शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

जेएनपीए बंदरावरील वाहतूक रोखून धरली, पुनर्वसन प्रश्नावरून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 08:55 IST

Uran News: गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरला होता.

उरण - गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरला होता. यामुळे जेएनपीए बंदरातील मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प होती. 

जेएनपीए बंदरासाठी केंद्राने राज्य शासनाच्या सिडकोच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा या दोन्ही गावांचे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन कायदा धाब्यावर बसवून हनुमान कोळीवाडा गावाचे १७.५० हेक्टर क्षेत्रावरील जागेत पुनर्वसन करण्याची आवश्यकता होती. मात्र, फक्त हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले.  त्यातच कोळीवाडा गावालाच वाळवीने घेरले आहे. यामुळे गावातील बहुतांश घरे कोसळली आहेत. 

आश्वासनानंतर १५ तासांनी आंदोलन मागेयामुळे पुनर्वसनाच्या कायद्याच्या चौकटीत योग्य जागेत पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८ वर्षांपासून ग्रामस्थांचा केंद्र, राज्य सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलन १५ तासांनी मागे घेण्यात आले आहे. बैठकीत जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.  

 

टॅग्स :Raigadरायगड