंगळवारी रात्री ९.४५ वाजता वाट चुकलेल्या स्वप्निल मगदूम (२४), मिश्वाल सॅलियन (२४), ज्योती पळसमकर (२०), ज्युली डिसोझा (२२) या चौघांपैकी स्वप्निल कदमने कर्जत पोलीस ठाण्यात फोन करून, मी व माझ्यासोबतचे एक मित्र व दोन मैत्रिणी कोंढाणे येथील जंगलात वाट चुकलो आहोत, अशी माहिती पोलिसांना दिली. कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून, त्यांना आहात त्याच ठिकाणी एखाद्या सपाट जागेवर थांबून राहण्याचा सल्ला दिला. स्वप्निल यास आजूबाजूच्या खाणाखुणा विचारल्या. त्या वेळी त्यांनी, बाजूला उंचावरून पाणी पडत असल्याचे सांगितले. परिणामी, जवळ धबधबा असल्याचा अंदाज बांधून पोलीस निरीक्षक तानवडे यांनी त्वरित कोंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र महादेव गायकवाड यांच्याशी संपर्क साधून काय उपाययोजना करता येईल, याबाबत चर्चा केली. कोंढाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र गायकवाड व आदिवासी बंधू एरू जाणू मेंगार, मधू हिरू पीटकर, वाळकू कमळू निरगुडा (सर्व रा. उंबरवाडी) यांच्या मदतीने जंगल भागात धबधबा शोधण्यास प्रारंभ केला. अत्यंत धाडसाने एक ते दीड तासाने धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने जंगल पादाक्रांत करून, या चौघांपर्यंत पोहोचण्यात या पथकास यश आले. त्यानंतर या चौघांना जंगलातून सुखरूप आणले गेले.>रात्रीच्या वेळी शोधकार्यास सुरुवातरात्रीची वेळ असल्याने या मुलांची सुटका करणे अवघड असतानाही पोलीस निरीक्षक तानवडे यांनी कोंढाणे गावातील स्थानिक आदिवासी बांधवांची मदत घेऊन कर्जत ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांना जंगलात रवाना केले.