शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

वाहतूककोंडी : प्रवाशांचे हाल; प्रशासन हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 01:00 IST

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड

नागोठणे : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेशभक्तांना महामार्गावर पडलेले खड्डे आणि मुसळधार पाऊस यामुळे रविवारी कमालीचा त्रास सहन करावा लागला. महाड, रत्नागिरी तसेच मुंबईकडे जाणाºया दोन्ही बाजूकडे वाहनांची वर्दळ वाढल्याने नागोठणेतील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर मार्गात दुपारपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याने मुंबईकडून कोकणात जाणाºया कार, जीपसारख्या वाहनांनी शहरातील शिवाजी चौकातून आपली वाहने नेण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणीही वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड, रोहेमार्गे कोलाडकडे वळविली.१महाड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना महामार्गाची दुरवस्था तसेच वाहतूककोंंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना दरवर्षी वाहतूककोंडीचा दरवर्षी सामना करावा लागतो.२यंदाही महामार्गावरील वाहतूककोंडी रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे रविवारी स्पष्ट झाले. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, वाहतूककोंडीसाठी नियोजन केलेल्या सर्वच उपाययोजना निष्फळ ठरल्याने महामार्गावर वाहनांचा तासन्तास खोळंबा झाला.३मुंबईहून कोकणात शनिवारी रात्री एसटीने प्रवास करणाºया हजारो चाकरमान्यांचे वाहतूककोंडीमुळे प्रचंड हाल झाले. मुंबईतून महाडमध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांना तब्बल १५ ते १६ तास लागले, ‘असा जीवघेणा प्रवास नको रे बाबा’, अशी म्हणण्याची वेळ प्रवासात हैराण झालेल्या चाकरमान्यांवर आली आहे.पनवेल रेल्वे, बस डेपोत चाकरमान्यांची गर्दीच्पनवेल : कोकणात जाणारे बहुतांश चाकरमानी पनवेल रेल्वे स्थानक, बसस्थानकातून प्रवास करीत आहेत. त्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. त्यातच पनवेल शहरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांसह सार्वजनिक मंडळेही हैराण झाली आहेत. ऐन उत्सवाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

च्पनवेल रेल्वे स्थानकात कोकणात जाणाºया गाड्या पकडण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हीच अवस्था बसस्थानकातही आहे.च्पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात महावितरणच्या विद्युतवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, खारघर, कळंबोली सारख्या भागातही विजेचा लपंडाव पाहावयास मिळाला.च्एकीकडे सार्वजनिक गणेश मंडळे विविध देखावे तसेच मंडळाच्या सजावटीत व्यस्त असताना विजेचा लपंडाव सुरू झाल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. उत्सवकाळात वीजपुरवठा देताना विविध कागदपत्रांची पूर्तता, परवानगी देण्याची मागणी महावितरणकडून होत असते.

टॅग्स :RaigadरायगडTrafficवाहतूक कोंडी