शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

समाजजीवन व्यापणारे ‘संक्रमण’

By admin | Updated: January 15, 2015 06:53 IST

मकर संक्रांत म्हणजे संक्रमण... मानवी जीवनात अनेक संक्रमणावस्था येत असतात. अनेक संकटांचा सामना करून सामान्य माणूस जीवन कंठत असतो. तसे प्रत्येकाचेच आयुष्य हे विविध संक्रमणांनी भरलेले असते

मकर संक्रांत म्हणजे संक्रमण... मानवी जीवनात अनेक संक्रमणावस्था येत असतात. अनेक संकटांचा सामना करून सामान्य माणूस जीवन कंठत असतो. तसे प्रत्येकाचेच आयुष्य हे विविध संक्रमणांनी भरलेले असते...पण सार्वजनिक आयुष्याचा विचार करता सगळ्या क्षेत्रांनाही संक्रमणावस्थेचा सामना करावाच लागतो. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले आणि मुंबईकरांशी निगडित असलेल्या अनेक विषयांतील तज्ज्ञांशी संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ‘टीम लोकमत’ने संवाद साधला... समाजजीवन व्यापणारी विविध क्षेत्रे कोणकोणत्या संक्रमणावस्थेतून जात आहेत... त्याचा आम्ही घेतलेला हा धांडोळा... सध्या जनहिताचे अनेक प्रश्न न्यायालयाच्या आदेशामुळे व निकालांमुळे मार्गी लागत चालले आहेत़ परिणामी समाजाच्या अपेक्षा न्यायालयाकडून वाढल्या आहेत़ कारण सर्व स्तरावर निराशा होत असल्याने न्यायदानाकडे सर्वांचे लक्ष लागणे स्वाभाविकच आहे़ अशात न्यायालयाने अनेक जनहिताचे निर्णय दिले आहेत़ लोकांच्या समस्यांना आवाज दिला़ न्यायालयाने अनेक मुद्दे स्वत:हून सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतले़ त्यामुळे समाजही न्यायालयाकडे त्याच अपेक्षेने बघत आहे़ - अभिनंदन वग्यानी, मुख्य सरकारी वकील

तणावपूर्ण जीवनशैलीमुळे नवीन आजार आले. या उपचारांसाठी नवीन टेक्नोलॉजी आणि औषधे आली. यातील औषधांमुळे शस्त्रक्रियेशिवाय आजार बरे होऊ लागले. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे आयुर्मान वाढलेले आहे. टेक्नोलॉजीमुळे इन्व्हेस्टिगेशनचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी कमी इन्व्हेस्टिगेशन करूनही औषधे दिली जात होती. पण, आता रुग्ण सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जातो. यामुळे खर्च वाढलेला आहे. रुग्णांमध्ये जागरूकता वाढलेली आहे. ही तशी चांगली बाब आहे, पण यामुळे अधिक पैसेदेखील खर्च होत आहेत. -डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

सध्याच्या युगात सीसीटीव्ही, मोबाइल ट्रॅकिंग किंवा मोबाइल कॉल रेकॉर्ड, फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने पोलीस गुन्ह्यांची उकल चटकन करू शकतात. हे तंत्रज्ञान पोलिसांनी अवगत करायला हवे. कारण गुन्ह्यांची पद्धत जशी बदलते आहे तसे गुन्हेगारही हुशार होत चालले आहेत. - वाय.पी. सिंग, माजी आयपीएस अधिकारी