शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:36 IST

यंदा मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात

कार्लेखिंड : कोकणात गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी येतात. यंदा मुंबई-गोवामहामार्गावरील कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात सुखरूप झाला आहे.मुंबई-गोवामहामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली आठ ते दहा वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास तापदायक ठरत होता. विशेषकडून पेण-वडखळ हा सात किलोमीटरचा प्रवास नेहमीच चर्चेत होता; परंतु यंदा गणेशोत्सवाकरिता मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि आता परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र तैनात होते, त्यामुळे हा प्रवास सुरळीत झाला.जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अप्पर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले. गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही चांगल्याप्रकारे नियोजन केल्यामुळे या प्रवासात वाहतूककोंडी व अपघातांचे प्रसंग घडले नाहीत.महामार्गावरील रस्ते दुरुस्तीला पावसाची उघड मिळाल्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा त्रास झाला नाही. ऊन आणि रस्त्यांवरील धूळ याची तमा न बाळगता, पोलीस यंत्रणा, पोलीस मित्र आपले कर्तव्य चोख बजावताना दिसले, यामुळेच गणेशोत्सवातील प्रवास सर्व कोकणवासीयांना सुखकर वाटला.

टॅग्स :Mumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गRaigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक