शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

जिल्ह्यातील खारेपाटात गौराई नाचविण्याची ‘शतकी’ परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:26 IST

सौभाग्याच्या रक्षणासाठी गौरीपूजन; महालक्ष्मीच्या सोहळ्याचा अनोखा उत्साह

- जयंत धुळप अलिबाग : गौरीचे पूजन केल्यास आपल्या हिरव्या चुड्याचे अर्थात सौभाग्याचे संरक्षण होते, अशी दृढश्रद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. रायगड जिल्ह्यातील पेणमधील खारेपाटात विशेषत: वाशी, वढाव, भाल, पेण फणसडोंगरी, खारसपोली या भागात गौराई डोक्यावर नाचवण्याची परंपरा सुमारे १०० वर्षांपेक्षा जुनी असल्याची माहिती, ग्रामीण रूढी-परंपरांचे अभ्यासक पेण तालुक्याच्या खारेपाटातील वढाव येथील देवीदास म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.गौराई डोक्यावर घेऊन नाचवण्याची ही अनोखी पंरपरा आजही आबाधित आहे. भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी गौरींचे अर्थात खारेपाटात गौरार्ईचे स्वागत शनिवारी पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. गौराईची कथा मोठी रोचक अशीच आहे. एकदा कौलासुर नावाच्या राक्षसांने स्त्रियांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळ्या स्त्रिया ब्रम्हा, विष्णू, महेशाकडे गेल्या. त्यांनी कौलासुराच्या त्रासाचा पाढाच वाचला. स्त्रिया महालक्ष्मीला शरण गेल्या. देवीने त्यांना धीर दिला. महालक्ष्मीने कौलासुराचा नाश केला, तेव्हापासून ‘गौर’ म्हणजेच महालक्ष्मीचा सोहळा गणेशोत्सवात साजरा केला जातो.माहेर आणि सासरला जोडून ठेवणारा हा गौराईचा सण नव्हे, तर संस्कार असल्याची धारणा खारेपाटात आहे. पारंपरिक गाणी गौरीच्या आगमनाच्या रात्री खारेपाटात घराघरांत घुमत असतात. खारेपाटातील भाल येथील सरोज अशोक म्हात्रे, वढाव येथील शकुंतला गजानन म्हात्रे, खारसपोलीमधील हरिश्चंद्र म्हात्रे, गौर फणस डोंगरी-पेण येथील रंजना राम म्हात्रे, वाशी येथील माहेरवाशीण संगीता पाटील या सर्व जणी एक ते दीड किलोमीटरचे अंतर पाटाला हात न लावता, भजनात नाचत गौर विसर्जनाकरिता घेऊन जातात.उरणसह तालुक्यात केवडा झाला दुर्मीळउरण : उरण परिसरातील समुद्रकिनारेच पार उद्ध्वस्त झाल्याने किनाऱ्यावर असलेली केवड्याची वनेही नष्ट झाली आहेत. गणपतीला केवडा अत्यंत प्रिय आहे. मात्र, आता हा मनमोहक सुगंध देणारा केवडा उरण परिसरात दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. उरण परिसरातील घारापुरी, केगाव-दांडा, पीरवाडी ते करंजा परिसरातील विविध सागरीकिनाºयांवर ठरावीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात केवड्याची वने आढळून येतात.केवडा श्रावण, भाद्रपद महिन्यातच फुलतो, बहरतो. गणेशोत्सवात केवड्याला विशेष महत्त्व आहे. केवड्याला केतकी, ताझम फू , धुली पुष्पम, अशी इतर अनेक नावे आहेत. केवड्याच्या फुलांचा सुवासिक अत्तर आणि तेल बनविण्यासाठीही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. झाडांची मुळे, पाने, खोडापासून मॅट बनविण्यासाठी, औषधे बनविण्यासाठी वापर केला जातो. गणेशपूजनात केवड्याला विशेष महत्त्व असल्याने भक्तांकडून सध्या मोठी मागणी आहे.देशातील काही भागांत केवड्याच्या झाडांची लागवडही केली जाते. उरण परिसरात समुद्रकिनारपट्टीची दिवसेंदिवस प्रचंड धूप होत चालली आहे. केवड्याचे फूल गणेशाला वाहण्यासाठी भक्त उत्सुक असतात. याशिवाय केवड्याच्या पातीलाही विशेष मागणी असते. मात्र, केवड्याची वने नामशेष होत असल्याने केवडा दुर्मीळ झाला आहे.गौराईच्या आगमनाने उत्साह द्विगुणितपेण : ‘बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...’ श्री गणेशाच्या आगमनाने भाद्रपदातील हा आनंद सोहळ्यातील परमोच्च क्षण म्हणजे गौरीचे आगमन.रांगोळ्या, घराची सजावट, गौराईच्या मखराची आरास, तिला नटवणे, प्रसादाचे, गोडाधोडाचा नैवेद्य करून गौराईचे स्वागत केले जाते. गौराईच्या आगमनाने घरात वेगळाच उत्साह संचारतो.पूर्वी गौरीचे स्वागत पारंपरिक गाणी गाऊन केले जायचे. त्यानंतर झिम्मा फुगड्या, उखाणे, पारंपरिक खेळ खेळले जायचे. मात्र, काळानुरूप गाणी बदलली असली, तरी गौराईच्या आगमनाचा उत्साह आजही कायम आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRaigadरायगड