शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वाहतूककोंडी : प्रवाशांचे हाल; प्रशासन हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 01:00 IST

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड

नागोठणे : गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेशभक्तांना महामार्गावर पडलेले खड्डे आणि मुसळधार पाऊस यामुळे रविवारी कमालीचा त्रास सहन करावा लागला. महाड, रत्नागिरी तसेच मुंबईकडे जाणाºया दोन्ही बाजूकडे वाहनांची वर्दळ वाढल्याने नागोठणेतील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल ते वाकण या चार किलोमीटर मार्गात दुपारपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याने मुंबईकडून कोकणात जाणाºया कार, जीपसारख्या वाहनांनी शहरातील शिवाजी चौकातून आपली वाहने नेण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणीही वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

सुकेळी खिंडीतही वाहतुकीची कोंडी होत आहे हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कोकणात जाणारी वाहने भिसे खिंड, रोहेमार्गे कोलाडकडे वळविली.१महाड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना महामार्गाची दुरवस्था तसेच वाहतूककोंंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांना दरवर्षी वाहतूककोंडीचा दरवर्षी सामना करावा लागतो.२यंदाही महामार्गावरील वाहतूककोंडी रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे रविवारी स्पष्ट झाले. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, वाहतूककोंडीसाठी नियोजन केलेल्या सर्वच उपाययोजना निष्फळ ठरल्याने महामार्गावर वाहनांचा तासन्तास खोळंबा झाला.३मुंबईहून कोकणात शनिवारी रात्री एसटीने प्रवास करणाºया हजारो चाकरमान्यांचे वाहतूककोंडीमुळे प्रचंड हाल झाले. मुंबईतून महाडमध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांना तब्बल १५ ते १६ तास लागले, ‘असा जीवघेणा प्रवास नको रे बाबा’, अशी म्हणण्याची वेळ प्रवासात हैराण झालेल्या चाकरमान्यांवर आली आहे.पनवेल रेल्वे, बस डेपोत चाकरमान्यांची गर्दीच्पनवेल : कोकणात जाणारे बहुतांश चाकरमानी पनवेल रेल्वे स्थानक, बसस्थानकातून प्रवास करीत आहेत. त्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. त्यातच पनवेल शहरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांसह सार्वजनिक मंडळेही हैराण झाली आहेत. ऐन उत्सवाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

च्पनवेल रेल्वे स्थानकात कोकणात जाणाºया गाड्या पकडण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हीच अवस्था बसस्थानकातही आहे.च्पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात महावितरणच्या विद्युतवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, खारघर, कळंबोली सारख्या भागातही विजेचा लपंडाव पाहावयास मिळाला.च्एकीकडे सार्वजनिक गणेश मंडळे विविध देखावे तसेच मंडळाच्या सजावटीत व्यस्त असताना विजेचा लपंडाव सुरू झाल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. उत्सवकाळात वीजपुरवठा देताना विविध कागदपत्रांची पूर्तता, परवानगी देण्याची मागणी महावितरणकडून होत असते.

टॅग्स :RaigadरायगडTrafficवाहतूक कोंडी