शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

अलिबाग जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ, सुरक्षेवर भर 

By निखिल म्हात्रे | Updated: December 25, 2023 18:39 IST

ख्रिसमस साजरी करण्यासाठी व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे.

अलिबाग : ख्रिसमस साजरी करण्यासाठी व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटन केद्रांवर हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. या संधीचा फायदा घेऊन हाॅटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रायगड मधील अलिबाग, मुरुड, काशिद, किहीम, हरीहरेश्वर, माथेरान, कर्नाळा अभयारण्य अशा आदी ठिकाणी पर्यटक दाखल झाले आहेत. अलिबाग आणि मुरुड परीसरात गेल्या चार दिवसात अडीच लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. दिवाळी सुटीपासूनच पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु सध्या थंडीचा मोसम आणि सलग सुटय़ा असल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने रायगडच्या किनारपट्टीवर दाखल झालेत. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आलेत. 

हॉटेल, लॉजिंगचा व्यवसायही तेजीत आहे. घोडागाडीवाले, विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट्स यांचा व्यवसाय करणारे खूश आहेत. इथल्या लॉजेसनाही चांगला व्यवसाय यानिमित्ताने उपलब्ध झाला आहे. किनारपट्टीबरोबरच रायगड किल्ला, महड, पाली येथील अष्टविनायकांची मंदिरे, साळाव येथील बिर्ला गणेश मंदिराचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे. रायगडमध्ये दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. आताच्या मोसमात पर्यटकांचा हा ओघ नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत असाच कायम राहणार आहे. नाताळच्या सुट्टीमुळे व पुढे चार दिवसांनी थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठीया ठिकाणांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हॉटेल व्यावसायीकांनीही आकर्षक पॅकेज आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डिस्को, डिस्कोथेकची सोय पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. 

याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षीततेसाठी समुद्र किनाऱ्यांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर पोलिस मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. अतिउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. महत्वाच्या नाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच आपल्या अतिउत्साही जल्लोषाने दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यात आजपासून साधारणत: 7 दिवस वास्तव्यास असणार आहेत. या दरम्यान पर्यटकांना वाहतूकीच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आली असून पोलिस यंत्रणेचा कटाक्ष असणार आहे. तर बल्लाळेश्वर व वरद-विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.

टॅग्स :alibaugअलिबागtourismपर्यटन