शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीए बंदरावरील वाहतूक रोखून धरली, पुनर्वसन प्रश्नावरून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 08:55 IST

Uran News: गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरला होता.

उरण - गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरला होता. यामुळे जेएनपीए बंदरातील मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प होती. 

जेएनपीए बंदरासाठी केंद्राने राज्य शासनाच्या सिडकोच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा या दोन्ही गावांचे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन कायदा धाब्यावर बसवून हनुमान कोळीवाडा गावाचे १७.५० हेक्टर क्षेत्रावरील जागेत पुनर्वसन करण्याची आवश्यकता होती. मात्र, फक्त हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले.  त्यातच कोळीवाडा गावालाच वाळवीने घेरले आहे. यामुळे गावातील बहुतांश घरे कोसळली आहेत. 

आश्वासनानंतर १५ तासांनी आंदोलन मागेयामुळे पुनर्वसनाच्या कायद्याच्या चौकटीत योग्य जागेत पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८ वर्षांपासून ग्रामस्थांचा केंद्र, राज्य सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलन १५ तासांनी मागे घेण्यात आले आहे. बैठकीत जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.  

 

टॅग्स :Raigadरायगड