शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वाहतूककोंडी : प्रवाशांचे हाल; प्रशासन हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 01:00 IST

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड

नागोठणे : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेशभक्तांना महामार्गावर पडलेले खड्डे आणि मुसळधार पाऊस यामुळे रविवारी कमालीचा त्रास सहन करावा लागला. महाड, रत्नागिरी तसेच मुंबईकडे जाणाºया दोन्ही बाजूकडे वाहनांची वर्दळ वाढल्याने नागोठणेतील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर मार्गात दुपारपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याने मुंबईकडून कोकणात जाणाºया कार, जीपसारख्या वाहनांनी शहरातील शिवाजी चौकातून आपली वाहने नेण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणीही वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड, रोहेमार्गे कोलाडकडे वळविली.१महाड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना महामार्गाची दुरवस्था तसेच वाहतूककोंंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना दरवर्षी वाहतूककोंडीचा दरवर्षी सामना करावा लागतो.२यंदाही महामार्गावरील वाहतूककोंडी रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे रविवारी स्पष्ट झाले. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, वाहतूककोंडीसाठी नियोजन केलेल्या सर्वच उपाययोजना निष्फळ ठरल्याने महामार्गावर वाहनांचा तासन्तास खोळंबा झाला.३मुंबईहून कोकणात शनिवारी रात्री एसटीने प्रवास करणाºया हजारो चाकरमान्यांचे वाहतूककोंडीमुळे प्रचंड हाल झाले. मुंबईतून महाडमध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांना तब्बल १५ ते १६ तास लागले, ‘असा जीवघेणा प्रवास नको रे बाबा’, अशी म्हणण्याची वेळ प्रवासात हैराण झालेल्या चाकरमान्यांवर आली आहे.पनवेल रेल्वे, बस डेपोत चाकरमान्यांची गर्दीच्पनवेल : कोकणात जाणारे बहुतांश चाकरमानी पनवेल रेल्वे स्थानक, बसस्थानकातून प्रवास करीत आहेत. त्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. त्यातच पनवेल शहरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांसह सार्वजनिक मंडळेही हैराण झाली आहेत. ऐन उत्सवाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

च्पनवेल रेल्वे स्थानकात कोकणात जाणाºया गाड्या पकडण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हीच अवस्था बसस्थानकातही आहे.च्पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात महावितरणच्या विद्युतवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, खारघर, कळंबोली सारख्या भागातही विजेचा लपंडाव पाहावयास मिळाला.च्एकीकडे सार्वजनिक गणेश मंडळे विविध देखावे तसेच मंडळाच्या सजावटीत व्यस्त असताना विजेचा लपंडाव सुरू झाल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. उत्सवकाळात वीजपुरवठा देताना विविध कागदपत्रांची पूर्तता, परवानगी देण्याची मागणी महावितरणकडून होत असते.

टॅग्स :RaigadरायगडTrafficवाहतूक कोंडी