शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

माणगावात मोर्बा पुलावरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:28 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला; पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली

माणगांव : तालुक्यातील माणगाव मोर्बा पुलावर आलेल्या पाण्यामुळे शनिवारी वाहतूक बंद ठेवण्यात आली. २६ जुलैपासून सतत पडणाऱ्या पावसाने मोर्बा नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, म्हसळा इकडे जाणाºया गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली. ही वाहतूक मांजरोणे, गोरेगावमार्गे फिरवण्यात आली होती. तसेच म्हसळा साई-माणगावकडे जाणारी वाहतूक तळेगाव खरवली मार्गे फिरवण्यात आली होती.साई मोर्बा विभागात असणाºया नद्या दुथडी भरून वाहत असून नदी किनारी असणाºया घरांमध्ये पाणी घुसले. तर काही गावांचा संपर्क तुटला. कचेरी रोड वरील साबळे हायस्कुलच्या आवारात पाणी तुंबल्याने विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. माणगाव काळ नदी दुथडी भरून वाहत होती. माणगांवमधील खांदाड, बामणोली रोड, माणगांव रेल्वे स्टेशन, खरवली फाटा आदी परिसरात पाणी तुंबले होते.लोणेरे-श्रीवर्धन व माणगाव-श्रीवर्धन रस्ता बंदमाणगाव तालुक्यात माणगाव, गोरेगाव, इंदापूर , निजामपूर, भिरा- पाटनूसमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील काळ नदी, गोद नदी, सावित्री नदीचे पात्राने धोकादायक पातळी ओलांडली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणारे मौजे कळमजे येथील ब्रिज वरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्याचे पत्र महामार्ग विभागाकडून देण्यात आले. श्रीवर्धन माणगाव रस्ता बंद केल्यामुळे वाहतुकीची कोंडी माणगाव शहरात झाली. तसेच गोरेगाव येथे काळ नदीला पुर आल्याने लोणेरे श्रीवर्धन रस्ता देखील वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या सर्व गोष्टीमुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊस